शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

असा करावा अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 13:12 IST

अभ्यास कसा करावा, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास का करावा, या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना ...

अभ्यास कसा करावा, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास का करावा, या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना चांगले करिअर करण्यासाठी आणि स्वत:च्या जीवनातील सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर कशाची गरज असेल, तर ती म्हणजे अभ्यासाची. हे एकदा समजले, की अभ्यास कसा करावा, या प्रश्नाचे उत्तर समजायला मदत होते. सर्व शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे ध्येय ठेवावे, त्यातून इच्छाशक्ती निर्माण होते. इच्छाशक्तीतून एकाग्रता वाढते. एकाग्रतेतून अभ्यास करण्याची क्षमता वाढते. क्षमतेतून आत्मविश्वास वाढतो. डोळ्यासमोर कायम मोठे ध्येय असेल, तरच विद्यार्थी जीवनात यशस्वी होतात. मूळ उद्देशापासून कधीच विद्यार्थ्यांनी भटकू नये, अभ्यास करून चांगले करिअर करणे हाच विद्यार्थ्यांचा मूळ उद्देश आहे आणि अभ्यासाशिवाय पर्याय नाही, हे सर्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यावे, विद्यार्थ्यांनी एकूण उपलब्ध असलेला वेळ व एकूण करावयाचा अभ्यास याचे व्यवस्थित नियोजन करावे, परीक्षेची अंदाजे तारीख लक्षात घेऊन आजपासून त्या तारखेपर्यंत प्रत्येक दिवसाचे नियोजन करावे, शाळेच्या दिवशी कमीत कमी ३ ते ४ तास अभ्यास तर पूर्ण सुटीच्या दिवशी कमीत कमी १४ तास अभ्यास सहज करता येतो.अभ्यासाला बसल्यावर सलग दोन ते तीन तास जागेवरून उठू नये, अभ्यास शांत ठिकाणी करावा, विद्यार्थ्यांनी झोप सात ते आठ तास घ्यावी, सोप्या विषयांना दोन वेळेस तर कठीण विषयांना तीन वेळेस रिव्हिझन होईल, असा अभ्यासाचा टाइमटेबल बनवावा, कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना त्या विषयांच्या कमीत कमी मागील पाच प्रश्नपत्रिका बघाव्यात म्हणजे अभ्यासाला योग्य दिशा मिळते. सर्व विद्यार्थ्यांनी सर्व विषय शाळेतच, कोचिंग क्लासमध्ये शिक्षकांच्या तासिकेतच लक्ष देऊन समजून घ्यावेत म्हणजे घरी करावयाचा अभ्यास सोपा होऊन जातो. शाळेत होणाऱ्या घटक चाचण्याही विद्यार्थ्यांनी नियमित आणि अभ्यास करून देत राहाव्यात, अभ्यासातील अडथळे समजल्या जाणारे मोबाइल, टीव्ही, कॉम्प्युटर, इंटरनेट टाइमपास करणारे मित्र इत्यादी सर्वांपासून विद्यार्थ्यांनी शक्य तितक्या दूर राहावे, हेच सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांचा अतिशय अमूल्य असा वेळ वाया घालत आहेत.सर्व विद्यार्थ्यांनी स्वत:ला समजेल अशा भाषेमध्ये स्वत:च्या नोट्स काढाव्यात, या नोट्स काढण्यासाठी तीन ते चार पुस्तकांचा प्रथम चांगला अभ्यास करावा व नंतर त्या नोट्समधून शेवटपर्यंत अभ्यास करत राहावा, सर्व महत्त्वाचे सूत्र, आकृत्या, समीकरण इत्यादींचा एक संच बनवून कायम स्वत:जवळ ठेवावा, तो आयुष्यभर कामात येतो. विद्यार्थ्यांनी संतुलित आहार घ्यावा, स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावी. स्वत:च्या जीवनातील समस्या, घरातील वाद, आर्थिक समस्या, आजारपण इत्यादींचा आपल्या अभ्यासावर परिणाम होणार नाही, अशी सकारात्मक मन:स्थिती बनवावी, परीक्षेत किंवा जीवनात कुठेही अपयश आले, तर विद्यार्थ्याने खचून जाऊ नये, अपयशाची खरी कारणं शोधावी, पुन्हा नियोजन करावे, स्वत:च्या चुकीतून धडा घेऊन पुन्हा जिद्दीने कामाला लागावे. सरावाने आणि अभ्यासाने अतिशय साधारण विद्यार्थीसुद्धा परीक्षेत चांगले मार्क्स मिळवू शकतो आणि जीवनात प्रगती करू शकतो. अभ्यास जर चांगला झाला असेल, तर परीक्षेची भीती मुळीच वाटत नाही. अभ्यासातून यश मिळाले तर तुमचा आत्मविश्वास खूप वाढतो व त्या आत्मविश्वासातून पुढचे यश प्राप्त होते. ही यशाची मालिका आजच सुरू करा, आजच्या स्पर्धेच्या युगात एक जरी वर्ष वाया गेले तर तुमच्या क्षेत्रातील लाखो विद्यार्थी पुढे निघून जातात. त्यामुळे वेळेचे भान ठेवून सर्व विद्यार्थ्यांनी वेळचे काम वेळेवर करणे अत्यावश्यक आहे. आजच सर्व विद्यार्थ्यांनी स्वत:च्या अभ्यासाची, परीक्षेची, करिअरची आणि एकंदरीत संपूर्ण जीवनाची जबाबदारी घ्या आणि कामाला लागा.

- प्रा. गणेश देशमुख

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षण