शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पर्यटकांना खुणावतेय झाडीपट्टीचे सौंदर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 13:14 IST

वैनगंगेच्या पावन स्पर्शाने सुपीक झालेला भंडारा जिल्हा निसर्ग संपन्न आहे. वनसंपती, वन्यजीव, ऐतीहासिक स्थळांसोबतच गावागावांतील तलाव पर्यटकांना खुणावतात.

ठळक मुद्देनिसर्गसंपन्न भंडारा जिल्ह्यात पर्यटनाची संधी

ज्ञानेश्वर मुंदे

भंडारा:वैनगंगेच्या पावन स्पर्शाने सुपीक झालेला भंडारा जिल्हा निसर्ग संपन्न आहे. वनसंपती, वन्यजीव, ऐतीहासिक स्थळांसोबतच गावागावांतील तलाव पर्यटकांना खुणावतात. कोकणचा तोडीचा निसर्ग एकदा अनुभवला की येथील अप्रतिम सौंदर्याच्या प्रेमात कुणीही पडल्याशिवाय राहणार नाही. निसर्गाने मुक्तहस्त उधळण केलेला हा परिसर म्हणजे झाडीपट्टीचे खरे सौंदर्य.भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात सम्राट अशोकाचे वास्तव्य होते. आजही पवनीत अशोककालीन अवशेष आढळून येतात. गोंड राजे बक्त बुलंदशाह यांनी १७०० मध्ये बांधलेला अंबागड किल्ला गत वैभवाचे साक्ष देतो. भंडारा शहरातील सध्या जिल्हा कारागृह असलेला किल्ला ही तेवढाच अभेद्य आहे. गोंडवाणा म्हणून पुर्वी ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशाला झाडीपट्टी म्हणून ओळखले जाते.साहित्य आणि संस्कृतीचा अनमोल ठेवा असलेला भंडारा जिल्हा निसर्ग समृध्दीने नटलेला आहे. झाडीपट्टीचा परिसर अतिशय विलोभनीय आणि मनाला भुरळ घालणारा आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वतमाला त्यात गायमुख, चांदपूर, गायखोरी डोंगराचा समावेश आहे. सातपुड्याची हिरवीगार किमया, घनदाट वनश्रीचा गालीचा, खळखळणाºया नद्या आणि शांत जलाशय येथील निसर्ग सौंदर्यात भर घालतात. पावसाळ्याच्या दिवसात तर निसर्ग बहरून येतो. अशा या भंडारा जिल्ह्याच्या सौंदर्याची अनेकांना भुरळ पडली आहे. देश विदेशातील पर्यटक पर्यटनासाठी येतात. मात्र सुविधा नसल्याने पर्यटनाचा विकास रखडला आहे. भंडारा जिल्ह्यातील तलावांचा उपयोग जल पर्यटनासाठी केला जाऊ शकतो. भंडारापासून हाकेचा अंतरावर असलेला रावणवाडी तलाव आता शुटींग पॉर्इंट झाला आहे. पुण्या-मुंबईतील चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक याठिकाणी येऊन चित्रीकरण करतात. यासोबतच जिल्ह्यात बंदरझरा, नागझिरा, हत्तीडोह असे अनेक तलाव असून या तालवाचा विकास केल्यास जिल्ह्याच्या पर्यटनाला मोठी संधी मिळू शकते.

टॅग्स :tourismपर्यटन