शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

काला पत्थर

By admin | Updated: May 14, 2016 12:52 IST

इटालिअन कवी दान्तेनं 14 व्या शतकात लिहिलेलं ‘इन्फर्नो’ हे महाकाव्य. ‘द डिव्हाईन कॉमेडी’ या त्याच्या कवितेत आत्म्याचा परमात्म्यार्पयतचा प्रवास रेखाटताना दान्तेनं एक रूपक वापरलं आहे. पृथ्वीच्या पोटातल्या गुडूप अंधारात एकामागून एक चक्राकार असणारी नरकाची नऊ वर्तुळं तो सांगतो

 
सुधारक ओलवे
 
इटालिअन कवी दान्तेनं 14 व्या शतकात लिहिलेलं ‘इन्फर्नो’ हे महाकाव्य. ‘द डिव्हाईन कॉमेडी’ या त्याच्या कवितेत आत्म्याचा परमात्म्यार्पयतचा प्रवास रेखाटताना दान्तेनं एक रूपक वापरलं आहे. पृथ्वीच्या पोटातल्या गुडूप अंधारात एकामागून एक चक्राकार असणारी नरकाची नऊ वर्तुळं तो सांगतो. पापं करणा:या प्रत्येकासाठी या वतरुळात वेगळी शिक्षा आहे, वेगळ्या प्रकारची यातना आहे. पृथ्वीच्या पोटात खोल खोल काळोख्या खड्डय़ात शरीरासाठीच नाही, तर मनासाठीही अनंत यातना आहेत! 
हे सारं वाचताना एखादं काव्यात्म रूपक आपण वाचतोय असा आपला समज झालाच तर तो कोळशाच्या खाणीत खोल उतरलं की एकदम चक्काचूर होऊन जातो.
पृथ्वीच्या पोटातल्या या नऊ नरक चक्रांचं वर्णन मी शब्दश: अनुभवलं ते झारखंडमधल्या धनबादमध्ये, तिथल्या काळ्या, तप्त अंधा:या कोळशाच्या खाणीत मी जाऊन पोहचलो. माङो डोळे आगाग करत चुरचुरत होते. कपडय़ांवर खाणीतली काजळी, धूळ चढली होती. खाणीत विषारी वायूंचा उग्र दर्प जाणवत होता. त्या हवेत श्वास घेणंसुद्धा मी टाळत होतो. आपण या खोल खाणीतच अडकलो आहोत या भावनेनं अस्वस्थही वाटत होतं. माङया डोक्यावरच्या तकलादू टोपीलाच लागलेला एक इवलासा बल्ब मिणमिणत होता. त्या टोपीखाली आपलं डोकं सुरक्षित आहे असं समजून मी त्या मिचमिच्या प्रकाशात खाणीतलं जग पाहू लागलो. छोटे रेल्वे ट्रॅक्स पावलाखाली दिसत होते आणि वळणावळणानं ते त्या अंधा:या खोल खाणीत दूर कुठंतरी गुडूप होत होते. कोळसा वाहून नेणा:या रिकाम्या नी भरलेल्या ट्रॉल्या त्या ट्रॅकवरून सतत ये-जा करत होत्या. त्या पाहून मला दान्तेच्या कवितेतली बोट आठवली. नरकातली नदी पार करणारी ती बोट. त्या बोटीत बसूनच नरकातले शापित आत्मे आक्रंदन करतच नदी पार करत असत. इथं मी पाहिलेलं जगही यापेक्षा वेगळं नव्हतं.
खोबणीला चिकटलेले काळेभोर डोळे माङयाकडे रोखून पाहत होते, आतल्या आत आक्रोशत असावे जसे. खाणीत काम करणा:यांच्या अंगावर गच्च ओला घाम, त्या घामाला अंगभर चिकटून बसलेली काजळी देहावरच्या त्वचेचा भाग झाल्यासारखी मुरलेली. सुरकुतलेले, काडेमुडे हातपाय आणि थकलेलं शरीर सांगतच होतं त्यांना रोज सोसाव्या लागणा:या वेदनांची, दु:खाची कहाणी. दान्तेच्या महाकाव्यातले आत्मे जसे कायमचे त्या नरकात सडतात, यातना-छळ सोसतात आणि नियतीच्या नियमाप्रमाणं कायमचे त्याच अवस्थेत वेदना सहन करत राहतात, तशीच या खाणीतली माणसं.
त्यांच्यासमोर दोनच पर्याय होते. एकतर हे जे मिळतंय ते काम करत जगायचं, नाही तर उपासमारीनं मरायचं. त्यांनी जगायचा पर्याय स्वीकारला आणि आपल्या शरीराचा, आरोग्याचा बळी देत हे खाणीतलं जगणं स्वीकारलं. त्या जगण्यात ना कुठली सुरक्षितता ना खात्री. जेमतेम साधनांच्या मदतीनं सतत धोकादायक अवस्थेत काम करत राहायचं.
धनबाद हे झारखंडमधलं अत्यंत प्रदूषित शहर. देशातल्या सर्वाधिक कोळसा खाणी इथंच आहेत. शहरात प्रवेश करताच वातावरणात काळपट धूळ जाणवते. जसजसे कोळसा खाणींच्या दिशेनं जाल तसतशी सर्वत्र ती काळी धूळ दिसते. रस्त्यावर, घरांवर, दुकानांवर सगळीकडे काळ्या धुळीचं किट्टण दिसतं. लोकांचे कोरडे, भकास चेहरे तुमच्याकडे रोखून पाहतात. खरंतर त्यांच्या आणि आपल्या त्वचेचा रंग सारखाच असतो पण तरी एखादा गोरा विदेशी दिसावा, तशी माणसं आपल्याकडे पाहतात. कारण या काळपट धुळीनं त्यांच्या त्वचेचा रंगच पालटून टाकलेला असतो. आपल्या त्वचेचा मूळ रंग कसा होता हेच इथं आता कुणाला आठवत नाही इतकी ती काळी धूळ कातडीत मुरली आहे. इथल्या कोळसा खाणींनी दोन भयानक आपत्तीही अनुभवल्या आहेत. 
1965 साली झालेल्या अपघातानं 268 लोकांचा बळी घेतला होता. आणि दुसरी घटना 1975 सालची. त्या भयानक अपघातानं 372 लोक खाणीच्या पोटात गाडले गेले. त्यावर बेतलेला अमिताभ आणि शत्रुघ्न सिन्हाचा ‘काला पत्थर’ सिनेमा गाजला. 
‘काला पत्थर’ हे शब्द जरी अपमानास्पद वाटत असले, तरी या व्यवसायात काम करणा:या आणि खाणीतून कोळसा बाहेर काढणा:या माणसांना मात्र त्यातून फारसं काहीच मिळत नाही. गरिबी, उपासमार, बेरोजगारी या चक्रातच त्यांचं आयुष्य फिरतं. चार पैशासाठी काहीजण मग खाणीतून कोळसा चोरतात आणि तो सायकलवर लादून शहरात आणून विकतात. सगळ्यांसमोर उघड चालतो हा व्यवहार. त्या माणसांना ‘कोयला चोर’ म्हणतात. पण हीदेखील खाणीत काम करण्याची अपरिहार्यताच. 
..ना उद्याची आशा, ना आजची खात्री, ना कुठं निघून जायची सोय. धनबादच्या त्या नरकातच ते राहतात आणि तिथला छळ मुकाट सहन करतात. त्यांनी खाणीतून काढलेल्या कोळशातून जगभरातली किती घरं रोज उजळत असतील; पण या माणसांच्या काळजात धगधगणारी आग मात्र कधीची मरून गेलेली आहे. कायमची!
 
(छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजकार्याबद्दल पद्मश्री पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार ‘लोकमत’ समूहाचे 
फोटो एडिटर आहेत.)