शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

अंधारयात्रा

By admin | Updated: April 9, 2016 14:51 IST

ग्लॅमरच्या ओढीने मुंबईत कित्येक येतात. झगडायची तयारी असते. त्याला ‘स्ट्रगल’ म्हणतात या जगात! पण त्या स्ट्रगलची व्याख्याच नाही नीटशी. आणि त्याच्याशी दोन हात करण्याची तंत्रंही! मुळात प्रत्येकाच्या वाटय़ाला भलभलतं काहीतरी येतं आणि आधी आलेले, मागून येणा:यांना याबद्दल सांगतातच असं नाही. जी लढावीच लागणार, त्या लढाईबद्दल पुरेशी माहिती नसणं आणि योग्य त्या शस्त्रंअभावी युद्धात उतरावं लागणं, हा खरा तिढा आहे.

स्ट्रगल, टेन्शन आणि स्ट्रेस :  ग्लॅमरमागच्या अंधारातली तीन श्वापदं
 
मुंबईत अंधेरी स्टेशनच्या माणसांनी खचाखच भरलेल्या प्लॅटफॉर्मवर दहाएक वर्षांपूर्वी ती मला भेटली होती. नाव वसुधा. (बदलले आहे.) हिंदी सिनेमात हिरॉईन होण्याचं स्वप्न उराशी बाळगून जे हजारो तरु ण-तरु णी रोज मुंबई गाठतात त्यातलीच एक. मध्यमवर्गीय. साता:याहून थेट मुंबई गाठलेली आणि स्ट्रगलर म्हणून आधी हिंदी सिनेमा, ते जमलं नाही म्हणून मग हिंदी सिरीयल आणि त्यानंतर मराठी टेलिव्हिजनवर काही मिळतंय का हे शोधणारी. काही कामं मिळालेली, त्यामुळे इंडस्ट्रीत ओळखी निर्माण झालेली, काही कामं पाइपलाइनमध्ये असलेली, त्याविषयी उत्सुक असलेली आणि मुंबईत एकटीने चाललेल्या स्ट्रगलच्या उंचसखल पाऊलवाटा तुडवणारी..
वसू.  
चित्रपट आणि टेलिव्हिजनच्या चकाचक दुनियेच्या पलीकडचं कडवट, काळपट, जीवघेण्या स्पर्धेचं, एकटेपणाचं जगणं, पैसा-प्रसिद्धीच्या हातात हात घालून येणारी असुरक्षितता, नात्यांचे घोळ, सतत सर्वत्र दिसत राहण्याची कधीही न संपणारी धडपड.. असं खूप आणि काय काय बोलली होती वसू.
बोलता बोलता म्हणाली होती, ‘रोज रात्री एकटीने खोलीतल्या एखाद्या कोनाडय़ात किंवा बाथरूममध्ये जाऊन ऊर फुटेस्तोवर रडायचं. मग स्वत:ला बिलगून झोपून जायचं. दुस:या  दिवशी पुन्हा नव्या उमेदीने काम शोधायला, स्पर्धेत टिकायला, यशाचा अजून पुढचा टप्पा गाठायला तयार व्हायचं. हे रोज करायचं. हे आयुष्य सोपं नाही. स्पर्धा आहेच; शिवाय पाय रोवून उभं राहण्यासाठी, उभं राहिलं की टिकून राहण्यासाठी खूप काही करावं लागतं. त्याचा येणारा ताण असह्य होतो. निराश करतो. या सगळ्याला कायमचा पूर्णविराम देऊन मोकळं व्हावंसं वाटतं.. काहीजणी तो मार्ग निवडतातही.  बाकीच्या माङयासारख्या तळमळत राहतात.’
प्रत्युषा बॅनर्जीने तिच्या राहत्या घरात आत्महत्त्या केल्याची बातमी वाचली, तेव्हा वसूशी झालेला अंधेरीच्या स्टेशनवरचा तो संवाद आठवला.
माध्यमांमध्ये झळझळणारं चंदेरी दुनियेचं गोड गुलाबी रुपडं, पाऊट्स आणि सेल्फीच्या चकचकीत क्लिकनंतर तसंच सुंदर राहतं असं नाही. आयुष्य गुंतागुंतीचं असतं. पन्नास अॅप्स वापरून फोटोशॉप केलेल्या नीटनेटक्या, परफेक्ट सेल्फीसारखं ते असत नाही. शूटिंग, पाटर्य़ा आणि एकमेकांवर कौतुकसुमनं उधळून झाल्यानंतर उरलेलं आयुष्य अनेकांसाठी विद्रूपतेने भरलेलं असतं. त्यात असतो टोकाचा एकटेपणा, स्पर्धेत टिकून राहताना कमी पडणारा आत्मविश्वास, आयुष्य प्रचंड वेगाने पुढे जात असल्याने मानसिक आधारासाठी प्रेमसंबंधांवरच अतोनात अवलंबून असणं, सतत हाताळावं लागणारं अटेन्शन आणि प्रसिद्धी, त्यातून निर्माण होणारे दोन चेहरे, एक खरा आणि एक जगासाठी घेतलेला. या दोन्ही चेह:यांचं आतल्या आत होणारं भांडण, काहीवेळा युद्ध.. कामातून अचानक येणारा प्रचंड पैसा, त्यामुळे तयार झालेलं स्टेटस, काम नसताना आणि पैशाचा ओघ अचानक आटल्यावर वर नेलेली लाइफस्टाइल सांभाळण्याचा येणारा ताण आणि खूप काही.. 
प्रत्येकालाच आयुष्यातले उभे आडवे धागे सोडवून नीटस गोफ विणता येतोच असं नाही. अनेकांना ही गुंतागुंत हाताळता येत नाही, सोडवताही येत नाही. 
प्रत्युषा विरत गेलेली नाती आणि आटलेले पैसे या दोन्ही आघाडय़ांवर लढत होती. आतापर्यंत जी काही माहिती मिळते आहे त्यावरून तिच्या वैयक्तिक आयुष्यात ताण होता. मुंबईत एकटीने राहणं, मानसिक ताणाच्या काळात कुणीच जवळ नसणं, आपल्याला निराशा आली आहे म्हणजे नेमकं काय होतंय हे शेअर करता न येणं, त्यातच लाइफस्टाइलपायी केलेली कर्ज भागवताना होणारी दमछाक आणि स्वीकारलेल्या जीवनशैलीवर होणारा खर्च या सगळ्यातून तिची सुटका होऊ शकली नाही. दुर्दैवाने, ही सुटका कशी करून घेता येऊ शकेल हे तिला कुणीच सांगितलं नाही. 
प्रत्येक व्यवसायाच्या यशा-अपयशाची आणि ताणाची गणितं वेगवेगळी असतात. ज्या त्या व्यवसायात पडताना ती समजून घेणं खूप आवश्यक असतं. ग्लॅमरच्या दुनियेत येणा:यांसाठी तर ही गणितं अधिकच किचकट असतात. वय लहान असतं, नशीब जोरावर असल्यास प्रसिद्धी चटकन मिळते आणि पैसा अमाप येतो. अशावेळी चार समजुतीच्या गोष्टी सांगणारं आणि डोकं शाबूत ठेवेल, पाय जमिनीवर राहतील याची काळजी घेणारं सोबत कुणी नसेल तर गुंतागुंत चटकन होते. 
भल्याभल्यांची यातून सुटका होत नाही.
प्रत्युषाच्या दुर्दैवी बातमीनंतर प्रियंका चोप्राच्या पूर्व मॅनेजरनेदेखील स्ट्रगलच्या काळात खुद्द प्रियंकानेसुद्धा नैराश्यातून आत्महत्त्येचा प्रयत्न केल्याची माहिती तपशिलासह फोडली. खरं खोटं प्रियंकाला माहीत! पण यामुळे अधोरेखित होते ती एकच गोष्ट : या दुनियेच्या कामाच्या स्वरूपातच दडलेला असह्य ताण!
स्ट्रगलच्या काळात येणारा हा ताण आणि निराशा योग्य पद्धतीने हाताळता आली, तर पुढे यशाचे दरवाजे कसे खुले होतात, याची उत्तम उदाहरणं म्हणजे दीपिका, प्रियंका आणि कंगना या सध्याच्या आघाडीच्या नायिका.
 त्या तर आणखीन वरच्या स्तरातली असुऱक्षितता, स्पर्धा आणि यश-अपयश हाताळत होत्या. दीपिका पदुकोणसारखी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री तर यशाच्या शिखरावर असताना या नैराश्याची शिकार झाली. ताण अपयशाचा असतो, तसाच तो न पेलवता येणा:या यशाचादेखील असतो! - हे दीपिकाने नंतर खुलेपणाने सांगितलंही! दीपिका सुदैवी अशी की तिच्यामागे तिच्या कुटुंबाचा भक्कम आधार होता. आपल्याला जे होतं आहे ते मान्य करून त्यासाठी योग्य वेळी वैद्यकीय सल्ला-उपचार घेण्याचा आणि त्याविषयी खुलेपणाने बोलण्याचा कणखरपणा एरवी कसा ङोपला असता?
‘अचानक मिळणारी प्रसिद्धी हाताळणं सोपं नाही. त्यातून येणारा ताण आणि कौतुकाची विचित्र चटक जीवघेणी असते’ - मागे एकदा मॅगसेसे पुरस्कार मिळालेल्या एका सामाजिक कार्यकर्तीशी बोलताना गप्पांच्या ओघात तिने हे शेअर केलं होतं.
प्रत्युषाच्या जगण्याकडे बघताना हे किती खरं आहे याची पुन्हा पुन्हा जाणीव होत राहते. वयाच्या ऐन विशीत मिळालेली प्रसिद्धी, पाठोपाठ मिळणारा पैसा, यातून तयार झालेली जीवनशैली, त्यात तडजोड न करण्याची मानसिकता या सगळ्या गोष्टी हाताळणं खरंच त्या वयात अवघड जाऊ शकतं. त्यातून प्रत्युषासारख्या अनेक मुली देशभरातल्या कानाकोप:यातून नशीब काढायला मुंबईत येतात. त्यांच्याबरोबर त्यांचे पालक असतातच असं नाही. अनेकदा पालकांची इच्छा असली तरी मुला-मुलींची नसते. स्वतंत्र आणि मनाजोगतं आयुष्य जगण्याची संधी त्यांना सोडायची नसते. 
- पण या मिळणा:या स्वातंत्र्याला हाताळण्याची त्यांची मानसिक तयारी असते का? बहुतेकदा नाही. ब:याचदा अशा तयारीची गरजच लक्षात येत नाही. आधी आलेले, मागून येणा:यांना या तयारीबद्दल सांगतातच असं नाही. मग काय मुंबईच्या उपनगरांमधल्या फ्लॅट्समधून एकटय़ाने राहणा:या तरु ण-तरु णींच्या आयुष्यातली खळबळ त्यांच्या फ्लॅटच्या चार भिंतींपुरतीच मर्यादित राहते. जगाला काय पण त्यांच्या पालकांनाही अनेकदा त्याचा मागमूसही नसतो. 
- बालिकावधू चालू होती तोवर पैसा, प्रसिद्धीच्या शिखरावर असलेली प्रत्युषा त्यानंतर काम मिळवण्यासाठी धडपडत होती. पैसा कमावलाच पाहिजे या कम्पल्शनमधून रिअॅलिटी शो करत होती. 
- ही हतबलता हेच असह्य अंधारात ढकलून देणारं क्रूर श्वापद आहे.
 
ड्रग, सेक्स 
..आणि आत्महत्त्या!
 
1. मुंबईत येणारी प्रत्येकच ती काहीतरी भव्यदिव्य करायच्या तयारीने आलेली असते. रॅम्प शोज आणि बॉलिवूड गाजवायचं असतं. - ज्यांच्याकडे टॅलन्ट (आणि गॉडफादर) आहे, त्यांना ही शिडी पटापट चढता येते. अगदी त्या उंचीवर नाही पोहोचता आलं तरी ब:यापैकी नाव होतं. ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी मिळते, पण बाकी बहुतेकींची सुरुवात स्ट्रगलपासून होते. यश, पैसा मिळायला लागला की त्यांचीही लाइफस्टाइल बदलते. नातेवाईक, आईवडील, जुने मित्रमैत्रिणी मागे पडतात. अजून यश, अजून काम मिळवण्याच्या नादात वर्तुळं बदलत जातात. पाटर्य़ाच्या निमित्ताने दारू आणि पाठोपाठ ड्रग्सची सवय होत जाते.. आणि एक दिवस लक्षात येतं वय वाढलंय. आपला चेहरा शिळा झालाय. शेल्फ लाइफ संपत आलंय. आता पुढे काय? 
 
2. इथे या मुलींच्या आयुष्यात ‘पार्टी एजंट’ नावाची जमात शिरते. पैसा तर कमावणं भाग असतं. घराचे हप्ते, पार्लर, शॉपिंग, फोनची बिलं द्यायची असतात. मग पैसे मिळवण्यासाठी धनाढय़ लोकांच्या पाटर्य़ामध्ये जायला सुरु वात होते. ड्रग्स, दारू, शॉपिंगच्या आहारी गेलेल्या या मुलींसाठी गळ लावून बसलेले असतातच. 
 
3. चक्र थांबत नाही आणि कित्येक जणी नैराश्याच्या, अवहेलनेच्या खोल खोल दरीत लोटल्या जातात. काहीजणी यातून बाहेर पडू शकतात, काहींना परतीचा रस्ता सापडत नाही. ताण असह्य होतो.
 
4. मुंबईत टीव्ही आणि सिनेमात बिग ब्रेक्स मिळवायला येणा:या कितीतरी मुली स्ट्रगलच्या काळात एका अतिशय खोटय़ा आणि बनावट तत्त्वज्ञानाला बळी पडतात. ते म्हणजे, कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है! हे हरवणं असतं शरीराचं, मनाचं, विश्वासाचंही! 
 
5. या मुलींच्या मुंबईत ओळखी नसतात. काम मिळतं कसं हेही माहीत नसतं. चार ठिकाणी स्वत:चे फोटो दिल्यानंतर अशीच कुणाशीतरी ओळख होते. तो माणूस काम मिळवून देण्याचं आश्वासन देतो. मग जवळीक होते, विश्वास वाटतो. मुलींनी नकार दिला तर हा नवा मित्र त्यांना ‘पटवतो’. म्हणतो, हीच बॉलिवूडची पद्धत आहे! पूर्वी कुठून कुठून हे ऐकलेलं असतं. तेच खरं वाटायला लागतं. ‘एकबार कर लो.’ ‘सिर्फएक ब्रेक के लिये’..
 
6. खरं काय, खोटं काय समजेनासं होतं. मुली तयार होतात. पण काम मिळत नाही. निराशा हाताळता येत नाही. रोज नवा माणूस. नवी आशा.. मनावरचं ओझं असह्य होतं. आपण काय करायला आलो आणि आपलं काय होऊन बसलंय ही भावना त्रस द्यायला लागते. परतीचे दोर कापून टाकलेले असतात. त्यामुळे पुन्हा कुटुंबाकडे जाण्याची भीती वाटते. 
काहीवेळा लाज वाटते. 
7. कधीकधी यश मिळतं पण ते अल्पजीवी ठरतं. हे आणखी वाईट! भरपूर काम, खूप पैसा, मुबलक प्रसिद्धी आणि मग एकाएकी यातलं काहीच नाही असं होतं. सगळं एकदम रिकामं होऊन जातं. या रिकामपणाला सामोरं जाता येत नाही. 
 
8. यश मिळालं तरी व अपयश मिळालं तरी एकटं पाडणारी ही दुनिया निष्ठुर आहे. आणि तिचे नियम माहिती नसलेली तरुण मुलं हतबल! हे दुर्दैवी खरं, पण वास्तव आहे. 
मुलींवर ताण असतो. मग मुलांचं काय?
स्त्री कलाकार आणि पुरुष कलाकार यांच्यात काही मूलभूत फरक असतात असं मला वाटतं. एकतर पुरुष कलाकाराचं ‘शेल्फ लाइफ’ स्त्रियांपेक्षा जास्त असतं. त्यामुळे ‘घाई’ थोडी कमी असते. 
आणि मुलग्यांना वाढवलं जातं तेही मुलींपेक्षा वेगळं. एखादी गोष्ट मनाला लावून न घेता त्यातून बाहेर पडायला शिकणं हा मुलग्यांवरच्या सामाजिक-कौटुंबिक संस्कारांचाच भाग असतो. त्यामुळे एखाद्या घटनेला प्रतिसाद देण्याची त्यांची पद्धतच निराळी घडते. 
अर्थात, या क्षेत्रतल्या मुलग्यांना भरपूर ताण असतात. नैराश्य येतंच.  
एका यशस्वी प्रोजेक्टनंतर दुसरा मिळेस्तोवर तग धरून राहायला कमी पडलेले खूप! पेशन्स राहत नाही. मग समोर जे येईल ते घ्यायचं आणि मीटर डाऊन ठेवायचं असले प्रकार सुरू होतात. शिवाय यातून नुकसान आपलंच आहे हेच अनेकांच्या लक्षात येत नाही. 
यशानंतर येणारा ब्रेक अनेकांना ङोपत नाही. चार पावलं मागे जायची तयारी नसते. 
पुरुषांच्या बाबतीतही काम मिळवण्याच्या, त्यासाठी पार्टीमध्ये दिसण्याच्या, सोशल प्रेङोन्सवर भर देण्याच्या गडबडीत प्रचंड मानसिक ओढाताण होऊ शकते. एखाद्याच्या गुड बुक्समध्ये आपण राहिलो तरच आपल्याला कामं मिळतील यापोटी हुजरेगिरी आणि स्तुतिपठण वाटय़ाला येतं. इतकं सगळं करूनही जेव्हा काम मिळत नाही तेव्हा निराशेची आवर्तनं सुरू होतात. 
मी नेहमी स्वत:ला एक गोष्ट सांगतो- माझं क्षेत्र ग्लॅमरस आहे, मी नाही. मी आजही तोच नाशिकचा साधासुधा मुलगा आहे.
मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहे. मराठी टेलिव्हिजन-सिनेमात काम करणारे बहुतेक तरुण नाटकवाले आणि मध्यमवर्गीय आहेत. मध्यमवर्गीय व्हॅल्यू सिस्टिम्स पक्क्या असल्याचा खूप फायदा होतो. तुमच्या घरातले, तुमचे मित्र तुम्हाला योग्यवेळी जमिनीवर आणतात. 
या क्षेत्रतल्या यशापयशाच्या विचित्र खेळाशी झगडणं नशिबी आलेल्या तरुण कलाकारांच्या बाबतीत हल्ली एक ट्रेंड दिसतो- या सगळ्याचा परिणाम म्हणून असेल कदाचित, पण अनेकजण लग्न लांबणीवर टाकतात. लग्नाचं वय असतं तेव्हा करिअरला प्रॉब्लेम होईल, खर्च वाढतील, फॅन फॉलोइंगवर परिणाम होईल म्हणून अनेक मुलं लग्न करत नाहीत. प्रेशर्स एकटय़ाने हाताळत राहतात. आजूबाजूचं वातावरण मात्र बदलत असतं, लोकांचे विषय बदलतात, चेहरे बदलतात. हा बदल लक्षात येतो तोवर उशीर झालेला असतो. आपल्याला कनेक्ट करेल असं आजूबाजूला कुणीच/काहीच नाही याची एकदम जाणीव होते आणि त्याचं एक वेगळं प्रेशर तयार व्हायला लागतं. 
वैयक्तिक आयुष्य आणि करिअर यांचा समतोल साधताना फक्त स्त्री कलाकारांचीच ओढाताण होते असं नाही, पुरु ष कलाकारांचीही गोची असतेच. 
त्याबद्दल बोललं जात नाही हे मात्र खरं !
 
- अभिजित खांडकेकर
ख्यातनाम अभिनेता
 
 
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
muktachaitanya11@gmail.com