शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
3
मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
4
आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
5
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
6
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
7
सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
8
राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!
9
'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत
10
"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
11
निसर्गाचा अजब चमत्कार! पृथ्वीवर एक असे ठिकाण जिथे कधीच पडत नाही थंडी; शास्त्रज्ञही थक्क
12
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
13
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
14
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
15
५०० वर्षांनी ५ दुर्मिळ योगात २०२६ प्रारंभ: ८ राशींना लक्षणीय लाभ, अकल्पनीय पद-पैसा; शुभ घडेल!
16
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
17
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
18
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
19
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
20
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बदलाचे भान..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 06:00 IST

राजकीय सभा, त्यातली भाषणे आणि नेत्यांची चमकोगिरी तरुणांना भुरळ घालू शकत नाही. राजकारणाबद्दल तरुणांची मते ठाम नाहीत, त्यांचे राजकीय सामाजीकरणही होत नाही, पण भुलथापांना बळी न जाता, 'हा सूर्य आणि हा जयद्रथ' अशा दृकश्राव्य माध्यमांवर तरुणांचा विश्वास असल्यामुळे राजकारणही तसे बदलत जाईल.

ठळक मुद्देनवी पिढी माहितीसाठी दृश्य, श्राव्य गोष्टींचा आधार घेते, हे बदलाचं लक्षण आहे.

-विश्राम ढोलेतरुण मुलांत विशेषत: नवमतदारांमध्ये राजकीय विचारसरणीविषयीची प्रगल्भता एकूण कमी झालेली दिसते. याचं कारण म्हणजे विविध राजकीय पक्ष, त्यांचं धोरण, इतिहास याविषयीची माहिती त्यांना कमी आहे. महाविद्यालयीन निवडणुका होत नाही, राजकारणाशी त्यांची ओळख नाही त्या अर्थानं त्याचं राजकीय सामाजिकरण फार होत नाही. तरुण मुलांना आकर्षित करतील अशा राजकीय चळवळीही आता उरलेल्या नाहीत.त्याउलट समाजमाध्यमांत तरुण मुलं राजकीय चर्चा जोरदार करतात. राजकीय मिम्सची देवाणघेवाण होते; मात्र ते मिम्स केवळ विनोद म्हणून फिरविले जातात. त्यातून त्यांचे मनोरंजन होते. राजकीय टिप्पणी म्हणून हे तरुण त्याकडे पाहतात का याविषयी शंका आहे. कारण त्यातून त्यांचे ‘राजकीय भान’ किंवा समज निर्माण होत नाही.या तरुण मुलांच्या समजून घेण्याच्या केंद्रस्थानी किंवा त्यांच्या इंटरनेट वापराच्या केंद्रस्थानी पारंपरिक विषय राहिलेले नाहीत. त्यांना जगात काय चाललेलं आहे याची माहिती असते. ते अनेक गोष्टींची जागतिक माहिती ठेवतात; मात्र ते विषय त्यांच्या आवडीचे, त्यांनी निवडलेले असतात. राजकारण-समाजकारण-जात-धर्म या चौकटींपेक्षा या तरुण मुलांचं जग वेगळं आहे.या परिस्थितीचा आणि राजकारणाचा संबंध काय?एकतर भाषणांना, त्यातल्या मुद्द्यांना ही पिढी भूलत नाही; मात्र एखादं चमकदार वाक्य, कुणीतरी दृश्यात्मक चांगल्या पद्धतीनं काही सांगितलं, दाखवलं तर ते चटकन भुलू शकतात. कारण त्यांची मतं ठाम नाही. राजकीय पक्षांना, उमेदवारांना कोणत्या निकषांवर जोखावं, समजून घ्यावं असे त्यांचे निकषच विकसित झालेले नाही. त्यांचं वयच कमी असल्यानं तसं न होणं साहजिक आहे; मात्र त्यामुळे अनुभव, वैयक्तिक अनुभव, चमकदार माहिती, त्यातून आलेलं भान यावर ते मतं ठरवितात. त्यामुळे हे सारं ‘चमको’पणाकडे जाणारं आहे; मात्र आपल्याकडे व्यवस्थाच तशी होत चाललेली आहे. नवी पिढी माहितीसाठी दृश्य, श्राव्य गोष्टींचा आधार घेते, हे बदलाचं लक्षण आहे.त्यामुळे राजकारणही आता दृश्यकेंद्री, श्राव्यकेंद्री, प्रतिमाकेंद्री होत जाईल. दृश्यकेंद्री माहिती व्यापक होत जाईल. त्याचं एक उदाहरण म्हणजे सध्या गाजत असलेल्या राज ठाकरेंच्या सभा. राजकीय पक्षांनाही आता नव्या साधनांचा आधार घेणं क्रमप्राप्त होत आहे.(लेखक समाज-संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

vishramdhole@gmail.com