शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

सगळं लक्षात ठेवण्याची गरज असते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 06:00 IST

आपण खूप वेळा ‘स्मरणात काय राहिलं?’ यावर चर्चा करतो. ज्याची स्मरणशक्ती चांगली आहे,

आपण खूप वेळा ‘स्मरणात काय राहिलं?’ यावर चर्चा करतो. ज्याची स्मरणशक्ती चांगली आहे, त्यांना नेहमीच खूप छान वाटतं. त्याचप्रमाणे ज्यांची स्मरणशक्ती खूप काही चांगली नाही, सारखं विसरायला होतं, अशांना वाटतं की आपल्याला फार काही आठवत नाही, म्हणजे आपल्यात काही तरी दोष आहे. काय करावं म्हणजे आपली स्मरणशक्ती तल्लख होईल? 

स्मरणशक्ती चांगली असणं हे चांगलंच असतं. पण आपल्यासाठी सगळ्या आठवणी मेंदूत ठेवणं शक्य नाही, हे आपल्या शरीरालाही माहीत असतं. म्हणून तर जन्मापासूनची प्रत्येक आठवण राहत नाही. 

दिवसभरात अनेक प्रसंग घडतात. त्यातले जास्तीत जास्त प्रसंग विसरले जातात. रस्त्यावरून जाताना जे काही दिसतं, ते लगेचच विसरलं जातं. कारण ते सगळं लक्षात ठेवण्याची गरज नसते.

रात्रीच्या झोपेत मेंदू दिवसभराच्या घटनांचे वर्गीकरण करायला घेतो. ज्या घटना पुढच्या काळात आवश्यक नाहीत असं वाटतं त्या सर्व डिलिट होतात. त्याचप्रमाणे ज्या घटना पुढच्या काळात गरजेच्या असू शकतात, त्या सर्व आठवणी मेंदूत शिल्लक राहतात. कोणत्या आठवणी ठेवायच्या आणि कोणत्या आठवणी आधी पुसट आणि मग डिलिट करायच्या, हे मेंदू ठरवतो.

त्यामुळे आजच्या दिवसात समजा आपण १६ तास जागृतावस्थेत आहोत, त्या कालावधीतल्या किती आठवणी त्याच रात्री किंवा दुसऱ्या दिवशी – तिसऱ्या दिवशी आठवतात? असे आपण जगलेल्या आयुष्यातील रोजचे दिवस बघितले तर एकूण किती अशा आठवणी आपल्याकडे असतात? खरं सांगायचं तर एकूण जगलेल्या आयुष्यातली फारच थोड्या, पण महत्वाच्या, नेमक्या आठवणी स्मरण केंद्रात असतात. या आठवणी आनंदाच्या असतात, दु:खांच्या, अपमानाच्या, कौतुकाच्या, मजेच्या असतात. तशाच कंटाळ्याच्या सुद्धा  असतात.

आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण म्हणजे एक एक घटना असते. त्या सर्व लक्षात ठेवल्या जात नाहीत. प्रत्येक आठवण लक्षात ठेवणं हे मेंदूच्या दृष्टीने अवघड आहे आणि तसं अनावश्यकही. कारण त्या घटना तितक्या गरजेच्या नाहीत. म्हणून मेंदूने त्या डिलिट केल्या आहेत.

- डॉ. श्रुती पानसे, मेंदू आणि शिक्षण अभ्यासक shruti.akrodcourses@gmail.com