शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

बॉलिवूडच्या चाकांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 06:05 IST

कोरोनामुळे बॉलिवूडचे जवळपास नऊ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. जगातील मोठा व्यवहार असणारे हे मनोरंजन विश्व एकाही रुपयांची उलाढाल न करता थबकले. इतिहासात हे प्रथमच घडले आहे.

ठळक मुद्देसिनेमा जगताचेच नव्हे तर यावर अवलंबून असलेल्या सुमारे २५ लाख लोकांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

- संदीप आडनाईक

कोरोनामुळे जगभर न भुतो न भविष्यती असे नुकसान झालेले आहे. यातून सिनेउद्योगही सुटलेला नाही. जगभरातील सिनेमा जगताला याचा मोठा फटका बसलेला आहे. मात्र, जगभरात ज्या हिंदी चित्रपटसृष्टीने आपले नाव ठसठशीतपणे कोरलेले आहे, त्या बॉलिवूडलाही बसलेला फटका काही कमी नाही. बॉलिवूडचे जवळजवळ नऊ हजार कोटी रुपयांचे नुकसान कोरोनाच्या महामारीमुळे झाले आहे. यामुळे हिंदी सिनेमा उद्योगाची चाके संपूर्णपणे थंडावली. जगातील मोठा व्यवहार असणारे हे मनोरंजन विश्व एकाही रुपयांची उलाढाल न करता थबकले आहे, आणि हे इतिहासात प्रथमच घडले आहे.

सिनेमा जगताचेच नव्हे तर यावर अवलंबून असलेल्या सुमारे २५ लाख लोकांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आता चित्रपटगृह सुरू झाले असले तरी प्रेक्षक नेहमीप्रमाणे चित्रपटगृहात यायला आणि हा उद्योग भरात यायलाच आणखी तीन ते चार महिने लागणार आहेत.

कोरोनामुळे अनेक बड्याबड्या कलाकारांनी आपल्या कामाचे स्वरूप बदलले. काही कलाकारांनी तर शेती सुरू केली. काहींनी स्वयंपाकघरात मुक्काम ठोकला. अनेकांना यामुळे आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागला. आयफा, झी सिनेमा अवॉर्ड्ससारखे देशातील मोठे चित्रपट पुरस्कार सोहळेही रद्द करण्यात आले आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवाच्या तारखाही प्रथमच पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

हिंदी सिनेमांचे नुकसान

कोरोना विषाणूमुळे सप्टेंबरच्या मध्यात सुमारे १५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. व्याजाची वाढती रक्कम, तंत्रज्ञांचे पगार, मेन्टेनन्स चार्जेससह अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. याशिवाय अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. केंद्र सरकारकडून या काळात कोणतीही आर्थिक मदत या इंडस्ट्रीला झालेली नाही. त्यामुळे हे केवळ आरोग्य संकट नव्हते तर आर्थिक संकट होते. ट्रेड विश्लेषक समीर दीक्षित यांच्या मते नुकसानीचा अंदाज आता नऊ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

0१८ मध्ये चित्रपट उद्योगाला १०,२०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, तर २0१९ मध्ये ही रक्कम ११,५०० कोटी रुपये इतके होती. प्रादेशिक चित्रपटांमधून सुमारे ५00 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. हिंदी चित्रपटांसह २0१९ मध्ये एकूण १८३३ चित्रपटांची निर्मिती झाली तर १४६0 प्रादेशिक चित्रपटांची निर्मिती झाली. 0१९च्या आकडेवारीनुसार चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहणाऱ्यांची संख्या दहा कोटी होती. मराठीचा आकडा सुमारे चारशे कोटी रुपयांचा आहे.

चित्रपटगृहांना मोठा आर्थिक फटका

देशभरात एकूण ९५३७ चित्रपटगृहे असून, त्यात ६३२७ एकपडदा आणि ३२00 मल्टिप्लेक्स आहेत. मार्चपासून ती बंद असल्याने आजअखेर ९००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. परदेशातून २0१९ मध्ये २७00 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर यंदा पाणी सोडावे लागले. याशिवाय जाहिरातींपासून मिळणारे उत्पन्न हे ७७०० कोटी रुपयांचे आहे. चित्रपटगृहे जेव्हापासून बंद झाली, तेव्हापासून केबल टेलिव्हिजन आणि ओटीटी ही माध्यमे सिनेमासाठी पर्याय ठरली असली तरी या माध्यमांवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची संख्या कमी आहे. आतापर्यंत ५० पेक्षा जास्त चित्रपट या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. कोरोनाचा बॉलिवूडवर एवढा परिणाम यापूर्वी कधीच झाला नव्हता. सरकारने आधी दिल्ली, केरळ, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीरमधली चित्रपटगृहं बंद ठेवण्याचे आदेश दिले आणि नंतर मुंबईतली चित्रपटगृह बंद ठेवण्याचे आदेश दिले, त्यानंतर देशभरातील सर्वच चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली. चित्रपट प्रदर्शितच न झाल्याने या काळात सर्वात मोठा फटका चित्रपटगृह मालकांना बसला. त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आयनॉक्स, पीव्हीआर, सिनेपोलिस, कार्निव्हल सिनेमा अशा मोठ्या कंपन्यांच्या बहुपडदा चित्रपटगृहांनाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. याशिवाय या व्यवसायावर अवलंबून असलेल्या २५ लाख लोकांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळी आणि नाताळच्या तोंडावर चित्रपटगृहे सुरू झाली तरी अनेक जाचक अटींमुळे नेहमीचे उत्पन्न त्यांना मिळणार नाहीच, शिवाय जागेच्या भाड्याची रक्कमही देता येणार नाही, अशी स्थिती आहे. चित्रपटगृहे बंद होण्यापूर्वी साडेसहाशे कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली होती, असे मत सिनेमा ओनर्स अॅण्ड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार यांनी व्यक्त केले आहे.

(लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहेत.)

sandip.adnaik@gmail.com