- ओंकार करंबेळकर
मुंबईच्या कांदिवलीतील ‘व्हिस्परिंग पाम्स’ हे एक विशाल कॉम्प्लेक्स. काही हजार लोक या सोसायटीत राहतात. ट्रॅफिक जाम, प्रदूषण, कार्यालयात जाण्यायेण्यासाठी इथल्या लोकांचे होणारे अतोनात हाल संतोष शेट्टी या युवकाच्या लक्षात आले आणि त्यानं लढवली एक अनोखी शक्कल!
रिक्षा असो, कार असो किंवा टॅक्सी. कोणीही एकेकटा प्रवास न करता त्या मार्गानं जाणा:या इतरांना सोबत घ्यायचं. त्यातूनच तयार झाला एक व्हॉट्सअॅप ग्रुप. अनेक गोष्टी त्यातून सुटल्या, सोप्या झाल्या. प्रत्येक सदस्य स्वत:हून इतरांना लिफ्ट देऊ लागला. विश्वास आणि सहकार्याची भावना वाढली. लोक सुख-दु:खाचे सोबती झाले. महिलांना तर खूपच फायदा झाला. सगळ्यांचा रोजचा प्रवास सहज, सुरक्षित झाला. सदस्यांचे स्नेहमेळावे, नृत्य- संगीताचे कार्यक्रम, खेळांच्या स्पर्धा आयोजित होऊ लागल्या. अनेक उपगट निर्माण झाले आणि हजारो सदस्यांचं एक विस्तृत कुटुंब तयार झालं.
घामेघूम होऊन तुम्ही रेल्वे स्टेशनवर उतरता आणि ऑफिस गाठण्यासाठी टॅक्सी, रिक्षा शोधायला लागता.. केवळ एकच एक माणूस बसलेल्या कार्स तुमच्या समोरून भर्रकन निघून जातात आणि तुम्ही टॅक्सीवाल्याची नकारघंटा ऐकत पुढे चालू लागता.
मुंबई, दिल्ली, बेंगळुरूसारख्या मोठय़ा शहरांमधील हे नेहमीचे चित्र आहे. बहुतांश अंतरांवर टॅक्सीने जाणो आपल्याला परवडणारे नसते आणि गर्दीचा वाढता रेटा पाहता लोकलचा प्रवास केवळ अशक्य वाटू लागतो. उपनगरांमधून मुख्य शहरामध्ये कामासाठी येणा:या लोकांसाठी प्रवास हा रोजचाच प्रश्न झाला आहे. वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची अपुरी साधने यांचा मेळ न बसल्याने वाहतुकीची कोंडी, प्रदूषण आणि प्रवासावर प्रचंड खर्च अशा दुष्टचक्रामध्ये शहरांमधील लोक सापडले आहेत.
राजधानी नवी दिल्लीमध्ये प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्यावर सर्वोच्च न्यायालयासह सर्वाना त्याची गंभीर दखल घ्यावी लागली. त्यामुळेच तेथे ‘सम-विषम’सारखा प्रयोग राबवावा लागला. या योजनेत अजूनही अडथळे आणि समस्या येत आहेत. मुंबईतदेखील देवनार कचराक्षेत्रस लागणा:या आगीमुळे होणारा धूर, कारखान्यांचा धूर, चेंबूर-गोवंडीसारखे सर्वाधिक प्रदूषित विभाग आणि गाडय़ांची वाढती संख्या पाहता असे पाऊल भविष्यामध्ये उचलण्याची वेळ फार दूर नाही असे वाटते.
एका बाजूस सार्वजनिक वाहनांची प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता संपल्यामुळे हतबल झालेले प्रवासी आणि दुसरीकडे गाडीतून एकटेच फिरणारे लोक अशा दरीमध्ये मुंबईसारखी शहरे सापडली आहेत. सम-विषम क्रमांकाच्या गाडीसारख्या योजना आपल्याकडे येण्यापेक्षा या समस्येवर काही उपायांचा विचार करण्याची गरज आहे. मुंबईमध्ये एका सोसायटीने यावर उपाय शोधून काढला आहे. तो म्हणजे ‘कार पूलिंग’चा. कार पूलिंग म्हणजे सोप्या शब्दांमध्ये मोकळ्या कारचालकाने इतरांना लिफ्ट देणो. ही लिफ्ट मोफत असू शकते किंवा कारमालक त्याबदल्यात पैसेही घेऊ शकतो.
मुंबईमधील कांदिवलीतील ‘व्हिस्परिंग पाम्स’ या विशाल कॉम्प्लेक्समध्ये काही हजारांहून अधिक लोक राहतात. यामधील बहुतांश लोक कांदिवलीपासून दूर कार्यालयांमध्ये काम करतात. बहुतेकांना आपली गाडी घेऊन बाहेर जावे लागे, तर दुस:या बाजूस लोकलने प्रवास करणा:या लोकांना स्टेशनर्पयत जाण्यासाठी रिक्षाही वेळेवर मिळत नसे. एकेकटे लोक कारमधून निघून जात आणि ट्रॅफिक जामचा सामना करत ऑफिसमध्ये पोहोचत. या रोजच्या स्थितीचे निरीक्षण संतोष शेट्टी नावाचा तरुण रोजच करत होता. रोजचा प्रवास अधिकाधिक सोपा कसा होईल याबद्दल विचार करताना त्याला कार पूलिंगची कल्पना सुचली. एकाच दिशेने जाणा:या लोकांनी इतर लोकांना सामावून घेऊन त्यांना मदत का करू नये, असा प्रश्न त्याच्या मनामध्ये आला. आपल्या मनातील ही कल्पना त्याने सोसायटीच्या इ-मेल ग्रुपवर सर्वाना सांगितली. आपण जर एखाद्या दिशेने जात असू तर ते आसपासच्या लोकांना सांगायचे आणि कोणी व्यक्ती त्याच बाजूस येणार असेल तर त्याला मदत करायची इतकी साधी कल्पना त्याने सर्वाना सांगितली. ग्रुपमधील लोकांनी ती ताबडतोब उचलून धरली आणि त्यांनी ‘लिफ्ट करा दे’ नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप स्थापन केला. रोज घराबाहेर पडण्यापूर्वी थोडावेळ आधी या ग्रुपवर आपण जात असण्याचा मार्ग सांगायचा आणि त्याला प्रतिसाद देणा:यांना गाडीतून घेऊन जायचे असा रोजचा क्रम सुरू झाला. पाहता पाहता याला सोसायटीतील रहिवाशांचा जोरदार पाठिंबा मिळाला आणि ग्रुपच्या सदस्यांची संख्या झपाटय़ाने वाढत गेली.
व्हिस्परिंग पाम्समधील सदस्यांना कार पूलिंगचे फायदे काही दिवसांतच दिसून आले. वर्षानुवर्षे शेजारी राहणारे लोक; ज्यांचे केवळ नमस्कारांखेरीज कोणतेही संबंध नव्हते, त्यांच्या नव्याने ओळखी झाल्या. गाडीतील प्रवासाच्या तासा-दोन तासांमध्ये ते विविध विषयांवर एकमेकांशी मोकळेपणाने बोलू लागले, त्यांच्यामध्ये चर्चा होऊ लागल्या. कित्येकदा सोसायटीमधील प्रश्नही त्यांनी गाडीमध्ये बसूनच सोडविले. इतकेच नव्हे तर व्यवसायांमधील अनेक करारही या प्रवासातच त्यांनी तडीस नेले. या ग्रुपमध्ये विविध क्षेत्रंमधील लोकांनी सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यामुळे नव्या माहितीचे आदानप्रदान प्रवासात होऊ लागले. या गटामध्ये माधव आजगावकर हे सदस्य होते. जर ग्रुप इतक्या चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर त्याचे एक गाणोही असले पाहिजे अशी कल्पना त्यांनी मांडली आणि ‘लिफ्ट करा दे’ नावाचे गाणो लिहून ते संगीतबद्धही केले. त्याचे पुढे चित्रीकरण करून व्हिडीओ गाणोही बनविण्यात आले. यामध्येही सोसायटीमधील लोकांनीच सहभाग घेतला आहे. कार पूलिंगची ही जादू संपूर्ण सोसायटीमध्ये एकात्मतेची भावना जागृत करून गेली. या योजनेचा दिवसेंदिवस विकास होत गेला. त्यामुळे बाहेरगावी पुणो-नाशिक असे लांब पल्ल्याच्या प्रवासाला जायचे असले तरी लोक एकमेकांना विचारू लागले आणि त्या दिशेला जाणा:यांना मदत करू लागले. ओला-उबर सारख्या टॅक्सी किंवा साध्या रिक्षा जरी बुक केल्या तरी आपल्याबरोबर कोणी येऊ शकेल का याचा रहिवासी विचार करू लागले. या सर्व प्रयत्नांमुळे त्यांच्यामध्ये आपलेपणाची भावना वाढीस लागली. सोसायटी ही केवळ सदनिकांची एकावर एक केलेली इमारतीची रचना नसून आपण सर्व एक मोठे कुटुंबच आहोत असे त्यांना वाटू लागले. मदतीची भावना आणि विश्वास याच्या भांडवलावरच त्यांनी ‘लिफ्ट करा दे’ सारखा उपक्रम यशस्वी केला. याचा सर्वात जास्त फायदा महिलांना झाला. सोसायटीमधील महिलांना दुपारी डॉक्टरांकडे किंवा कार्यालयांमध्ये जायचे असल्यास प्रचंड समस्यांचा सामना करावा लागे. स्टेशनर्पयत जाणोही कित्येकदा मुश्कील व्हायचे. आता याच महिला सरळ व्हॉ्टसअॅपवर आपल्या शेजा:यांकडून लिफ्ट मागू लागल्या किंवा देऊही लागल्या. या महिला ‘आता आम्हाला अधिक सुरक्षित वाटते’ असा अनुभव बोलून दाखवतात. लोकलच्या रोजच्या प्रवासातून झालेली सुटका आणि सुरक्षितता यामुळे त्यांना मनापासून झालेला आनंद त्या व्यक्त करतात. असे नेहमी एकाच गाडीतून जाणारे, एकाच दिशेने जाणारे उपगटही निर्माण झाले. त्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मीयता आणखी वाढीस लागली.
संतोष शेट्टीने रोवलेल्या कार पूलिंगच्या या बीजाचे खरे परिणाम हे त्यातून निर्माण झालेल्या सामाजिकतेच्या भावनेमध्ये दिसू लागले. सोसायटीमध्ये आपत्कालीन स्थितीमध्येही तत्काळ मदत मिळू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली. याचा पुढचा टप्पा म्हणजे सोसायटी रहिवाशांचे स्नेहमेळावे आयोजित करू लागली. सर्व सदस्य अशा कार्यक्रमात एकत्र येऊन आपली व आपल्या कुटुंबीयांची ओळख करून देतात. नृत्य-संगीताच्या कार्यक्रमात सहभाग घेतात आणि त्यांचा आस्वाद घेतात. सोसायटीने क्रिकेट- व्हॉलीबॉलसारख्या खेळांचे आयपीएलप्रमाणो लीगसामनेही भरवणो सुरू केले. यामध्ये चक्क संघ विकत घेणो, त्यासाठी लिलाव वगैरे गोष्टीही आयपीएलप्रमाणो केल्या जातात आणि हे सर्व सदस्यच करत असतात. ‘लिफ्ट करा दे’ हे एकप्रकारे मुंबईकरांचे ‘ऑड-इव्हन’ धोरणच म्हणायला हवे. आज तुम्ही माङया गाडीतून प्रवास करता, तर उद्या मी तुमच्या गाडीतून प्रवास करेल. त्यामुळे साहजिकच दोन गाडय़ांऐवजी एकच गाडी रस्त्यावर येते आणि आपसूकच एकप्रकारची ‘ऑड-इव्हन’ योजना आकारास येते.
पाश्चिमात्य देशांमधील सुबत्ता आणि वाहनांचे बेसुमार उत्पादन यामुळे त्या देशांमधील वाहतुकीची समस्या फारच गंभीर झालेली होती किंबहुना आजही आहे. जगातील सर्वच महत्त्वाच्या मोठय़ा शहरांमध्ये प्रदूषणाची समस्या आहे. तेलाची टंचाई भासू लागल्यावर अमेरिकेने कार पूलिंगचा उपाय अंमलात आणण्याचे निश्चित केले आणि कार पूलिंगला विशेष दर्जाही दिला. कार पूलिंगसाठी रस्त्यांवर स्वतंत्र कारपूल लेन ही मार्गिकाही आरक्षित केलेली असते. या कारपूल लेनमध्ये दोन किंवा अधिक प्रवासी घेऊन जाणा:या कार पूलर्सनाच जाता येते. युरोपातील देशांनीही याचा वापर सुरू केला आहे.
सध्या पॅरिसमध्ये चारचाकी गाडय़ांच्या अतिरिक्त संख्येचा प्रश्न सर्वाधिक जास्त चर्चेत आहे. या गाडय़ांच्या सुळसुळाटाचे करायचे काय या विचारात तेथील प्रशासक आहेत. यासाठी सीन नदीच्या जवळील काही भाग तसेच महत्त्वाच्या परिसरामध्ये गाडय़ांना बंदी घालण्याचा विचार सुरू केला आहे. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पॅरिसने ‘डे विदाउट कार’ असा दिवसही साजरा केला. यादिवशी लोकांनी आपल्या गाडय़ा बाहेर काढल्या नाहीत. परंतु तरीही प्रदूषणाची वाढती पातळी पाहता पॅरिससाठी हे उपाय फारसे उपयोगी ठरणारे नाहीत. युरोपातील शहरांमधील मुख्य गजबजलेल्या केंद्रामध्ये जायचे असेल तर विशेष करही आकारला जातो. प्रदूषणाशी लढण्यासाठी नव्या कल्पनांचा आधार घेतला जात आहे. ‘ऑड-इव्हन’ योजना कितपत यशस्वी होते हे पाहण्यापेक्षा, अशी स्थिती भारतातील इतर शहरांवर येणार नाही याची काळजी आपल्याला आताच घ्यावी लागेल.
थेट फायदे
- वाहतुकीची कोंडी कमी होते.
- प्रदूषणात लक्षणीय घट होते.
- सार्वजनिक वाहतूक साधनांवरचा ताण कमी होतो.
- लिफ्ट देणा:याच्या इंधनाचा खर्च कमी,
- प्रवाशांनाही कमी खर्चात प्रवास करता येतो.
- टोल वगैरे खर्चही विभागून करता येतात.
- प्रवासाचा ताण, वाहन चालविण्याचा ताण कमी होतो.
कसे चालते ग्रुपचे काम?
व्हिस्परिंग पाम्सने ‘लिफ्ट करा दे’ हा व्हॉट्सअॅप ग्रुप स्थापन केला आहे. समजा एखादा सदस्य कांदिवलीवरून दादरला जात असेल तर तो चॅटमध्ये निळ्या रंगाचा ठिपका देऊन तसे नमूद करतो. या मार्गावरती दुसरे सदस्य जाणार असतील तर ते त्यास प्रतिसाद देतात आणि त्या गाडीमधून जातात. जर आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचे असेल आणि कोणी त्या बाजूस जाणार आहे का अशी चौकशी करायची असेल तर लाल ठिपका देऊन तो आपण कोणत्या बाजूस जायचे आहे ते नमूद करतो. लाल आणि निळे ठिपके इतर सदस्यांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे गरजेच्या आणि केवळ उपयोगी माहितीकडेच त्यांचे लक्ष जाते. या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये या संदेशांव्यतिरिक्त कोणताही इतर संदेश प्रसारित करण्याची परवानगी नाही. गुड मॉर्निग, गुड इव्हिनिंगसारखे संदेश किंवा विनोद पाठविण्यास सक्त मनाई आहे. (अर्थात एखादा रस्ता खराब झाला असेल, कोठे वाहतूक कोंडी असेल, पाणी साचले असेल तर अशी माहिती देण्यास परवानगी आहे.) इतकेच नव्हे तर ग्रुपचे सदस्यत्व मिळविण्यासाठीही आपल्या व्यावसायिक इमेलवरून संपूर्ण माहिती पाठवावी लागते आणि बँकेप्रमाणो पूर्वीच्या एखाद्या सदस्याची ओळख सांगावी लागते. इतकी खातरजमा केल्यानंतरच ग्रुपचे सदस्यत्व देण्यात येते. प्रत्येक नव्या सदस्याला नियमांची एक प्रत पाठवून त्याला नियम समजावून दिले जातात. ग्रुपवरील सर्वात जास्त काम हे सकाळी ऑफिसला जाण्याच्या वेळेस आणि संध्याकाळी घरी परततानाच चालते. दुपारी त्याचा वेग मंदावलेला असतो. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करत असताना व्हॉट्सअॅपचा संदेश आल्यावर होणा:या आवाजाचा त्रसही होत नाही. ‘लिफ्ट करा दे’ चे आता स्वतंत्र अॅप करण्याची तयारी सुरू असून, सोसायटीमधीलच एक सदस्य त्यावर काम करत आहे. कार पूलिंगसाठी हे सदस्य कोणतेही पैसे आकारत नाहीत. केवळ एकमेकांना मदत, एवढीच त्यामागील भावना आहे.
स्मार्ट मुंबईकर
आताचा जमाना आहे तो अॅपचा आणि स्टार्टअप्सचा. कांदिवलीमध्येच राहणा:या रक्षित सेठ नावाच्या भन्नाट मुलाच्या डोक्यातही नेहमी स्टार्टअपची आणि काहीतरी नव्या विचारांची चक्रे सुरू असतात. मुंबईत वाहनांची संख्या आणि लोकलमधील गर्दीतून होणारे हाल त्याने डोळ्यांनी पाहिले आणि अनुभवलेही. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि ट्रॅफिक कमी करण्यासाठी कार पूलिंगचा उपाय लोकांर्पयत पोहोचायला हवा अशी कल्पना त्याच्या मनामध्ये आली आणि त्यानेही व्हॉट्सअॅपची मदत घेतली. व्हॉट्सअॅपवर विविध मार्गावरील लोकांचे गट त्याने स्थापन केले. उदाहरणार्थ बोरिवली-कांदिवली, नवी मुंबई, ठाणो, फोर्ट. अशा भागांमधून दररोज प्रवास करणारे लोक गाडी बाहेर काढण्यापूर्वी या ग्रुपवर माहिती देऊ लागले. जर एखादा सदस्य वाटेत असेल किंवा त्याच दिशेने जाणार असेल तर तो त्यास प्रतिसाद देऊन त्याबरोबर जाऊ लागला. यासाठी कारच्या मालकास प्रति किलोमीटर अडीच रुपये असा दरही ठरविण्यात आला आहे. केवळ व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून चालणारे गट अत्यंत यशस्वी ठरले आहेत. स्मार्ट मुंबईकर या नावाने हे गट चालवले जातात.
या कार पूलिंगबाबत बोलताना रक्षित सांगतो, ‘सार्वजनिक वाहनांवर मोठा ताण आहे. बहुतांश लोकांना याचा त्रस होतो. पण केवळ पर्याय नाही म्हणून त्यांना इतर मार्गाचा वापर करता येत नाही. दुसरीकडे कारने जाणारे लोक केवळ एकेकटेच प्रवास करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीही होते आणि लोकांची गैरसोयही होते. त्यामुळेच गरजवंत आणि लिफ्ट देणा:यांची भेट घालून देण्यासाठी मी हे गट स्थापन केले. यामध्ये लिफ्ट देणा:याच्या इंधन खर्चाचा ताणही थोडा हलका होतो. या गटांमध्ये सदस्यत्व मिळविण्यासाठी त्यांची पूर्ण चौकशी करूनच त्यांना मी सदस्यत्व देतो त्यामुळे लोक एकमेकांना न घाबरता मदत करू शकतात. खरे सांगायचे झाले तर विश्वास हेच खरे इंधन आहे. विश्वासाच्या जोरावरच हे गट चालतात. हे गट अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू असून, त्यास प्रतिसाद वाढत आहे. मी फक्त गरजवंत आणि वाहनचालक यांची भेट घालून दिली. बाकी प्रवास लोक विश्वास व निखळ मैत्रीच्या आधारावरच पार पाडतात. रिक्षावाले, टॅक्सी यांचा संप असला तरी आम्हाला कोणतीच अडचण येत नाही. दररोज एकत्र प्रवास करणा:यांमध्ये घनिष्ठ मैत्री होऊन त्यांचे गट निर्माण झाले आहेत. या सदस्यांची आम्ही स्नेहसंमेलने तसेच क्रिकेटच्या सामन्यांप्रमाणो भरपूर कार्यक्रम आयोजित करतो. यामुळे हे एकप्रकारचे कुटुंंबच तयार झाले आहे. मुंबईमध्ये ‘ऑड-इव्हन’ योजना लागू करण्यापेक्षा असे कार पूलिंग मोठय़ा पातळीवर सुरू झाल्यास ते जास्त फायदेशीर ठरेल. प्रदूषणाची पातळी कमी करणो, वाहतूक कोंडी संपविणो, कमी खर्चात प्रवास, सोयीस्कर प्रवास असे कितीतरी फायदे यातून आपल्याला होऊ शकतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा ताणही थोडा कमी होईल.’
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत)
onkark2@gmail.com