शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

वेगळा प्रयोग

By admin | Updated: November 29, 2014 14:53 IST

विशिष्ट कालखंडाशी नाळ जोडू पाहणारा ‘विटी दांडू’ हा नवा चित्रपट. दिलीप प्रभावळकर यांनी या धाटणीतला चित्रपट पहिल्यांदाच केला आहे. केवळ तांत्रिक सफाईदारपणाच्या पलीकडे जाऊन हा चित्रपट काही सांगू पाहतो. त्याच्या विविध बाजूंवर त्यांनी स्वत: टाकलेला प्रकाश..

- दिलीप प्रभावळकर

 
मोबाईलवर एकापाठोपाठ येणार्‍या कौतुकाच्या मेसेजनी मनात पुन्हा एकदा ‘विटी दांडू’ घुमला. माझ्या आयुष्यातील हा पहिलावहिला पिरिऑडिक विशिष्ट कालखंडाशी नाळ जोडू पाहणारा सिनेमा.. प्रेक्षकांची त्यावरची प्रतिक्रिया काय असेल, याची उत्कंठा मनात होती.. त्यामुळे येणार्‍या मेसेजमुळे माझ्या मनात उठलेल्या प्रश्नांच्या तरंगांना,  प्रतिक्रियात्मक उत्तरांना वाट मिळाल्याने ती गोष्ट मनाला समाधान देत असावी.. सिनेमा जगण्याच्या प्रक्रियेमधला महत्त्वाचा घटक म्हणून या प्रतिक्रियांना माझ्या लेखी अनन्यसाधारण महत्त्व आहे.. कारण, ज्या प्रेक्षकांसाठी आपण हे सारं करतो त्यांना नेमकं काय वाटतं..? ‘विटी दांडू’ हा वेगळा प्रयोग आहे; त्यामुळे त्याविषयीची रिअँक्शन माझ्यासाठी महत्त्वाची आहे. ‘विटी दांडू’ हा स्वातंत्र्यपूर्व काळ ते २0१४ कालखंडामधला अन्वय साधणारा सिनेमा.. हा सिनेमा घटनाप्रधान आहे. त्यामधल्या अँक्शनचंही मला खरंच कौतुक आहे. कारण ढोबळमानानं होणार्‍या आपल्याकडील अँक्शनपेक्षा त्यामध्ये निश्‍चितच सफाईदारपणा आहे.. म्हणून असेल कदाचित अन् ती अँक्शन चिमुरडे करीत असल्यामुळे तो आणखी वेगळ्या कौतुकाचा मुद्दा आहे. यातल्या दाजींनी मला खूप काही दिलं. ती केवळ एक व्यक्तिरेखा म्हणून राहिली नाही. अशा काही निवडक व्यक्तिरेखा असतात, की ज्या आपल्याला न मागताही बरंच काही देऊन जातात.. आपल्याला त्या करून मिळालेलं समाधान 
 
हे महत्त्वाचं असतंच; पण तरीही त्याला जेव्हा प्रशंसेचं कोंदण मिळतं, त्या वेळी त्यावर शिक्कामोर्तब झालेलं असतं. मला या सिनेमामधले दोन-तीन प्रसंग प्रामुख्यानं महत्त्वाचे वाटतात.. कारण या दाजीला संपूर्ण गाव ‘बाटगा दाजी’ म्हणून ओळखतं.. त्यानं इंग्रजांचं वर्चस्व स्वीकारलं अन् त्यांना शरण गेला असला, तरी त्याच्या मनात इंग्रजांविरुद्ध लढताना आपल्या मुलानं आणि सुनेनं प्राणांची आहुती दिली आहे, याचं कुठं तरी भान आहे.. पण, त्या सार्‍याची सावली आपल्या नातवावर पडू नये, यासाठीचा हा प्रयत्न आहे.. हे सगळं असलं तरी त्याला इंग्रजांच्या पुरोगामी असण्यावर आणि त्यांच्या प्रगतिशील अन् विकसनशील दृष्टिकोनाचं विशेष कौतुक आहे; पण या सार्‍यामध्ये आपल्या मुलाच्या बलिदानाची भळभळती जखम या वयस्कर दाजीच्या मनात खोलवर दडलेली आहे.. दाजींचा शोक अनावर होतो, त्या वेळी ते बोटीतून दूरवर जाऊन एकांतात रडतात.. त्या वेळी विकास कदम आणि गणेश कदम या दोघांना तो सीन काहीसा अधिक तीव्र प्रतिक्रियांचा हवा होता. कारण, आजपयर्ंत कोणत्याही नाटक वा सिनेमा वा मालिकेमध्ये माझी रिअँक्शनही इतकी तीव्र नव्हती आणि त्यामुळेच हे सारं माझ्यासाठी नवं होतं. विकास आणि गणेशला ती भावना अधिक संयतपणे दिसायला हवी होती. कारण, त्या दु:खाची असलेली कोंडी.. कारण, दु:ख सांगू न शकल्यामुळे त्या प्रसंगांची ती गरज असल्यामुळे माझ्याकडून त्यांना हव्या त्या पद्धतीनं आपण हे सारं करू या.. असं म्हणून तो सीन केला.. आणि तो पाहताना माझ्या पापण्यांच्या कडाही ओलावल्या होत्या. असं फार क्वचित होतं.. कारण हातात असलेली लाकडी पेटी, विटी आणि ते वृत्तपत्राचं कात्रण.. हे सारं काही घेऊन तीन दिवस चित्रण सुरू होतं. कारण त्या संधिप्रकाशातला तो खेळ.. मागे असलेला नदीचा प्रवाह.. त्यामध्ये आकाशात पसरलेले ते रंग आणि हे सारं पार्श्‍वभूमीला घेऊन उभी राहणारी ती नाव.. होडी.. त्याला लटकलेला कंदील अन् त्यामध्ये मी.. हे सारं आजही माझ्या डोळ्यासमोर येतं. रडण्याचा प्रसंग म्हटला, की आजही माझ्या डोळ्यासमोर ‘नातीगोती’चा तो प्रसंग येतो; ज्यामध्ये आपल्याला जाणवतं, की माझ्या मतिमंद मुलाचा झालेला मृत्यू.. बच्चू गेल्याचं दु:ख आहे. आमच्या कुटुंबावर आभाळ कोसळलंय.. मी लाकडी स्टूलवर बसून मांडीत तोंड खुपसून रडत असतो.. रडण्याची ही अभिव्यक्ती २0-३0 सेकंदांची आहे.. पण त्यामध्ये माझा चेहरा दिसत नाही. इथं मी ज्या प्रकारे रडतो.. वेगवेगळ्या कॅमेरा अँगलनी हे सारं टिपलं जात होतं. मी विकास आणि गणेशवर विश्‍वास ठेवून हा सीन केला. त्या दु:खाची परिसीमा ओलांडणारा तो प्रसंग.. मनात गोठलेल्या प्रसंगांचं कोलाज आहे. दु:ख, शोक आणि त्यामध्ये घुसमटणारे दाजी हे सारं आजही आठवलं तरी मन रोमांचित होतं. हे सारं ज्या प्रभावीपणे चित्रित झालंय ते समाधानकारक आहे, कारण तो तांत्रिकदृष्ट्या सफाईदारपणा आहे; पण त्याहीपेक्षा ते हृदयस्पश्री झालंय, या गोष्टीचं समाधान अधिक आहे. यासोबत दुसरा एक प्रसंग आहे, जो माझ्या मनात आहे. इंग्रजांविषयी असलेला आदर आहे. इंग्रज अधिकार्‍याची बदली होऊन तो गावात येतो.. त्या वेळी नातवाला सोबत घेऊन दाजी भेटायला जातो.. त्या वेळी तो इंग्रज अधिकारी खौफनर त्या चिमुरड्या नातवाला एका हातानं उचलतो.. आणि तेही त्याच्या कोटाची कॉलर धरून व त्या अधिकार्‍याला पाहिल्यावर याच अधिकार्‍यानं आपल्या मुलाला गोळी घालून मारलंय, याची जाणीव होते. तो खौफनर इंग्रज अधिकार्‍याच्या हाताचा आपल्या नातवाला स्पर्श झालाय, ही विटाळाची भावना घेऊन घरी येतो.. त्या वेळचा प्रसंग चित्रित करणं ही तारेवरची कसरत होती, कारण पारदर्शक काचेवर मी आणि निशांत भावसार हा चिमुरडा उभा होता. एका बाजूला असलेली विहीर आणि दुसरीकडे काच.. इकडे आड अन् तिकडे विहीर म्हणजे काय, याची चांगलीच जाणीव झाली होती. त्यामध्ये काचेवर उभं राहणं.. ती घागर निशांतवर उपडी करणं.. त्या काचेच्या खाली असलेला कॅमेरा त्याचं भान मनात ठेवणं.. आणि ते शुद्धीकरणाचं मंत्रोच्चारण हे सगळं करीत असतानाचा प्रसंग खरंच बाका होता, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, त्या वेळी कॅमेरा टीमही ज्या प्रकारे जरा सांभाळून हं, असं सांगत होती.. त्यावरून माझ्या लक्षात येत होतं; पण माझ्यासोबत असणार्‍या चिमुरड्याचा विश्‍वास वाढवत तो प्रसंग उत्तम प्रकारे चित्रित होण्यासाठी धडपडणं एवढंच हातात होतं. यासोबतच मला आठवतंय, की अँटन म्हणजे गौहर खानसोबतचे काही सिक्वेन्स. खौफनर मेल्याचं वृत्त येतं.. अँटन चिडतो. आपल्या मुलाच्या मित्रांना इंग्रज निर्दयीपणे मारत आहेत. आपण काही करू शकत नाही.. हतबल असल्याची ती भावना.. त्या वेळी तो अँटन मला बंदुकीच्या दस्त्यानं मारतो. गौहरनं तो प्रसंग उत्तम प्रकारे केला.. त्याला रिअँक्शन म्हणून मी सिमेंटच्या खांबाला आपटलो.. ते ज्या पद्धतीनं आपटलो, की काही आठवून सोय नाही. मला प्रचंड लागलं.. डोकं तर खूप वेळ ठणकत होतं.. तसंच तुरुंग फोडून देशभक्त पळत असतात, त्या प्रसंगी बंदुकीच्या दस्त्याचा प्रसादही मिळाला होता.. आज नुसत्या त्या मेसेजनं तो सिनेमा नव्यानं जगल्याचं भान पुन्हा एका आलं. या सगळ्यामध्ये शेवट ज्या प्रकारे होतो, त्या वेळी आपल्या मुलाला मारलेल्या इंग्रजांवर प्रहार करण्याची वेळ येते.. त्या वेळी तो दाजी त्या इंग्रजांना क्षमा करतो हा महत्त्वाचा भाग आहे. हल्ल्याला प्रतिहल्ला हे उत्तर नाही होऊ शकत.. क्षमाशीलता हा गुण एका वेगळ्या उंचीवर या सिनेमाला घेऊन जातो.. हे या सार्‍याचं शक्तिस्थान आहे, असं प्रांजळपणे वाटतं. आज या आठवणी जागवण्याची ताकद ‘विटी दांडू’ सिनेमामध्ये आहे, ही खासियत मला महत्त्वाची वाटते.