शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रातील जीवघेणा करंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 12:55 IST

समुद्र किनारी फिरण्यास सर्वांना आवडते. किनाऱ्यावर क्षणाक्षणाला उसळणाऱ्या लाटा, पाण्यावर उमटणारे तरंग... भरती- ओहोटी बघून आपण विस्मित होऊन जातो; पण समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेल्यावर अनेक धोके संभवतात.

- डॉ. बाळासाहेब कुलकर्णी, (संचालक (निवृत्त), इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स)समुद्र किनारी फिरण्यास सर्वांना आवडते. किनाऱ्यावर क्षणाक्षणाला उसळणाऱ्या लाटा, पाण्यावर उमटणारे तरंग... भरती- ओहोटी बघून आपण विस्मित होऊन जातो; पण समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेल्यावर अनेक धोके संभवतात. समुद्र किनाऱ्यालगतच्या पाण्यात ओहोटीच्या वेळी गेल्यास कित्येकांना भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात अडकून पडतात, तर कोणी बुडतात. याशिवाय पावसाळ्यात किनाऱ्यालगत येणाऱ्या मोठमोठ्या लाटांबरोबर लोक समुद्रात वाहून जाण्याच्या घटना घडतात. गणपतीपुळेसारख्या समुद्रकिनारी पर्यटक उत्साहाने पोहण्यासाठी उतरतात; पण पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जातात. किनाऱ्यावरून समुद्रात लांबवर बघितल्यास समुद्र वरवर शांत, संथ दिसतो; पण समुद्राचे पाणी अस्थिर असून, ते सारखे फिरतच राहते. त्यामुळेच बोट किनाऱ्याला लावल्यावर बळकट दोरखंडाने बांधून म्हणजे नांगरून ठेवावी लागते, नाहीतर बोट समुद्रातील प्रवाहाबरोबर समुद्रात आत जाईल. समुद्राच्या पृष्ठभागालगत आणि आत खोलवर पाण्याचे प्रवाह फिरत असतात. असे अनेक प्रवाह ज्यांना समुद्रातील नद्या म्हणतात, एक प्रकारे समुद्राला उपकारक असतात. या प्रवाहामुळे तापमान संतुलित राहण्यास मदत होते. 

मुंबईतील बँडस्टँडवरून बेपत्ता झालेल्या स्वदिच्छा सानेची हत्या केल्याची कबुली जीवरक्षक मिथ्थू सिंह याने दिली. समुद्राच्या करंटची माहिती असलेल्या मिथ्थूने मृतदेह परत किनाऱ्यावर येणार नाही, अशा पद्धतीने समुद्रात फेकून दिला. तरन्नूम अन्सारी ही विद्यार्थिनी २०१६ मध्ये बँडस्टँडवर फिरताना समुद्रात पडली आणि पाण्याच्या विचित्र करंटमुळे आत ओढली गेली. तिचाही मृतदेह अजून सापडलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर समुद्रातील जीवघेणा करंट म्हणजे काय? या करंटच्या परिसरात दरवर्षी जगभरात हजारो माणसे बुडतात. ती जातात कुठे? अशा गूढ प्रश्नांची केलेली ही उकल.  

समुद्रातील करंटमध्ये अडकून मृत्यू महासागरात असलेल्या अनेक प्रवाहांपैकी किनाऱ्यालगतच्या पाण्यात लाटा आपटून तयार होणारे ‘रिप प्रवाह’ (करंट) खूप धोकादायक असतात. जगभरात समुद्रकिनारी अशा करंटमध्ये अडकून जीव गमावल्याच्या घटना नेहमी घडतात. 

करंट माणसाला खाली ओढतो का?  लोक समुद्रात घाबरून खाली जाऊ लागतात आणि त्यांना वाटते की, प्रवाह त्यांना खाली खेचत आहे; परंतु कोणताही प्रवाह समुद्रात खाली खेचत नाही.  समुद्रात किनाऱ्यालगत फुटणाऱ्या लाटांमुळे तयार होणारे धोकादायक करंट सहजासहजी ओळखता येत नसल्याने पर्यटक त्यात अडकून समुद्रात ओढले जातात.

...तेव्हा अधिक धोकादायकओहोटीच्या वेळी जेव्हा किनाऱ्यालगतचे पाणी आत समुद्रात ओढले जाते, तेव्हा करंट सर्वांत जास्त धोकादायक ठरतात. पूर्वी, करंटला कधीकधी रिप भरती म्हटले जायचे. जे चूक होते, असे वैज्ञानिक म्हणतात. करंटची गती आणि शक्तीमुळे दरवर्षी अमेरिकेत समुद्रकिनारी १०० पेक्षा जास्त लोक समुद्रात बेपत्ता होतात. १०० वर्षांपासून करंटचा अभ्यासशास्त्रज्ञ १०० वर्षांहून अधिक काळ समुद्रातील करंटचा अभ्यास करीत असून, गेल्या दशकात, मापन तंत्रातील प्रगतीने हे प्रवाह कसे कार्य करतात, याबद्दल अनेक प्रकारची नवीन माहिती मिळाली आहे. 

कसा ओळखतात?करंट म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरून मोकळ्या समुद्रात वाहणारा पाण्याचा जोरदार प्रवाह. 

 

टॅग्स :Mumbaiमुंबई