शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आव्हानवीर अन् विश्वविजेता

By admin | Updated: November 29, 2014 14:42 IST

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेची सांगता दोनच दिवसांपूर्वी झाली आणि अपेक्षेप्रमाणे नॉर्वेच्या अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनने विश्‍वनाथन आनंदला पराभूत करून विश्‍वविजेतेपद राखले. गेल्या वर्षी चेन्नईमध्ये झालेल्या विश्‍वविजेतेपदाच्या लढतीत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या कार्लसनने आनंदलाच पराभूत करून विश्‍वविजेतेपद काढून घेतले होते!

- जयंत गोखले 

 
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेची सांगता दोनच दिवसांपूर्वी झाली आणि अपेक्षेप्रमाणे नॉर्वेच्या अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनने विश्‍वनाथन आनंदला पराभूत करून विश्‍वविजेतेपद राखले. गेल्या वर्षी चेन्नईमध्ये झालेल्या विश्‍वविजेतेपदाच्या लढतीत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या कार्लसनने आनंदलाच पराभूत करून विश्‍वविजेतेपद काढून घेतले होते!
जगभरातील सर्वच बुद्धिबळ खेळाडूंसाठी, बुद्धिबळप्रेमींसाठी ‘विश्‍वविजेता’ हा एक खास असा विषयच असतो. बुद्धिबळाचे विश्‍वविजेतेपद मिळविलेल्या खेळाडूकडून सर्वांच्याच काही ना काही अपेक्षा असतात. पुढील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होईपर्यंत या जगज्जेत्याकडून सर्व बुद्धिबळ जगताला भरीव आणि संस्मरणीय अशी कामगिरी हवी असते. बुद्धिबळ खेळ अजून समृद्ध करण्यासाठी हा नवीन जगज्जेता काय भर टाकणार, याचे औत्सुक्य असते. आणि आजपर्यंतची परंपरा बघता, प्रत्येक विश्‍वविजेत्याने आपल्या दर्जाला साजेशी अनमोल देणगी खेळाच्या स्वरूपातून बुद्धिबळ जगताला बहाल केली आहे.
या वेळची ही विश्‍वविजेतेपदासाठीची लढत अनेक गोष्टींसाठी वैविध्यपूर्ण होती. मागच्या वर्षीदेखील याच दोन खेळाडूंमध्ये ही लढत झाली होती आणि तेव्हा आनंद विश्‍वविजेता होता, तर कार्लसन आव्हानवीर! बरोब्बर, विरोधी भूमिकेतून या वेळची लढत लढताना दोघांवरही वेगळ्या प्रकारचे दडपण होते. कार्लसन प्रथमच विश्‍वविजेतेपद राखण्यासाठी खेळणार होता, तर आनंदला मागच्या वेळी झालेल्या पराभवाचा वचपा काढायचा होता. अर्थात, आनंदने कँडिडेट्स स्पर्धा जिंकल्यानंतर हे स्पष्ट झाले होतेच, की यंदाची लढत परत याच खेळाडूंमध्ये होईल आणि दोघेही खेळाडू त्यानुसार जय्यत जयारी करूनच आले होते.
इथे एक गोष्ट विशेषत्वाने नमूद करायला हवी आणि ती म्हणजे, आनंदचे आव्हानवीर म्हणून परत येणे! मागील वर्षीच्या लढतीत कार्लसनकडून दारुण पराभव झाल्यामुळे बहुतेकांनी ‘आनंद आता संपला’ असे ठरवूनच टाकले होते. अगदी, मॅग्नस कार्लसनसाठीसुद्धा आनंदने ती स्पर्धा जिंकून आव्हानवीर म्हणून उभे राहणे पूर्णपणे अनपेक्षित होते. त्याने दिलखुलासपणे आनंदचे कौतुक करताना ही गोष्ट जाहिररीत्या कबूलदेखील केली होती..
आव्हानवीर म्हणून निवड झाल्यानंतर मात्र पुढच्या काही महिन्यांत आनंदचा खेळ त्याच्या दर्जाला साजेसा होत नव्हता. याउलट, कार्लसन मात्र विश्‍वविजेता होण्याच्या आधीपासूनच पूर्ण भरात होता आणि विश्‍वविजेतेपदाच्या लढतीआधी त्याने ‘रॅपिड’ व ‘ब्लिट्झ’ या दोन्ही जलद प्रकारांतील जागतिक अजिंक्यपदेदेखील मिळविली. आणि यामुळेच अशा वेळी यंदाची जागतिक लढतदेखील मागील लढतीप्रमाणेच एकतर्फी होणार, अशी भीती बुद्धिबळ रसिकांना वाटत होती. परंतु, या लढतीसाठी आनंदने केलेल्या सर्वांगीण तयारीची चुणूक दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ‘बिलबाओ’ स्पर्धेत बघायला मिळाली. आनंदने या स्पर्धेचे विजेतेपद आरामात मिळविताना आरोबियान कलआना-क्रॅमनिक या खेळाडूंवर ज्या सफाईने विजय मिळविले, ते बघून कार्लसनदेखील खडबडून जागा झाला होता आणि या वेळी आनंदचे पाणी वेगळे असणार आहे, याचा पुरेपूर अंदाज त्याला आला!
स्पर्धेच्या आधी काही दिवस उगीचच विविध वावड्या उठत होत्या, की कार्लसन खेळणार नाहीये.. काही दिवसांनी हा धुरळा शांत झाला आणि कार्लसन त्याच्या संघासह ठरल्याप्रमाणे ‘सोचीत’ दाखल झाला. आनंदला आता अशा मनोवैज्ञानिक डावपेचांची सवय झाली असल्यामुळे अशा अफवांवर कुठलीही प्रतिक्रिया न देता शांत राहणे त्याने पसंत केले.
एकूणच सामने रंगतदार झाले. आनंदचे प्रभुत्व डावातील मध्य भागावर आहे आणि जेवढी गुंतागुंत जास्त होत जाते, तेवढा आनंदचा खेळ खुलत जातो; परंतु त्यासाठी त्याने राजाच्या पुढच्या प्याद्याने सुरुवात करणे योग्य ठरले असते, असे बहुतेकांचे मत झाले होते. एक गमतीचा भाग म्हणजे, आनंदने त्याच्या एवढय़ा वैभवशाली आणि यशस्वी कारकिर्दीत कायमच राजाच्या पुढच्या प्याद्याने सुरुवात केली. अखेर हार-जीत हा खेळाचाच एक भाग असतो. कुणीतरी आव्हानवीर ठरतो आणि कुणीतरी विजेता.. आनंदचे आव्हानवीर म्हणून परतणे हे देखील तितकेच महत्त्वाचे मानायला हवे. कार्लसनच्या खेळीबद्दल त्याला दाद मिळायलाच हवी. 
हार-जीत कुणाचीही असो, खिलाडूपण जपले जाणे केव्हाही महत्त्वाचे. 
(लेखक छत्रपती पुरस्कार विजेते 
बुद्धिबळपटू आहेत.)