शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

युतीसह आघाडीचेही हुश्श!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:35 IST

भिवंडीत दिग्गज बंडखोरांची माघार : नव्या समीकरणाचा फायदा कुणाला?

भिवंडी : सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे आणि विश्वनाथ पाटील या दोन्ही दिग्गजांनी शुक्रवारी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने युतीसह आघाडीचेही गणित काहीसे सोपे झाले आहे. विश्वनाथ पाटील हे थेट भाजपच्या तंबूत जाऊन बसले आहेत, तर शस्त्र टाकूनही बाळ्यामामांनी भाजपविरोधी सूर आळवणे सुरूच ठेवले आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच बंडाचे वारे वाहत होते. शिवसेनेचे बाळ्यामामा म्हात्रे यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी दिल्लीपर्यंतची सूत्रे हलवली; पण उपयोग झाला नाही. काँग्रेसने शेवटच्या क्षणी का होईना, पण सुरेश टावरे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले. दुसरीकडे, काँग्रेस नेते विश्वनाथ पाटील हेदेखील पक्षाच्या उमेदवारीसाठी देव पाण्यात बुडवून होते; मात्र त्यांच्याही पदरी निराशाच आली. दोन्ही दिग्गजांनी अखेर अपक्ष उमेदवारी दाखल करून निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. शुक्रवारी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोघांनी माघार घेतल्याने आघाडीसह युतीनेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. शिवसेनेचे बाळ्यामामा म्हात्रे यांनी भाजप युतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्याविरोधात रणशिंग फुंकले होते. बंडखोरी केल्याने शिवसेनेने त्यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टीही केली. त्यांची उमेदवारी युतीसाठी त्रासदायक, तर आघाडीसाठी फायद्याची ठरली असती. आता त्यांनी माघार घेतल्याने युतीचे नुकसान होणार नसले, तरी आघाडीला फायदाही होणार नाही. आपण निवडणूक रिंगणात नसलो, तरी कपिल पाटील यांना आपला विरोध राहीलच, अशी भूमिका बाळ्यामामांनी जाहीर केली आहे; मात्र प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात नसल्याने त्यांच्या विरोधाची धार कितपत तीव्र राहील, याबाबत राजकीय वर्तुळात शंका उपस्थित होत आहे.

विश्वनाथ पाटील हे काँग्रेसचे नेते असले, तरी त्यांनी फडकावलेला बंडाचा झेंडा आघाडीसोबतच युतीसाठीही धोक्याचा ठरण्याची शक्यता होती. पाटील हे कुणबीसेनेचेही नेते असून, या समाजाचा भिवंडी मतदारसंघातील टक्का दुर्लक्ष करण्याजोगा नाही. कुणबी समाज हा भाजप-सेनेचाही मतदार आहे. त्यामुळे पाटील यांची बंडखोरी आपल्यासाठीही सोयीची नसल्याचे भाजपने हेरले. त्यामुळेच थेट मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून पाटील यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, पाटील यांनी आपली अपक्ष उमेदवारी मागे घेऊन महायुतीला पाठिंबा जाहीर केला.

दोन्ही दिग्गजांचे बंड आता शमले असले, तरी निवडणुकीच्या घोडामैदानात बदललेल्या समीकरणाचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी युतीसोबतच आघाडीलाही नव्याने व्यूहरचना आखावी लागणार आहे.भिवंडीतही आता थेट लढतठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण या उर्वरित दोन लोकसभा मतदारसंघांचे चित्र आधीपासूनच स्पष्ट होते. ठाण्यात शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यात, तर कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्यात लढत होणार आहे. आता भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रे आणि विश्वनाथ पाटील यांनी माघार घेतल्याने या मतदारसंघातही भाजपचे कपिल पाटील आणि काँग्रेसचे सुरेश टावरे यांच्यात दुरंगी सामना रंगणार आहे.

टॅग्स :bhiwandi-pcभिवंडी