शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

घाबरट नको, तसे गोंधळी कार्यकर्तेही नकोत

By किरण अग्रवाल | Updated: July 19, 2021 19:04 IST

Don't be afraid, don't be a confused activist : पक्ष नाजूक अवस्थेतून जात असतानाही कार्यकर्त्यांमधील गटबाजी अशी चव्हाट्यावर येणार असेल तर ती पक्षासाठी नुकसानदायीच ठरावी.

- किरण अग्रवाल 

धीची दारे अधिक असतात तेथे फारशा कटकटी होत नाहीत, परंतु संधीच कमी असते तिथे स्पर्धा अधिक असणे व त्यामुळे वाद-विवाद घडून येणे स्वाभाविक ठरते. अकोला येथे पक्षनिरीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीप्रसंगी जी हाणामारीची घटना घडली त्याकडेही याच दृष्टीने बघता यावे; परंतु मुळात पक्ष नाजूक अवस्थेतून जात असतानाही कार्यकर्त्यांमधील गटबाजी अशी चव्हाट्यावर येणार असेल तर ती पक्षासाठी नुकसानदायीच ठरावी.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सद्या राज्यभर झंझावाती दौरे चालविले असून, त्यात ते स्वबळाची भाषा करत असल्याने राज्यातील महाआघाडी सरकारमध्ये चलबिचल आहे. याचदरम्यान देशात इंधनाचे दर दिवसागणिक वाढत असल्याने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून राज्यभर आंदोलने छेडली गेली आहेत. या आंदोलनांचा आढावा घेण्यासाठी  काँग्रेसचे निरीक्षक भाई नगराळे यांच्या उपस्थितीत अकोला येथे बैठक घेण्यात आली असता त्यात स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत फेरबदलाचाही मुद्दा चर्चेत येऊन गेला. गेल्या महिन्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दौऱ्यावर येऊन गेले होते. अकोल्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या घरी भेटी देऊन त्यांनी यासंदर्भात चाचपणी केल्याने त्या पाठोपाठ आलेल्या निरीक्षकांच्या बैठकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. यात फेरबदलाला अनुकूल व प्रतिकूल मते प्रदर्शित झाल्याने त्यातूनच दोघात वाद होऊन फ्री-स्टाइल घडून आली. या हाणामारीचा पक्षाच्या बैठकीशी संबंध नव्हता असे नंतर सांगण्यात आले असले तरी; झाला प्रकार सार्वजनिकपणे घडून आल्याने पक्षाच्या प्रतिमेवर ओरखडा ओढला जाणे स्वाभाविक ठरले.

खरे तर राज्यातील सत्तेत काँग्रेस सहभागी असली तरी, या पक्षाची संघटनात्मक अवस्था नाजूकच आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येऊ नये.   वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा असो, की वाशिम, कोणताही जिल्हा त्याला अपवाद नाही. सुरुवातीचा काळ असा होता जेव्हा या परिसरात केवळ काँग्रेसचा दबदबा होता. अकोल्याबाबतच बोलायचे तर  विदर्भ केसरी ब्रजलाल बियाणी व विनयकुमार पाराशर या मान्यवरांच्या उल्लेखाशिवाय अकोला व काँग्रेसचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. आबासाहेब खेडकर,  जमनलाल गोयनका, नानासाहेब सपकाळ, गोविंदराव सरनाईक, अरुण दिवेकर, बाबासाहेब धाबेकर, वसंतराव धोत्रे, सुधाकर गणगणे आदींपासून ते सुभाष झनक, प्रा. अजहर हुसेन यांच्यासारखे मान्यवर मंत्री या पक्षाने दिलेत. जिल्हा विभाजन होण्यापूर्वी खेडकर, एम. एम. हक, मो. असगर हुसेन, वसंतराव साठे, मधुसूदन वैराळे, गुलाम नबी आझाद, अनंतराव देशमुख यांच्यासारखे ताकदीचे नेते खासदार म्हणून येथून निवडून गेले. १९८४ मध्ये वैराळे दुसऱ्यांदा निवडून गेले होते. त्यांच्यानंतर मात्र काँग्रेसला अकोल्याची जागा राखता आली नाही.  रामदास गायकवाड यांच्यासारखा सामान्य व्यक्ती काँग्रेसच्या नावावर अकोलेकरांनी आमदार म्हणून निवडून पाठविला. बाबासाहेब धाबेकर, दादासाहेब खोटरे, किसनराव गवळी आदींनी जिल्हा परिषद गाजवली. अण्णासाहेब कोरपे यांच्यासारख्या नेत्यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार भरभराटीस आणला. इतरही अनेक नावे घेता येण्यासारखी आहेत की ज्यांच्यामुळे अकोल्यातील काँग्रेसचा वरचष्मा स्पष्ट व्हावा, परंतु तो काळ सरला. आता वंचित बहुजन आघाडी निर्णायक स्थितीत आली असून, त्यांच्यामुळे होणाऱ्या मत विभाजनातून भाजपा, शिवसेना प्रबळ झाली आहे. अशा स्थितीत काँग्रेसला अस्तित्व टिकवून स्वबळ आजमावायचे तर ते काम सोपे राहिलेले नाही, पण अल्प बळ असतानाही कार्यकर्त्यांमधील गटबाजी चव्हाट्यावर येणार असेल तर त्यातून वाटेत काटे पेरण्याचेच काम घडून येईल याचे भान बाळगले जाणे गरजेचे आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच दिल्लीत महत्त्वाचे विधान केले असून, भाजपाला घाबरणाऱ्या घाबरटांनी काँग्रेस सोडावी, असे म्हटले आहे. असे घाबरट कामाचे नाहीत, त्याप्रमाणे बैठकांप्रसंगी गोंधळ घालून हाणामारी करणारे गोंधळीही उपयोगाचे नाहीत, कारण त्यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळते.

 सारांशात, फेरबदलाचा असो, की आणखी कोणताही मुद्दा, त्यावर मतभेद असू शकतात व ते सनदशीर मार्गाने नेतृत्वासमोर मांडताही येतात; परंतु जाहीरपणे गोंधळ घालून सामान्यांच्या नजरेत पक्षाला उणेपणा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पाठिशी घालता येऊ नये किंवा सारवासारव करून वेळ निभावली जाऊ नये. तसे करणे अंतिमतः पक्षासाठीच नुकसानदायी ठरू शकते. अकोल्यातील काँग्रेसमध्ये अलीकडे सक्रियता वाढली आहे. युवक आघाडी आंदोलनात आघाडीवर असते, त्यातून पक्षाचा प्रभाव निर्माण होऊ पाहत असतानाच कार्यकर्त्यांमधील वाद, मग तो वैयक्तिक स्वरूपाचा असला तरी त्यातून पक्ष कार्यालयात हाणामारी घडून येणार असेल तर स्वबळ सिद्ध होण्यापूर्वीच पक्षातील दुफळी उघड होऊन जावी. अलीकडील प्रकार त्यादृष्टीने गंभीर व दखलपात्र ठरावा.

kiran.agrawal@lokmat.com

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणAkolaअकोला