शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

भारत का अपना फोन.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 06:05 IST

डिझाइनची ताकद काय असते, याची कल्पना काही वर्षांपूर्वी गाजलेल्या नोकिया 1100 या फोननं येऊ शकेल. धुळीपासून संरक्षण करणारे या फोनचे  कि-पॅड आणि स्क्र ीन आजही डिझाइनचा  एक उत्कृष्ट नमुना समजला जातात.   मोबाइलच्या इतिहासात पहिल्यांदाच  35 वेगवेगळ्या रंगछटांत मिळणार्‍या या फोनची किंमतही  त्या काळातील इतर मोबाइलच्या मानाने परवडेल अशी होती.  डिझाइन आणि तंत्नज्ञान यांचा अतुलनीय मिलाफ असलेल्या  या मोबाइलच्या 25 कोटीपेक्षाही जास्त प्रति  संपूर्ण जगभरात केवळ चार वर्षांत विकल्या गेल्या.  फक्त मोबाइलचाच नाही, तर आजतागायत  विकल्या गेलेल्या कुठल्याही कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचा  हा जागतिक विक्रम आहे.

ठळक मुद्देघडणार्‍या, मोडणार्‍या, नव्याने घडणार्‍या,  सतत बदलणार्‍या ‘आकारां’च्या दुनियेतला  विचार आणि शास्र

- हृषिकेश खेडकर

भारत का अपना फोन ! हे वाचताक्षणी काय आलं तुमच्या डोळ्यांसमोर ? थोडं आठवून पाहा, नक्की दिसेल मी काय म्हणतो आहे ते. ‘नोकिया 1100’! आठवलं का काही आता? आजची मिलेनिअल जनरेशन सोडली तरी बहुतेक आपल्या सगळ्यांना या मोबाईल फोनच्या काहीना काही आठवणी जरूर असतील. वाचकांपैकी काही जणांकडे हा फोन त्यावेळीस नसेल कदाचित, पण तुमच्या आसपास हा फोन वापरणारी माणसं तुम्हाला नक्कीच भेटली असणार. इथे मी फक्त तुमच्या आठवणींना उजाळा देत नाहीये, तर डिझाइनची ताकद कशाला म्हणतात याची कल्पना देतो आहे. आपली डिझाइनची गोष्ट आज या परिचित, पण तितक्याच अनोख्या वस्तूचा मागोवा घेणार आहे. हे करण्यामागे दोन उद्देश आहेत; एक म्हणजे आपण आजपर्यंत डिझाइन विश्वाचे विविध पैलू बघितले, आता डिझाइनचे आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडण्यामागचे सार्मथ्य बघूयात आणि दुसरं  म्हणजे या सार्मथ्यामागची डिझाइनची गोष्ट जाणून घेऊयात.  गोष्ट चालू होते 2003 साली ; जेव्हा नोकिया कंपनीने जागतिक बाजारपेठेत पहिल्यांदा नोकिया 1100 हा मोबाइल फोन आणला. त्यानंतर या फोनने भारतातच नाही तर संपूर्ण जगात पुढचे चार वर्ष जो काही धुमाकूळ घातला त्याला इतिहास साक्षीदार आहे. नोकिया कॉर्पोरेशन ही फिनलॅँडस्थित दूरसंचार क्षेत्नातली 1865 सालापासूनची अत्यंत नावाजलेली कंपनी. मोबाइल फोन बनवण्यात हातखंडा असणार्‍या या कंपनीने 1995 साली भारतात पहिला मोबाइल फोन आणला. पेजरच्या त्या जमान्यात मोबाईल विकत घेणे तर सोडा, पण तो असतो काय हेदेखील सर्वसामान्य भारतीयाला माहिती नव्हते. माहिती तंत्नज्ञानाने भारावलेल्या त्या वेळेचा भारत या दूरसंचार प्रणालीने जवळ येऊ पाहत होता; आणि हीच अनुकूल परिस्थिती बघून नोकिया कंपनीने भारतात मोबाईल फोनची मुहूर्तमेढ रोवली. 1995 ते 2003 या आठ वर्षांच्या काळात नोकिया कंपनीने अनेक फोन भारतीय बाजारपेठेत आणले; बदलत्या तंत्नज्ञानाबरोबर फोनमध्येदेखील काही सुधारणा होत गेल्या, पण तरीही ‘र्शीमंत देशांसाठी बनवलेली गेलेली वस्त’ अश्या समजामुळे जगातील मोठ्या विकसनशील देशांमधल्या बाजारपेठेत मोबाइल फोनला म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. याच गोष्टीची दखल घेत नोकिया कंपनीने विकसनशील देशातील ही मोठी बाजारपेठ समजून घेण्याचं ठरवलं. या कामासाठी कंपनीने ज्यान चिपचेस नामक एका ह्यूमन बिहेवोरीयल म्हणजेच मानवी वर्तनाचा अभ्यास करणार्‍या शास्त्नज्ञाची नेमणूक केली. शास्त्नज्ञ म्हटल्यावर आपल्या मनात पांढरा कोट परिधान करून प्रयोगशाळेत काम करणार्‍या व्यक्तीची जी प्रतिमा येते त्याला साफ छेद दणारे व्यक्तिमत्व म्हणजे ज्यान चिपचेस. स्वत:चं साधं ऑफिसदेखील नसलेल्या या शास्त्नज्ञाची प्रयोगशाळा म्हणजे पूर्ण जग. वेगवेगळ्या माणसांची संस्कृती, त्यांचं राहणीमान, त्यांची जीवनशैली, त्यांचे दैनंदिन व्यवहार आणि त्यात वापरल्या जाणार्‍या वस्तूंचे निरीक्षण आणि अभ्यास हेच चिपचेसचे नित्य प्रयोग. ह्यूमन सेंटर्ड म्हणजेच मानव केंद्रित डिझाइनचे  संशोधन करून त्याचा उपयोग भविष्यातील वस्तू बनवण्यासाठी कसा करण्यात येईल, यात चिपचेसचा हातखंडा आहे. नोकिया कंपनीबरोबर काम करत असताना ज्यान भारत, चीन, ब्राझील,आफ्रिका अशा अनेक देशांमध्ये माणसांचे निरीक्षण करत फिरला. त्याचे काही लेख वाचले किंवा त्याला ऐकले की या प्रवासात त्याला आलेले विलक्षण अनुभव आपल्याला कळतात. घरातून बाहेर पडताना लोक किल्ली, पैसे आणि मोबाइल या तीन वस्तू हमखास बरोबर का नेतात? विकसनशील देशात लोक मोबाइलचा उपयोग फक्त दूरसंचारासाठी म्हणून नाही तर पर्यायी बँकिंग व्यवस्थेसारखा कसा करतात? बिघडलेला मोबाइल लोक स्वत: किंवा रस्त्याच्या कडेला बसलेल्या रिपेअरिंगच्या दुकानातून कसा दुरु स्त करतात? मोबाइलकडून लोकांना काय अपेक्षा आहेत?. या आणि अशा इतर काही प्रश्नांच्या चिपचेसनी शोधलेल्या उत्तरात नोकिया 1100 या मोबाइलच्या यशाचा मंत्न लपलेला आहे. नोकिया 1100 हा पहिला फोन आहे; ज्यात मागच्या बाजूला टॉर्च दिला गेला; या कारणामुळे इतर लोकांबरोबरच रात्नी शेतात काम करणारे शेतकरी आणि ट्रक चालवणारे ड्रायव्हर यांचा मोठा वर्ग या फोनचा चाहता झाला. स्वत: बनवलेल्या सात रिंगटोन साठवून ठेवण्याची क्षमता असणार्‍या या फोनने त्यावेळच्या तरु णाईला वेड लावलं होतं. धुळीपासून संरक्षण करणारे या फोनचे कि-पॅड आणि स्क्र ीन आजही डिझाइनचा एक उत्कृष्ट नमुना समजला जातात.  मोबाईलच्या इतिहासात पहिल्यांदाच 35 वेगवेगळ्या रंगछटांमध्ये मिळणारा हा नोकिया 1100 कोणाला आवडला नसता तरच नवल. या सगळ्यांत कहर म्हणजे त्या काळात उपलब्ध असणार्‍या इतर मोबाइलच्या मानाने याची किंमतदेखील बहुतांश विकसनशील देशांमधील ग्राहकाला परवडेल अशी होती. डिझाइन आणि तंत्नज्ञान यांचा अतुलनीय मिलाफ साधून बनवल्या गेलेल्या या मोबाइलच्या 250,000,000 पेक्षाही जास्त प्रति संपूर्ण जगभरात केवळ चार वर्षांत विकल्या गेल्या. फक्त मोबाइलचाच नाही, तर आजतागायत विकल्या गेलेल्या कुठल्याही कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचा हा जागतिक विक्र म आहे. एखादी कंपनी वस्तू बनवण्याआधी आपल्या ग्राहकाचा किंबहुना ती वस्तू वापरणार्‍या उपभोक्त्याचा किती संवेदनशीलतेने विचार करते; इतकंच नाही तर तो विचार प्रत्यक्ष डिझाइनमध्ये वेगवेगळ्या प्रकारे उतरवते, तेव्हा काय इतिहास रचला जातो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे नोकिया 1100 आहे, यात शंकाच नाही. जेव्हा डिझाइनची ताकद अशाप्रकारे जनसमुदायाला बदलत असते किंवा घडवत असते तेव्हा डिझाइनची गोष्ट या क्षणाची दखल न घेता पूर्ण होऊच शकत नाही.

hrishikhedkar@gmail.com(लेखक वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)