शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

चीन वेशीपलीकडली दिवाळी

By admin | Updated: October 28, 2016 17:16 IST

चीनमध्ये वास्तव्याला असलेल्या प्रत्येक भारतीयाला सणासुदीच्या दिवसांत मोठा आधार असतो तो इथल्या ‘ताओबाओ’चा! फ्लिपकार्ट असो की अमेझॉन; या सगळ्यांना मागे टाकणारं हे खास चायनीज आॅनलाइन स्टोअर.

 - पल्लवी गोरे

चीनमध्ये वास्तव्याला असलेल्या प्रत्येक भारतीयाला सणासुदीच्या दिवसांतमोठा आधार असतो तो इथल्या ‘ताओबाओ’चा!फ्लिपकार्ट असो की अमेझॉन; या सगळ्यांना मागे टाकणारं हे खास चायनीज आॅनलाइन स्टोअर. या आॅनलाइन दुकानात रायपूर (छत्तीसगढ) मध्ये बनलेल्या गुलालापासून पतंजलीच्या तुपापर्यन्त आणि सोनपापडी, काजूकतली ते कढीपत्ता, शेवग्याच्या शेंगांपर्यंत काय म्हणाल ते मिळतं. अगदी गूळसुद्धा!मूवर्स आणि पॅकर्सनी सामानात भरलेल्या डब्यांपैकी ३८ नंबरचा डबा शांघायला येऊन पोचला. डबा लहानसा. त्यावर मी लेबल लावलं होतं- 'स्र१ं८ी१ ३ँ्रल्लॅ२'. खरं तर तो डबा वेगळा भरायची गरज नव्हती. पण तुपात भिजलेल्या फुलवाती असल्यामुळे समजा कस्टम्समध्ये तो 'क्लीअर' झाला नाही तर इतर सामान उगीच अडकायला नको; म्हणून वेगळा ठेवला होता.विदेशात स्थलांतराची ही काही पहिली वेळ नव्हती. तरी थेट चीनलाच बदली घेऊन जायचं ठरल्यावर मनात हुरहुर लागून होती. सोबत काय नेता येईल? काय नाहीं? - जगाच्या पाठीवर कुठल्याही देशाला बिऱ्हाड-बाजलं हलवा; या बाबतीत प्रत्येक वेळी अनुभव वेगळे. कस्टम्सचे नियम तर देशागणिक बदलतात... आणि चीन? - विचारूच नये!!पूर्वेकडचा हा शेजारी देश आपल्यासाठी काहीसा अनोळखीच राहिला. त्यामुळे चीनची वेस ओलांडताना मनात संमिश्र भावनाच होत्या. आता शांघायमधल्या वास्तव्यानंतर वाटतं, आपल्या मनातल्या भावना पुष्कळशा अज्ञानावरच आधारलेल्या होत्या.आम्ही याच वर्षी आॅगस्ट महिन्यात शांघायला आलो. लगेच २-३ आठवड्यांनी गौरी-गणपतीचे आगमन. भारतातून सोबत नेलेली वैशंपायन गुरुजींची सीडी लावून प्रतिष्ठापना केली. शांघायच्या पब्लिक गार्डनमध्ये जरा वेगळी पण दूर्वा मिळाली. मोदकांचा नैवेद्य झाला. भारतातून धातूची गणेशमूर्ती करून नेली होती. आपल्या इष्टदेवतेचे लपून छपून विसर्जन करणे मनाला पटेना. इथे नोकरी-व्यवसायानिमित्त वास्तव्याला आलेले अनेक लोक गणेशाची स्थापना करतात. मग परस्परांकडे जाऊन दर्शन, आरती इत्यादि कार्यक्रम होतात. मी आमच्या घरी मैत्रिणींबरोबर  अथर्वर्शीर्षाची आवर्तनेही केली. भारतातून येण्यापूर्वीच शांघायला असलेल्या भारतीय संघाची माहिती इंटरनेटवरून काढली होती. तसेच इथे ‘शांघाय मराठी मंडळ’ही आहे हे इतर भारतीय मित्रांकडून कळले तेव्हा मोठाच आधार वाटला. गणपतीच्या दहा दिवसांत एक वीकेण्ड साधून ‘गणेशोत्सव’ साजरा होतो. एका हॉटेलमधे बॉलरूम बुक करून सुंदर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. येणाऱ्या पिढीला मराठी भाषा आणि परंपरेचा वसा आपोआपच मिळतो. शांघाय मराठी मंडळ स्थापन होऊन आता दहा वर्षे झाली आहेत. सदस्य संख्या फार नाही, पण उत्साह दांडगा. गुढीपाडवा हा दुसरा कार्यक्रम. त्यानिमित्ताने अनेक मराठी कलावंतही शांघायला येऊन गेले आहेत. या देशात भाषेचा अडसर फार मोठा. त्यामुळे मिसळण्यावर मोठी बंधने पडतात. परदेशी लोक - ज्यांना इथे ‘एलियन्स’ मानतात - ते तसे वचकूनच राहतात. आसपासच्या वातावरणाबद्दलची कुठलीही माहिती अनुवादाशिवाय कळत नाही. ‘एलियन्स’ना जेवढे कळू द्यायचे आहे तेवढेच सांगितले जाते. अशा वातावरणात आमच्यासारखे विदेशी लोक संस्कृतीच्या ओलाव्याला मुकतात.ती पोकळी मंडळाचे कार्यक्रम भरून काढतात. कार्यक्रमाचे स्वरूप धार्मिक नसून सार्वजनिक असते. गीतेच्या वर्गापासून बुक क्लब ते धावण्याच्या ग्रुप्सपर्यंत कितीतरी गोष्टी इथे सतत चालू असतात.  दिवाळी, नवरात्रातला दांंडिया हे सण सर्व भारतीय एकत्र येऊन साजरे करतात.सुमारे दहा वर्षांपूर्वी चीनच्या मुख्य शहरांमध्ये नोकरीच्या निमित्ताने येणाऱ्या भारतीयांचे प्रमाण वाढले. तोपर्यन्त व्यापारीवर्गच प्रामुख्याने भारतातून किंवा हाँगकाँगहून यायचा. ग्वांग्जो, यीवू श्यान्शी ह्या शहरात येणारे भारतीय पिढीजात ‘ट्रेडर्स’ होते. २००० नंतरच नोकरीनिमित्ताने होणारे स्थलांतर वाढले. त्यामुळे आता या शेजारी देशात नोकरदार भारतीयांची संख्या मोठी आहे.एकदा मनात ठरवले, की देश असो वा विदेश; माणूस हळूहळू रुळू लागतो. माझेही तेच झाले.शांघायमधल्या डिपार्टमेण्टल स्टोअर्समुळे ‘आपल्या’ स्वयंपाकासाठीची किराणा खरेदी खूपच सोपी झाली आहे. भाजीपाला भारतातल्यासारखाच मिळतो. मंडई म्हणजे इथले वेट मार्केट! इथेही भारताप्रमाणेच शेवटून कांद्याची पात द्यायची पद्धत आहे. भारतीय लोकांना इथे ‘इन्दुरन्स’ म्हणतात. कुणी ‘इन्दुरन’ दिसला की भाजीने भरलेल्या पिशवीत ‘श्याङ चाइ’ टाकू का विचारतात. ‘श्याङ चाइ’ म्हणजे आपली कोथिंबीर! शांघायमध्ये भारतीय खाद्यपदार्थांची दोन एक दुकाने आहेत. अर्थात, नेहमीच सगळे मिळते असे नाही. एक घरपोच सेवाही उपलब्ध आहे. पण सर्वात भन्नाट प्रकार म्हणजे ‘ताओबाओ’. फ्लिपकार्ट असो की अमेझॉन; या सगळ्यांना मागे टाकणारे हे खास चायनीज आॅनलाइन स्टोअर. या आॅनलाइन दुकानात रायपूर (छत्तीसगढ) मध्ये बनलेल्या गुलालापासून पतंजलीच्या तुपापर्यंत आणि सोनपापडी, काजूकतली ते कढीपत्ता, शेवग्याच्या शेंगांपर्यंत काय म्हणाल ते मिळतं. अगदी गूळसुद्धा. दिवाळीच्या दिवसांत मिठाया आणि फरसाणचा नवीन स्टॉक येतो.    इथे फटाक्यांना भर शहरात जरी बंदी असली तरी शहराबाहेर फटाके वाजतात. त्यामुळे शांघायमधली दिवाळी गाजत वाजत साजरी होते. शिवाय लहानमोठी गेट-टुगेदर्स असतातच.घरकामासाठी मदतनीस स्त्रिया मिळतात. त्यांना इथल्या स्थानिक भाषेत ‘आयी’ म्हणतात, हे कळले तेव्हा विशेषच वाटले होते.उच्चपदस्थ नोकरदारांना बहुतेक करून ड्रायव्हरसह गाडीसुद्धा मिळते. पण त्यांना सूचना देताना भाषेची तारांबळ उडते. त्यांची चिनी आणि आपली खाणाखुणांची सांकेतिक भाषा मिसळून मजेदार संवाद सुरू होतो. पण आता हळूहळू मराठी भारतीयांची संख्या वाढते आहे तसतशा शांघायमध्ये मराठी स्वयंपाकात तरबेज असलेल्या ‘आयी’ मिळू लागल्या आहेत. एक बाई तर चक्क आॅर्डर घेऊन मऊसूत घडीच्या पोळ्या करून देतात. या ‘आयी’ आणि ड्रायव्हर्स आदि सेवाक्षेत्रातले मनुष्यबळ सधन असते इथे.१९८० पर्यन्त भारत आणि चीनच्या परिस्थितीत फार काही फरक नव्हता. शिवाय  लोकसंख्या आपल्याहून जास्त. गेल्या दहा वर्षात चीनने जवळपास ६० कोटी लोकांना निम्न वर्गातून मध्यम वर्गात पोचवले आहे. यामागचे मला जाणवणारे मोठे कारण इथले उत्कृष्ट आधुनिक दळणवळण! वाहतुकीसाठीच्या बंदरांपासून गावं आणि शहरांची अंतरे कमी केली की विकासाला कसा वेग येतो, हे इथे शांघायमध्ये जाणवते. आज अख्खे जग चिनी मालाने भरले आहे पण इथल्या लोकानां ‘इंपोर्टेड’ गोष्टींचे मोठे वेड!! आपल्या भारतीय बाजारपेठा ‘मेड इन चायना’ने भरल्या असल्याचा संताप इथे वाचताना त्यातली अपरिहार्य हतबलता जाणवल्यावाचून राहत नाही. इथल्या बाजारातून वस्तू भारतात नेऊन नफा कमावणारे कितीतरी भारतीय कारणाकारणाने भेटतात. हे अर्थचक्र!! कितीतरी नामांकित धनिक, आर्किटेक्ट इथे येऊन नव्या वास्तूसाठी लागणारे तयार फर्निचर घेऊन जातात. अशी किती उदहरणे द्यावीत!!एक मात्र जाणवते - भारतीयांच्या बुद्धिमत्तेवर सामान्य चिनी माणसाचा मोठा भरवसा आहे. त्याला हेवा वाटतो आपल्या इंग्रजी भाषेवरच्या अधिकाराचा आणि कॉम्प्युटरच्या शिक्षणाचा. या देशातली तरुण पिढी जरी अमेरिकेकडे आकर्षित झालेली असली, तरी वृद्धांना भारताचे वेगळे आकर्षण आहे. ह्याचा प्रत्यय बौद्ध मंदिरे बघताना हमखास येतो. आपण ‘इन्दुरन’ आहोत हे कळल्यावर लगेच वागणुकीत आदरभाव जाणवतो.दोन्ही देशात साम्यही खूप आहे आणि एकमेकांकडून शिकण्यासारखेही खूप आहे.