शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

बॉलिवूडच्या चाकांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 06:05 IST

कोरोनामुळे बॉलिवूडचे जवळपास नऊ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. जगातील मोठा व्यवहार असणारे हे मनोरंजन विश्व एकाही रुपयांची उलाढाल न करता थबकले. इतिहासात हे प्रथमच घडले आहे.

ठळक मुद्देसिनेमा जगताचेच नव्हे तर यावर अवलंबून असलेल्या सुमारे २५ लाख लोकांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

- संदीप आडनाईक

कोरोनामुळे जगभर न भुतो न भविष्यती असे नुकसान झालेले आहे. यातून सिनेउद्योगही सुटलेला नाही. जगभरातील सिनेमा जगताला याचा मोठा फटका बसलेला आहे. मात्र, जगभरात ज्या हिंदी चित्रपटसृष्टीने आपले नाव ठसठशीतपणे कोरलेले आहे, त्या बॉलिवूडलाही बसलेला फटका काही कमी नाही. बॉलिवूडचे जवळजवळ नऊ हजार कोटी रुपयांचे नुकसान कोरोनाच्या महामारीमुळे झाले आहे. यामुळे हिंदी सिनेमा उद्योगाची चाके संपूर्णपणे थंडावली. जगातील मोठा व्यवहार असणारे हे मनोरंजन विश्व एकाही रुपयांची उलाढाल न करता थबकले आहे, आणि हे इतिहासात प्रथमच घडले आहे.

सिनेमा जगताचेच नव्हे तर यावर अवलंबून असलेल्या सुमारे २५ लाख लोकांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आता चित्रपटगृह सुरू झाले असले तरी प्रेक्षक नेहमीप्रमाणे चित्रपटगृहात यायला आणि हा उद्योग भरात यायलाच आणखी तीन ते चार महिने लागणार आहेत.

कोरोनामुळे अनेक बड्याबड्या कलाकारांनी आपल्या कामाचे स्वरूप बदलले. काही कलाकारांनी तर शेती सुरू केली. काहींनी स्वयंपाकघरात मुक्काम ठोकला. अनेकांना यामुळे आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागला. आयफा, झी सिनेमा अवॉर्ड्ससारखे देशातील मोठे चित्रपट पुरस्कार सोहळेही रद्द करण्यात आले आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवाच्या तारखाही प्रथमच पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

हिंदी सिनेमांचे नुकसान

कोरोना विषाणूमुळे सप्टेंबरच्या मध्यात सुमारे १५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. व्याजाची वाढती रक्कम, तंत्रज्ञांचे पगार, मेन्टेनन्स चार्जेससह अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. याशिवाय अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. केंद्र सरकारकडून या काळात कोणतीही आर्थिक मदत या इंडस्ट्रीला झालेली नाही. त्यामुळे हे केवळ आरोग्य संकट नव्हते तर आर्थिक संकट होते. ट्रेड विश्लेषक समीर दीक्षित यांच्या मते नुकसानीचा अंदाज आता नऊ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

0१८ मध्ये चित्रपट उद्योगाला १०,२०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, तर २0१९ मध्ये ही रक्कम ११,५०० कोटी रुपये इतके होती. प्रादेशिक चित्रपटांमधून सुमारे ५00 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. हिंदी चित्रपटांसह २0१९ मध्ये एकूण १८३३ चित्रपटांची निर्मिती झाली तर १४६0 प्रादेशिक चित्रपटांची निर्मिती झाली. 0१९च्या आकडेवारीनुसार चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहणाऱ्यांची संख्या दहा कोटी होती. मराठीचा आकडा सुमारे चारशे कोटी रुपयांचा आहे.

चित्रपटगृहांना मोठा आर्थिक फटका

देशभरात एकूण ९५३७ चित्रपटगृहे असून, त्यात ६३२७ एकपडदा आणि ३२00 मल्टिप्लेक्स आहेत. मार्चपासून ती बंद असल्याने आजअखेर ९००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. परदेशातून २0१९ मध्ये २७00 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर यंदा पाणी सोडावे लागले. याशिवाय जाहिरातींपासून मिळणारे उत्पन्न हे ७७०० कोटी रुपयांचे आहे. चित्रपटगृहे जेव्हापासून बंद झाली, तेव्हापासून केबल टेलिव्हिजन आणि ओटीटी ही माध्यमे सिनेमासाठी पर्याय ठरली असली तरी या माध्यमांवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची संख्या कमी आहे. आतापर्यंत ५० पेक्षा जास्त चित्रपट या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. कोरोनाचा बॉलिवूडवर एवढा परिणाम यापूर्वी कधीच झाला नव्हता. सरकारने आधी दिल्ली, केरळ, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीरमधली चित्रपटगृहं बंद ठेवण्याचे आदेश दिले आणि नंतर मुंबईतली चित्रपटगृह बंद ठेवण्याचे आदेश दिले, त्यानंतर देशभरातील सर्वच चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली. चित्रपट प्रदर्शितच न झाल्याने या काळात सर्वात मोठा फटका चित्रपटगृह मालकांना बसला. त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आयनॉक्स, पीव्हीआर, सिनेपोलिस, कार्निव्हल सिनेमा अशा मोठ्या कंपन्यांच्या बहुपडदा चित्रपटगृहांनाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. याशिवाय या व्यवसायावर अवलंबून असलेल्या २५ लाख लोकांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळी आणि नाताळच्या तोंडावर चित्रपटगृहे सुरू झाली तरी अनेक जाचक अटींमुळे नेहमीचे उत्पन्न त्यांना मिळणार नाहीच, शिवाय जागेच्या भाड्याची रक्कमही देता येणार नाही, अशी स्थिती आहे. चित्रपटगृहे बंद होण्यापूर्वी साडेसहाशे कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली होती, असे मत सिनेमा ओनर्स अॅण्ड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार यांनी व्यक्त केले आहे.

(लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहेत.)

sandip.adnaik@gmail.com