शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

चीनवर  ‘नजर’ आकाशातून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 06:00 IST

चीनशी सातत्याने होणाऱ्या कुरबुरी थांबवण्यासाठी भारताने आता एक कायमस्वरूपी उपाय केला आहे. जिथे भारतीय जवानांची दृष्टी पडू शकणार नाही किंवा जवान पोहोचू शकणार नाहीत, अशा ठिकाणी आकाशातून नजर ठेवण्यात येणार आहे.

ठळक मुद्देयेत्या काही वर्षांत भारत अमेरिकेकडून अशा प्रकारचे ३० ड्रोन विकत घेण्याचा विचार करत आहे.

- - पवन देशपांडे

वर्षभरापासून चीनच्या कुरापतींनी आपण हैराण आहोत. सीमेवर कधी सैन्याची माघार घेतली जाते, तर कधी त्यात भर घातल्याच्याही बातम्या येतात. कधी लडाख सीमेवर कुरबुरी झाल्याचेही ऐकायला मिळते. चीन संपूर्ण सीमेवर कुठे ना कुठे घुसखोरीचा प्रयत्न करतच असल्याचे दिसते. वर्षभरापासून चीन सीमेवरच लक्ष केंद्रित झाले आहे. त्यामुळे चीनशी संबंधही बिघडले आहेत. सातत्याने होणारी ही कुरबुरी थांबवण्यासाठी भारताने आता एक कायमस्वरूपी उपाय केला आहे. जिथे भारतीय जवानांची दृष्टी पडू शकणार नाही किंवा जवान पोहोचू शकणार नाहीत, अशा ठिकाणी आकाशातून नजर ठेवण्यात येणार आहे. ही नजर असणार आहे किरायाची. अमेरिकेकडून घेतलेली. आपल्याला ही नजर स्वतःची हवी असेल तर त्याची किंमत आहे ४६० कोटी रुपये. या नजरेचं नाव आहे एमक्यू-. अमेरिकेतील सर्वांत शक्तिशाली ड्रोन. मानवरहीत विमान. हे विमान चक्क ५० हजार फूट उंचीवर उडतं. साध्या डोळ्यांना ते दिसणं तर शक्य नाहीच शिवाय ते रडारमध्येही येत नाही. त्यामुळे ते आकाशात उडत असेल तर त्याला फार धोका नसतो आणि दुश्मनालाही ते दिसत नाही. असे अनेक ड्रोन अमेरिका गेल्या १३ वर्षांपासून करते आहे आणि याच ड्रोनच्या आधारे अमेरिकेने अनेक दहशतवाद्यांचा खात्माही केला आहे. कारण क्षेपणास्र घेऊन आकाशात स्थिर राहण्याची यात क्षमता आहे. शिवाय हे जमिनीवरून ऑपरेट करता येते. म्हणजे यात व्यवस्था असून, कोणाला जाऊन बसण्याची गरज नाही. असे दोन अत्याधुनिक ड्रोन किरायाने घेण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. येत्या काही वर्षांत भारत अमेरिकेकडून अशा प्रकारचे ३० ड्रोन विकत घेण्याचा विचार करत आहे. असे जर झाले तर चीन, पाकिस्तानवर आकाशातूनच नजर ठेवता येणार आहे.

व्हॅक्सिन टुरिझम !

कोरोना विषाणूने एका फटक्यात संपूर्ण उद्योगविश्वालाच धक्का दिला. लॉकडाऊनमुळे सारेच हैराण झाले. त्यातून टुरिझम क्षेत्रही सुटलेले नाही. विमानसेवा बंद होती. अनेक देशांनी इतर देशांतील लोकांसाठी कवाडे बंद केली होती. काही काळ भारतातून जायला आणि यायलाही परवानगी नव्हती. त्यामुळे पर्यटनाचा संबंधच येत नव्हता. याच कारणामुळे टुरिझम उद्योग पार रसातळाला गेलेला आहे. गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहिली तर असे दिसते की, दरवर्षी जवळपास एक कोटी परदेशी पर्यटक भारतात येत आणि २.६ कोटी भारतीय पर्यटक विदेशात पर्यटनासाठी जात. यंदा हे सारेच खोळंबले आहे. जगभरातील पर्यटन उद्योगाची एकूण उलाढाल ही तब्बल १७ लाख कोटींपेक्षा अधिक आहे. यातून किमान पाच कोटी लोकांना रोजगार उपलब्ध होतो. हे रोजगारही या कोरोनामुळे धोक्यात आले आहेत. पर्यटन उद्योगाने पुन्हा उभारी घेणे त्यामुळेच गरजेचे आहे. जगभरातील कोरोनाची स्थिती जोवर सुधारत नाही, आटोक्यात येत नाही तोवर या पर्यटन उद्योगाला पुन्हा झळाळी मिळण्यासाठी खूप धडपड करावी लागणार आहे. पर्यटन व्यवसायाला उभारी देण्यासाठी अनेक योजना तर आणाव्या लागणार आहेतच, शिवाय कंपन्यांनाही पुढे येऊन पर्यटकांसाठी सूट द्यावी लागेल. कोरोना प्रतिबंधक लस येईल आणि सारे जग पुन्हा नव्याने भरारी घेईल, अशीच आस आता साऱ्यांना लागून आहे. या लसीसाठी विविध देशांमध्ये स्पर्धाही सुरू आहे. कोणत्या देशाच्या लसीला प्रथम सर्वांसाठी वापरण्याची परवागी मिळते ते येत्या काळात ठरेलच; पण अमेरिकेत  फायझर कंपनी तयार करत असलेली लस यात सध्या आघाडीवर असल्याचे चित्र आहे. ही लस भारतीयांना मिळेल तेव्हा मिळेल; पण अमेरिकेत ही लस सर्वसामान्यांना टोचण्यासाठी तयार होताच तिथे जाऊन लस टोचून घेण्याची अनोखी योजना एका पर्यटन कंपनीने आणली आहे. याला त्यांनी व्हॅक्सिन टुरिझम असं कोंदण लावलं. खरं तर अमेरिकेने तशी परवानगी दिली तर मुंबईतील या पर्यटन कंपनीला भारतातून काहींना अमेरिकेत घेऊन जाता येईल. लस टोचून परत आणता येईल. पण, अशा योजनांमुळे पर्यटन उद्योगाला भरारीचे व्हॅक्सिनमिळेल का हा प्रश्नच आहे. तूर्तास तरी या उद्योगाला पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी २०२२ उजडेल, असा अंदाज वर्तविला जातोय.

(सहायक संपादकलोकमतमुंबई)