शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ‘हंगामा’ नको, हेतू तडीस न्या!

By किरण अग्रवाल | Updated: June 27, 2021 22:19 IST

Bacchu Kadu : बच्चू भाऊंबरोबर बैठका म्हणजे केवळ आदळआपट, संताप व इशारेबाजी; या समजाला छेद देऊन काही केले गेले तरच ते शक्य आहे.

- किरण अग्रवाल

वेशांतर करून प्रजेचे हाल जाणून घेणाऱ्या इतिहासातील राजा-महाराजांच्या कथा आपण ऐकल्या आहेत. अभिनवतेसाठी ख्यातकीर्त असलेल्या बच्चू कडू यांनीही अकोल्यात तेच केले; पण त्यातून घडून आलेल्या चर्चेवर न थांबता अन्य काही विभागांतील समस्याही अधिकारवाणीने त्यांनी मार्गी लावणे अपेक्षित आहे.

 

चाकोरीच्या पलीकडे जाऊन केलेली कृती चर्चित ठरतेच, पण त्यातून उद्दिष्टपूर्ती घडून येतेच असे नाही. ती साधायची असेल तर त्यासाठी सातत्य आणि पाठपुरावाही गरजेचा असतो. विशेषतः जबाबदार किंवा अधिकार असलेल्या व्यक्तीकडून फक्त चर्चेत येऊन जाणे अपेक्षित नसते, कारण चर्चा काही दिवस घडून येतात आणि परिणाम न घडता हवेत विरतातही. तेव्हा कृती आणि त्या कृतीमुळे घडून आलेल्या चर्चेनंतर तिची परिणामकारकता अगर उपयोगिता दृष्टिपथात येणे आवश्यक बनते. अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी वेश बदलून काही ठिकाणी दिलेल्या भेटींप्रकरणीही तेच घडून येण्याची अपेक्षा बाळगली गेली तर ती गैर ठरू नये.

 

आपल्या वेगळ्या कार्यशैलीची खासियत जपत बच्चू कडू यांनी मंत्रिपदाचा लवाजमा बाजूस सारत व आपली ओळख लपवीत, म्हणजे वेशांतर करीत काही ठिकाणी भेटी देऊन एक प्रकारे ‘रिॲलिटी चेक’ केले. अकोला महापालिकेत सामान्य नागरिकाप्रमाणे त्यांनी आयुक्तांना भेटण्याचा, तर तहसील कार्यालयात रेशन कार्ड मिळविण्याचा प्रयत्न केला. रेशन दुकानात शासनाच्या योजनेप्रमाणे मोफत अन्नधान्य मिळते की नाही याची चाचपणी करतानाच पानटपऱ्यांवरून गुटखाही खरेदी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामान्यांची होणारी टोलवाटोलवी व अवैध विक्रीचे प्रकार यातून समोर आले हे चांगलेच झाले, त्यावर काही कारवाईही झाली; पण एवढ्यावर थांबून चालणारे नाही, तर अशा अनेक विषयांकडे लक्ष देता येणारे आहे.

 

अभिनव आंदोलनांनी लक्ष वेधून घेण्याची बच्चू कडू यांची खासियत आहे. त्यांच्या आक्रमकतेमुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. विशेषतः दिव्यांगांसाठी असलेल्या अनेक सोयीसुविधा केवळ कडू यांच्या आंदोलनामुळे ठिकठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत. रक्तदानासाठी धावून जाण्याचे त्यांचे कार्य तर सर्वविदित आहे. त्यामुळे केवळ चर्चेत येण्यासाठी त्यांनी वेशांतर करून सदर भेटी दिल्या असे म्हणता येऊ नये. ‘सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही...’ अशा विचारधारेचे ते असल्याने या हंगाम्यानंतरची संबंधितांची कार्यतत्परता व प्रामाणिकता वाढीस लागण्याची अपेक्षा आहे; पण तसे होईल याची शाश्वती नसल्यानेच कडू यांनी याबाबत पाठपुरावा करून आपला हेतू तडीस नेऊन दाखविणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांच्या या वेशांतर प्रकरणाकडे नौटंकी म्हणूनच पाहिले जाईल.

 

महत्त्वाचे म्हणजे कागद वा अर्जावर वजन असल्याखेरीज जागचे न हलण्याची ख्याती असलेले अनेक सरकारी विभाग आहेत. दोन-पाचशे रुपयांसाठी परवानग्या अडवून धरणारे महाभागही अनेक आहेत, तेव्हा अशांचे कारनामे उघडे पाडण्यासाठीही बच्चू भाऊंनी काही केले तर सामान्य जनता त्यांना दुवा देईल. अर्थात हे सर्व करताना स्वतः कडू हे सरकारमध्ये आहेत, पालक मंत्री म्हणूनही त्यांच्याकडे अधिकार आहेत, तेव्हा त्याही माध्यमातून यंत्रणांमधील दोष दूर करण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतील. बच्चू भाऊंबरोबर बैठका म्हणजे केवळ आदळआपट, संताप व इशारेबाजी; या समजाला छेद देऊन काही केले गेले तरच ते शक्य आहे.

 

सामान्य जनतेच्या अपेक्षा सामान्यच असतात. त्यांना रस्त्याची मोठी कॉन्ट्रॅक्ट अगर डोळे दिपवणारे प्रकल्प नको असतात. विना झंझट, महापालिकेत चकरा माराव्या न लागता त्यांना जन्म-मृत्यूचे दाखले मिळाले तरी पुरे असते. जिल्हा परिषदेतील टोलवाटोलवी तर अतिशय टोकाला गेल्याच्या तक्रारी आहेत. रेशन कार्डसाठी अनेकांचा पुरवठा विभागात झगडा असतो. व्यापारी बांधवांना दुकान नूतनीकरणाचे परवाने संबंधितांचे उंबरे न झिजविता मिळायला हवेत. सध्या बळीराजाच्या पेरणीसाठीची लगबग सुरू आहे; परंतु बियाणे असो की रासायनिक खते, ती मिळविताना त्यांची अडवणूक होत असल्याचीही ओरड आहे. तेव्हा पालकमंत्री म्हणून बच्चू भाऊंनी याकडेही लक्ष देणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूAkolaअकोलाPoliticsराजकारण