शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

स्वाभिमानाच्या प्रात्पीसाठी बाबासाहेबांचे धर्मांंतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 07:50 IST

बाबासाहेबांचे धर्मांतर हा हिंदू  धर्मावर सूड नव्हता.  ते राष्ट्रांतरही नव्हते.  धर्मांंतर आर्थिक  लाभासाठी नव्हते.  सक्तीचेही नव्हते,  तर ते स्वाभिमानाच्या  प्राप्तीसाठी होते.

ठळक मुद्देआज धम्मचक्र प्रवर्तन दिन. त्यानिमित्ताने विशेष लेख.

-बी. व्ही. जोंधळे

हिंदू धर्म रूढी-परंपरेने अस्पृश्य समाजाच्या हातापायांत ज्या गुलामगिरीच्या बेड्या ठोकल्या होत्या, त्या तोडून पूर्वास्पृश्य समाजास समता-स्वातंत्र्य-बंधुभाव नि माणुसकीचे हक्क मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  सत्याग्रही आंदोलने केली. हिंदू धर्मात राहून माणुसकी मिळवून घेणे अशक्य आहे, याची खात्री पटल्यावर बाबासाहेबांनी आपल्या लक्षावधी अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर मुक्कामी बौद्ध धम्माचा स्वीकार केला.गत 63 वर्षांचा प्रवास पाहता धर्मांतरामुळे बौद्ध समाजात अस्मितेची जाणीव निर्माण होऊन त्याला एक स्वतंत्र ओळख मिळाली आहे, हे नाकारता येत नाही. बाबासाहेबांचे धर्मांतर हा हिंदू धर्मावर सूड नव्हता. ते राष्ट्रांतरही नव्हते. धर्मांतर आर्थिक लाभासाठी नव्हते. सक्तीचेही नव्हते, तर ते स्वाभिमानाच्या प्राप्तीसाठी होते. बाबासाहेबांनी म्हटले होते, ‘धर्मांतराचा विचार सामाजिक, धार्मिक व ऐतिहासिक दृष्टीने जसा केला पाहिजे, तसाच तो तात्त्विक अंगानेही केला पाहिजे.’बाबासाहेबांवर सुरुवातीपासून बौद्ध धम्माचा प्रभाव होता. बुद्धाने सामाजिक समतेचा पुरस्कार करताना कर्मकांडास दिलेला नकार, चातुर्वण्र्य व जातिव्यवस्थेस केलेला विरोध बाबासाहेबांना महत्त्वाचा वाटला.  कोलंबो येथील ‘अखिल दलित फेडरेनशनच्या सदस्यांसमोर भाषण करताना त्यांनी म्हटले होते. ‘मी सर्व धर्मांचा अभ्यास केला असून, शेवटी या निर्णयावर आलो आहे की, ‘बौद्ध धर्माशिवाय अस्पृश्यांसाठी दुसरा कोणताही मुक्तीचा मार्ग नाही, जर तुम्हास समता हवी असेल, तर बौद्ध धर्म स्वीकार हाच मार्ग आहे.बाबासाहेबांना तथागत बुद्ध हे पहिले समाजसुधारक वाटत होते. बुद्धाने यज्ञसंस्थेवर चढविलेला हल्ला कर्मकांडास केलेला  विरोध, भिक्खू संघात शूद्रातिशूद्रांना व  स्रियांना दिलेले बरोबरीचे स्थान बाबासाहेबांना मानवी मूल्यांचे निदर्शक वाटले.  बाबासाहेबांचा बुद्ध धम्म स्वीकार हा माणुसकीच्या प्राप्तीसाठी व दडपलेल्या, खचलेल्या, पिचलेल्या अस्पृश्य वर्गात स्वाभिमानाचा वन्ही चेतविण्यासाठी होता. 

धर्मांतराच्या वेळी काही टीकाकारांनी असा प्रश्न उपस्थित केला होता की, धर्मांतरामुळे दलितांचे आर्थिक प्रश्न सुटणार आहेत काय? यासंदर्भात धर्मांतराच्या पूर्वसंध्येस नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत एका वार्ताहराने बाबासाहेबांना असा प्रश्न विचारला होता की, तुम्ही बौद्ध धम्म का स्वीकारीत आहात? या प्रश्नाचे उत्तर देताना बाबासाहेबांनी म्हटले होते, ‘हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला व तुमच्या पूर्वजांना का विचारत नाही? राखीव जागांचे फायदे मिळविण्यासाठी आम्ही काय कायम अस्पृश्यच राहावे की काय? आम्ही आमचे मनुष्यत्व मिळविण्यासाठी बौद्ध धम्माचा स्वीकार करीत आहोत?’- बाबासाहेब- जे म्हणत होते ते खरेच आहे. त्यांचे धर्मांतर सामाजिक परिवर्तनासाठी होते नि आहे. बौद्धांनी धम्माच्या तत्त्वाप्रमाणे आचरण करावे; अन्यथा जग उद्या बौद्धांनी धम्म निंदाव्यंजक स्थितीला आणून ठेवला म्हणून आपणास  दोष देईल, असा इशाराही बाबासाहेबांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर बौद्ध समाजाची जबाबदारी मोठी होती नि आहे. बौद्ध  भिक्खूंनी तळागाळातील-जातिव्यवस्थेचे  शिकार ठरलेल्या वर्गात धम्म रुजविण्याची जबाबदारी स्वीकारायला पाहिजे होती. तात्पर्य, बौद्ध समाजाने आपण आपले आचरण धम्मानुसार ठेवत आहोत की, पुन्हा एकदा हिंदू रूढी-परंपरांकडे वळून कर्मकांडात रमत आहोत, याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे वाटते. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांंना मंगल कामना.

(लेखक आंबेडकरी चळवळीचे  अभ्यासक आहेत.)