शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

कृतज्ञ - जगण्याच्या कोलाहलातले कोवळे क्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 06:05 IST

अब्दुल करीम खां कोल्हापुरात केसरबाई केरकर यांच्या घरी त्यांना गाणे शिकवण्यासाठी येत. त्या दिवशी गुरू आले ते पावसात नखशिखांत निथळतच. दोनेक तासांनी पाऊस थांबला आणि त्यापाठोपाठ शिकवणीही. गुरुजी दाराजवळ आले तर बाहेर काढलेल्या चपला गायब. चौकशी करायला म्हणून ते स्वयंपाकघरात डोकावले. समोरचे दृष्य पाहून त्यांच्या डोळ्यांतून घळघळा पाणी वाहू लागले. केसरबाईंच्या आई पावसात भिजलेल्या गुरुजींच्या चपला चुलीतील निखाऱ्यांवर ठेवलेल्या तव्यावर शेकत होत्या!

ठळक मुद्देसंगीत ऐकत असताना त्याबद्दल कृतज्ञ वाटण्याचा रसरशीत क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच! अशाच कृतज्ञ क्षणांच्या आठवणी जागवणाऱ्या साप्ताहिक लेखमालेचा प्रारंभ

- वंदना अत्रे

खूप वर्षांपूर्वी ऐकलेली ही घटना. त्यामुळे कदाचित काही तपशील घरंगळत विस्मृतीच्या कोपऱ्यात गेलेले. पण अनुभवाचे लख्खपण तसेच आहे. घटना अगदी छोटीशी. असेल शंभरेक वर्षांपूर्वीची. अब्दुल करीम खां कोल्हापुरात केसरबाई केरकर यांच्या घरी त्यांना गाणे शिकवण्यासाठी येत. त्या दिवशी गुरू आले ते पावसात नखशिखांत निथळतच. डोके कोरडे करून शिकवणी सुरू झाली. दोनेक तासांनी पाऊस थांबला आणि त्यापाठोपाठ शिकवणीही. गुरुजी दाराजवळ आले तर बाहेर काढलेल्या चपला गायब. चौकशी करायला म्हणून ते स्वयंपाकघरात डोकावले. समोर जे दिसत होते ते बघून गुरुजी क्षणभर स्तंभित झाले आणि मग, त्यांच्या डोळ्यांतून घळघळा पाणी वाहू लागले. केसरबाईंच्या आई पावसात भिजलेल्या गुरुजींच्या चपला चुलीतील निखाऱ्यांवर ठेवलेल्या तव्यावर शेकत होत्या! त्यांचे सगळे लक्ष त्या वेळी फक्त त्या जोड्यांवर होते. पुरेशा सुकल्या आहेत असे वाटल्यावर त्या गरम चपला हातात घेऊन निघाल्या तर स्वयंपाकघराच्या उंबरठ्यापाशी गुरुजी उभे! त्या माऊलीने शांतपणे त्या चपला गुरुजींच्या पायाजवळ ठेवल्या. त्या क्षणाला जराही धक्का न लावता शांतपणे जिना उतरून गुरुजी निघून गेले ! ...सहज कोणाला सुचणारसुद्धा नाही अशी त्या माऊलीची ती कृती. कोणताही अविर्भाव नसलेली. कुठून आली असेल ती? त्या आईच्या पोटातील मायेतून? की, आपल्या मुलीच्या तळहातावर स्वर नावाची जगातील सर्वांत सुंदर, अमूर्त गोष्ट ठेवणाऱ्या गुरूबद्दल मनात असलेल्या असीम कृतज्ञतेतून?

- आजच्या करकरीत व्यवहारी काळाला नक्कीच ही दंतकथा वाटेल. किंवा अगदी वेडेपणासुद्धा. माझ्या कानावर ती सांगोवांगी आली असती तर मीही ती मोडीतच काढली असती! पण, एका साध्याशा स्त्रीने केलेल्या त्या एका कृतीने मला संगीत-नृत्याकडे बघण्याची एक अगदी वेगळी दृष्टी दिली. पानाफुलांच्या गच्च गर्दीत लपून बसलेले एखादे अनवट रंगाचे अबोल फूल अवचित हाती यावे तशी. संगीतातील राग, त्याचे चलन, त्यातील बंदिशी, समेचे अंदाज, ते चुकवणाऱ्या तिहाई, रागाभोवती असलेल्या वर्जित स्वरांच्या अदृश्य चौकटी हे सगळे ओलांडून त्याच्या पलीकडे बघण्याची दृष्टी. संगीताबद्दल आणि त्यातील स्वरांबद्दल निखळ आणि फक्त कृतज्ञतेची भावना निर्माण करणारी दृष्टी. एकाकी वाटत असताना हलकेच बोट धरून आपल्याबरोबर चालणारे, वेदनेच्या क्षणी थोपटत स्वस्थ करू बघणारे, हाक मारताच कधीही, कुठेही वाऱ्याच्या झुळकीवर स्वार होऊन आपल्यापर्यंत येणारे हे स्वर. केसरबाईंच्या आईला त्या स्वरांच्या शास्त्राबिस्त्राची ओळख नसेल पण तिच्या मुलीच्या जगण्याला आणि असण्याला त्या स्वरांमुळे प्रतिष्ठा मिळतेय हे नक्की कळत होते. तव्यावर मायेने जोडे शेकणारे तिचे हात म्हणजे तिच्या भाषेत कृतज्ञतेने केलेला नमस्कार असावा?

- हे मनात आले आणि मग असे हात वेगवेगळ्या रूपात दिसू लागले. संगीत ऐकत असताना, मग ते मैफलीचे असो किंवा तीन मिनिटे वाजणारे एखादे गाणे, त्याबद्दल कृतज्ञ वाटण्याचा रसरशीत क्षण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच. कलाकाराच्या आयुष्यात तो येतोच आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या श्रोत्याच्याही. वाऱ्याची झुळूक यावी आणि निघून जावी तसा तो येतो आणि जातो. पण कधीतरी अशा क्षणातून काहीतरी स्फुरते. एखादा राग, एखादी बंदिश किंवा असेच काहीबाही. हा विचार करताना मग वाटू लागले, खांद्यावर घट्टे पडेपर्यंत गुरूच्या घरी कावडीने पाणी भरता-भरता गुरूस्तुतीचे स्तवन सुचू शकते ते या भावनेतूनच. हे साप्ताहिक सदर म्हणजे अशा क्षणांना पकडण्याचा एक प्रयत्न आहे. एरवी जगण्याच्या कोलाहलात असे कोवळे क्षण वेळोवेळी हातातून निसटून जात असतात. पण काही वेळ ओंजळीत घेऊन ते बघितले तर त्यात असलेले निर्मितीचे एक सशक्त बीज दिसू शकते..! ते दिसावे यासाठी हा प्रयत्न.

(लेखिका संगीत आस्वादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

vratre@gmail.com