शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

पौर्णिमेच्या अफाट चांदण्यातला चंद्रनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 06:00 IST

‘जो पहले कभी नाही बजाया ऐसा कुछ नया आज बजाओ...’ - सरोदवादक अली अकबर खांसाहेब यांना सी. एन. जोशी यांनी विनंती केली आणि आजवर कधीच न वाजलेली एका नव्या रागाची धून आकाराला आली. त्या रागाच्या जन्माची ही सुरेल गोष्ट..

ठळक मुद्देतीन मिनिटांच्या धूनने हजारो रसिकांना अक्षरशः बेहाल केले. अशाच काही घायाळ रसिकांनी एका मैफलीत चंद्रनंदन वाजवण्याची फरमाइश खांसाहेबांना केली आणि खांसाहेब चमकले.

- वंदना अत्रे

‘जो पहले कभी नाही बजाया ऐसा कुछ नया आज बजाओ...’ एचएमव्ही कंपनीत रेकॉर्डिंगसाठी आलेले जेमतेम विसेक वर्षांचे तरुण सरोदवादक अली अकबर खांसाहेब यांना सी. एन. जोशी म्हणाले. जोशी संगीताचे चांगलेच जाणकार; पण तरीही ‘कुछ नया बजाओ’ हे त्यांचे म्हणणे मात्र अली अकबर यांना फारसे रुचले नाही. बाबांनी, अल्लाउद्दीन खांसाहेबांनी निर्माण केलेल्या अफाट संगीताची पुरती ओळखसुद्धा अजून रसिकांना झाली नसताना ते वैभव बाजूला ढकलून हा नव्या काहीचा अट्टहास कशाला..? क्षणभरच त्यांनी बाबांचे स्मरण केले आणि दहा मिनिटांनंतर म्हणाले, ‘चला, मी तयार आहे...’ रेकॉर्डिंग रूमच्या काचबंद, जणू निर्वात अशा शांततेत त्यांनी सरोदच्या तारा छेडल्या आणि धून आकार घेऊ लागली. आजवर कधीच न वाजलेली एका नव्या रागाची धून. त्यात मालकंस-चंद्रकंसची स्पष्ट छाया होती; पण नंद-कौसी कानडाचा पदरवही ऐकू येत होता. अर्थात हे सगळे राग होते पार्श्वभागी, माइकसमोर सरोदच्या तारांमधून जे झिरपत होते ते मात्र अगदी स्वतंत्र होते, आजवर अस्पर्शित असलेले. केवळ काही मिनिटांचीच धून होती ती. ती संपवून खांसाहेब बाहेर आले. वातावरण निःशब्द.

काही सेकंदांनंतर जोशींनी विचारले, ‘रागाचे नाव काय लिहायचे?’

खां साहेब म्हणाले, ‘सांगतो...’

खोलीतून बाहेर पडता-पडता त्यांना नाव सुचले, चंद्रनंदन! चंद्राचे सौंदर्य. ती रेकॉर्ड तुफान खपली. तीन मिनिटांच्या धूनने हजारो रसिकांना अक्षरशः बेहाल केले. अशाच काही घायाळ रसिकांनी एका मैफलीत चंद्रनंदन वाजवण्याची फरमाइश खांसाहेबांना केली आणि खांसाहेब चमकले. त्या दिवशी रेकॉर्डिंग रूममध्येच अवचित जन्माला आलेला आणि नंतर विस्मरणात गेलेला चंद्रनंदन. कसे होते त्याचे रूप आणि भाव? काय सुचवायचे, सांगायचे होते त्याला? त्या क्षणी सगळे कोरे दिसत होते, रिकामे..! जन्माला येऊन उपेक्षित राहिलेला तो राग. त्याची ती एकाकी धून वाढ खुंटलेल्या हतबल मुलाप्रमाणे त्या क्षणी खांसाहेबांना तिच्या जन्माबद्दल आणि भविष्याबद्दल जाब विचारत होती...!

अस्वस्थ खांसाहेब त्यानंतर पाच वर्षं अखंड विचार करीत होते तो चंद्रनंदनचा. हे नाव उच्चारताच काय येते डोळ्यासमोर? कोणत्या भावनिक प्रदेशात रमतो हा राग? आणि कोणता रंग आनंदाने मिरवतो हा आपल्या अंगा-खांद्यावर? संस्कृतीमध्ये कुठे असतील नेमकी त्याची मुळे? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे मागत होता तो. या प्रत्येक प्रश्नाच्या खोलात उतरत जाणे कधीतरी थकवून टाकत होते; पण उत्तर मिळाल्यावर दिसणारी पुढची वाट त्या रागाच्या जवळ घेऊन जात होती.

भारतीय संगीतात एखाद्या रागाची निर्मिती हा काही वर्षे चालणारा प्रवास असतो. राग म्हणजे त्याचा स्वभाव आला, त्याची देवता आली, त्याचा ऋतू, प्रहर आणि त्यासोबत भावनेचा एक अथांग प्रदेश. उल्लंघता येणार नाही अशा त्याच्या मर्यादा आणि इंद्रियजन्य अनुभव हाही हवाच. संगीताची अनेक वर्षं साधना करूनसुद्धा कलाकारांना स्वरांचे काही प्रदेश अज्ञातच राहिलेले असतात. या पाच वर्षांच्या काळात खांसाहेब त्या आजवर कधीच भेट न दिलेल्या अज्ञात प्रदेशाच्या वाटा तुडवत होते आणि शोधत होते चार भिन्न-भिन्न रागाचे थोडे-थोडे ऋण घेऊन सहज जन्माला आलेल्या एका नव्या रागाचा नायक, देवता.

चंद्रनंदन म्हटल्यावर त्यांना दिसू लागले पौर्णिमेचे अफाट चांदणे अंगावर घेऊन पहुडलेले एक स्तब्ध जग. गूढ. पुरतेपणी कधीच हाताशी न लागणाऱ्या कृष्णासारखे. हा श्यामल कृष्ण म्हणजे चंद्रनंदन. हुरहूर लावणारे पौर्णिमेचे चांदणे म्हणजे चंद्रनंदन.

खां साहेब आणि पंडित निखिल बॅनर्जी हे एकाच गुरुचे; पण अगदी भिन्न शैली असणारे वादक. चंद्रनंदन राग जेव्हा हे दोघे एकाच व्यासपीठावर बसून वाजवताना दिसतात तेव्हा एका भल्या मोठ्या कॅनव्हासवर वेगवेगळ्या वाटा- वळणांनी जाणारा चंद्रनंदन आपल्याला दिसतो. ‘कुछ नया बजाओ’ या तीन शब्दांमधील अमर्याद ताकद जाणवून डोळे कृतज्ञ भावाने भरून येतात...

(लेखिका संगीत आस्वादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

vratre@gmail.com