शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळानं अधांतरी लटकवलं होतं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 06:05 IST

कोरोना महामारीदरम्यान चिराग मोठ्या कालावधीनंतर घरी आमच्यासोबत होता. तो काळ अत्यंत कठीण आणि अधांतरी होता, पण चिराग सोबत असल्याचा आनंदही होता. चिरागही कुटुंबासोबत राहून फ्रेश झाला. आईच्या हातचं साऊथ इंडियन फूड त्यानं चांगलं एन्जॉय केलं.

ठळक मुद्देभारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोन यांचा आदर्श चिरागनं बाळगला आहे. पदुकोन यांची कामगिरी पाहून त्याला प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्यासारखीच देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करण्यासाठी चिरागने कंबर कसली आहे.

- सुजाता व चंद्रशेखर शेट्टी (मुंबई) 

(चिरागचे पालक)

मी (चंद्रशेखर) गोरेगाव स्पोर्ट्स क्लबचा सदस्य आहे. मी खूप पूर्वीपासून तिथे स्क्वॅश खेळायला जातो. चिराग लहान होता, तेव्हापासून माझ्यासोबत खेळायला यायचा. पण तिथे बॅडमिंटन खेळणाऱ्या खेळाडूंनी त्याचं लक्ष वेधलं. तो तेव्हा ६-७ वर्षांचा होता. तेव्हापासून तो बॅडमिंटन खेळायला लागला.

चिराग जसजसं बॅडमिंटन खेळू लागला, तसतसं त्याची आवड आणि खेळातील ज्ञानही वाढत गेलं. त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची माहिती होत गेली. ऑलिम्पिकची माहिती मिळाल्यानंतर या सर्वोच्च स्पर्धेत खेळणं आणि भारताचं प्रतिनिधित्व करणं हेच त्याचं स्वप्न बनलं. त्याचा खेळही चांगला होत गेला. अनेक स्पर्धांमध्ये त्यानं छाप पाडली आणि ऑलिम्पिक खेळण्याचं लक्ष्य बाळगलं. भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोन यांचा आदर्श चिरागनं बाळगला आहे. पदुकोन यांची कामगिरी पाहून त्याला प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्यासारखीच देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करण्यासाठी चिरागने कंबर कसली आहे.

खेळ आणि अभ्यास या दोन्हीबाबतीत चिरागनं लहानपणापासूनच समन्वय राखला आहे.

खेळणं बस्स झालं, करिअरकडे लक्ष दे आता, असं कधीच चिरागला सांगावं लागलं नाही. चिराग स्वत: आपल्या अभ्यासाकडे लक्ष देऊन होता. भविष्यात आपल्याला काय बनायचं आहे, हे त्यानं ठरवलेलं होतं. दहावीला असतानाही परीक्षेच्या अखेरच्या महिन्यापर्यंत तो खेळत होता. तरीही त्यानं दहावीला ८८ टक्के मिळविले. दहावीनंतर आम्ही त्याच्याशी करिअरविषयी चर्चा केली. बॅडमिंटनबाबत तो गंभीर असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा दिला आणि त्यानं स्वत:ही आपल्या खेळाच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी स्वत:ला झोकून दिलं. त्याचीच परिणिती म्हणजे ऑलिम्पिकसाठी झालेली त्याची निवड.

तो सतत त्याच्या खेळासाठी बाहेर असतो. आमची आणि त्याची फारशी भेटही होत नाही. कोरोना महामारीदरम्यान चिराग मोठ्या कालावधीनंतर घरी आमच्यासोबत होता. तो काळ अत्यंत कठीण आणि अधांतरी होता, पण चिराग सोबत असल्याचा आनंदही होता. चिरागही कुटुंबासोबत राहून फ्रेश झाला. आईच्या हातचं साऊथ इंडियन फूड त्यानं चांगलं एन्जॉय केलं. लॉकडाऊन संपल्यानंतर मात्र तो घरी थांबला नाही. सरावासाठी पुन्हा निघून गेला. ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करून तो पुन्हा केव्हा घरी येतो, याकडे आता आमचं लक्ष लागलं आहे.

शब्दांकन - रोहित नाईक (मुंबई, लोकमत)

कॅप्शन- आई-वडील व बहीण आर्यासह चिराग.