शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

‘अजिंक्य डोंबिवलीकर’ होऊन रहाणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 06:05 IST

रहाण्यांचा अजिंक्य डोंबिवलीचा, रोहित शर्माही मूळचा डोंबिवलीकरच! सच्चा डोंबिवलीकर चपळ, चिकाट, आक्रमक असतोच, म्हणजे त्याला असावेच लागते!

ठळक मुद्देवेगाने रेल्वे स्थानकात शिरणाऱ्या लोकलमध्ये अचूक उडी ठोकून विंडोसीट पकडतो तो सच्चा, कडवा डोंबिवलीकर. फलाट दिसेपर्यंत ‘छशिमट’हून पकडलेली सीट न सोडण्याची चिकाटी अंगी असते तोच डोंबिवलीकर.

- संदीप प्रधान

भरधाव वेगाने रेल्वे स्थानकात शिरणाऱ्या लोकलमध्ये अचूक उडी ठोकून विंडोसीट पकडतो तो सच्चा, कडवा डोंबिवलीकर. फलाट दिसेपर्यंत ‘छशिमट’हून पकडलेली सीट न सोडण्याची चिकाटी अंगी असते तोच डोंबिवलीकर. शेजारच्या सहप्रवाशाचा खांदा ही आपल्याला मिळालेली जहागिरी आहे, असे मानून प्रवासात त्यावर डोके ठेवून बिनघोर झोपून आपला निद्रा अनुशेष भरून काढतो, तोच आक्रमक डोंबिवलीकर!- त्यामुळे चपळता, चिकाटी, आक्रमकता हे डोंबिवलीकरांचे अंगभूत गुण असून, क्रिकेटच्या मैदानावर याच गुणांची प्रकर्षाने गरज असते. त्यामुळेच डोंबिवलीकर अजिंक्य रहाणे याच्या कप्तानीतील भारतीय क्रिकेट संघाने कांगारूंना त्यांच्याच मैदानात अक्षरश: गडबडा लोळविले. संघाचे उपकप्तान रोहित शर्मा हाही मूळचा डोंबिवलीकर, परंतु त्याने आपल्या आजी-आजोबांकडे बोरीवलीत वास्तव्य करणे पसंत केले. (डोंबिवली व बोरीवली ही शेजारीशेजारील शहरे असल्याने तेथे एकच पत्रकार नियुक्त करण्याचा निर्णय एका इंग्रजी वृत्तपत्राच्या संपादकांनी घेतला होता.)

डोंबिवली ही वेगवेगळ्या क्षेत्रातील नररत्नांची खाण आहे. बरीच रत्ने डोंबिवलीत लहानाची मोठी झाली. मात्र, पैलू पडून ती जेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रात तळपू लागली, तेव्हा ती मुंबईच्या किंवा अन्य मोठ्या शहरांच्या कोंदणात जाऊन बसली. अर्थात, डोंबिवलीने कधीही त्याबद्दल कुरकुर केली नाही. नवनवीन रत्ने (पैलू न पडलेली) निर्माण करण्याचा घेतला वसा या शहराने टाकला नाही. अजिंक्यचे वडील बेस्ट उपक्रमात सेवेला तर आई गृहिणी. अजिंक्यच्या अंगी जन्मत: क्रिकेट नैपुण्य. डोंबिवलीतील एस.व्ही. जोशी हायस्कूलमध्ये प्रवेश मिळताच शालेय क्रिकेट स्पर्धांमध्ये अजिंक्यची बॅट तळपू लागली. डोंबिवलीत क्रिकेटच्या क्षेत्रातील रत्ने हुडकून त्यांना संधी देणारे प्रशिक्षक राजन धोत्रे यांनी अजिंक्यवर क्रिकेटचे प्राथमिक संस्कार केले. पुढे मुंबईत गेल्यावर विद्या पराडकर यांनी अजिंक्यला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याकरिता घडविला. नीलेश कुलकर्णी हाही मूळचा डोंबिवलीकर. भारतातर्फे क्रिकेट खेळल्यावर जसे नीलेशनी डोंबिवली सोडली तशीच अजिंक्यने. डोंबिवलीहून मुंबईत खेळायला जायचे, तर सकाळच्या वेळी एक तर खेळाडू लोकलमध्ये शिरू शकेल किंवा त्याचे क्रिकेट किट! दोघांना लोकलच्या डब्यात प्रवेशाची संधी मिळाली, तर आतील गर्दीत तो बिच्चारा असा घुसमटून जाईल की, जेव्हा तो मुंबईत सरावाकरिता पोहोचेल, तेव्हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत एका बाजूने संघ सावरून धरताना दमछाक होऊन तंबूत परतलेल्या फलंदाजासारखा थकला भागला भासेल. समजा, रस्ते मार्गे मुंबई गाठून क्रिकेटची आराधना सुरू ठेवायची ठरवली, तर प्रात:कालीन नेटप्रॅक्टिसच्या प्रहरी डोंबिवली सोडलेला खेळाडू लंच टाइमपर्यंत मैदानात दाखल झाला, तरी मिळविले. रस्तेमार्गे डोंबिवलीहून मुंबई गाठण्याकरिता हल्ली तीन ते साडेतीन तास सहज लागतात. सध्या आदित्य रावत, यश सिंग, श्रेयस गुरव, मनिष राव, स्वप्निल प्रधान वगैरे क्रिकेटमधील रत्नांना पैलू पाडण्याचे काम डोंबिवलीत सुरू आहे. राष्ट्रीय क्रिकेटमध्ये ते चमकताच डोंबिवली सोडतील, ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे.

ब्रिटिश आमदनीत रेल्वेचे पॉवर हाऊस ठाकुर्लीला उभे राहिले, तेव्हा बारा बंगला परिसरात गोऱ्या साहेबाचे वास्तव्य होते. त्यावेळी सुशिक्षित, पांढरपेशा समाजाची वस्ती असलेल्या डोंबिवली या खेडेगावात मुंबईतील लोक हवापालटाकरिता यायचे. (आता याच शहरात प्रदूषणामुळे हिरवा पाऊस कोसळतो) ब्रिटिशांनीच रेल्वे स्थानकालगत प्लॉट पाडून सुरुवातीला या गावाच्या नियोजनबद्ध आखणीचा श्रीगणेशा केला. एके काळी ख्यातनाम साहित्यिक विजय तेंडुलकर हे असेच तीनेक वर्षांकरिता काकुशेठ चाळीशेजारील गांधी बंगल्यातील दोन खोल्यांत राहिले होते. विंदा करंदीकर हे सरखोतांच्या चाळीत काही काळ रमले, नंतर ते दोघे मुंबईला गेले. ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर हे मूळचे डोंबिवलीकर. मात्र, संपादकपदाची माळ गळ्यात पडताच त्यांनी डोंबिवली सोडली. डोंबिवलीत वास्तव्य करणाऱ्यात साहित्यिक, लेखकांमध्ये पु.भा. भावे, शं. ना. नवरे, वसुंधरा पटवर्धन, ना. ज. जाईल, प्रभाकर अत्रे, द. भा. धामणस्कर, मधुकर जोशी वगैरे अनेक मान्यवरांचा समावेश आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रातील ‘दादा’ (भाई नव्हे) लोक डोंबिवलीत राहतात, सकाळी निमूटपणे लोकल पकडून नोकरी, धंद्याला जातात व रात्री केवळ पाठ टेकण्याकरिता डोंबिवलीत येतात. लग्न होऊन डोंबिवलीत येणाऱ्या चवळीच्या शेंगेसारख्या सुना कालांतराने डोंबिवली ‘मानवल्याने’ (येथील पोळी-भाजी केंद्रात उकडीच्या मोदकापासून पुरणपोळ्यांपर्यंत सर्व विनासायास उपलब्ध होत असल्याने) ‘सुखासीन’ दिसतात, तसेच काहीसे या शहराचे झाले. ब्रिटिशांनी सुरुवातील केलेली शहराची नियोजनबद्ध आखणी विस्कटून अनेक बेकायदा बांधकामे झाल्याने डोंबिवलीची तीही ओळख झाली. अतिक्रमण करणाऱ्यांनी नागरी सुविधांचे भूखंड गिळल्याने मैदाने, बगिचे, क्रीडांगणे, सभागृहे, मंडया वगैरे सुविधा शेवटच्या पंक्तीतल्या पानात जिलेबीचे तुकडे पडतात, तशा अभावाने आढळतात. डोंबिवलीतील काही शैक्षणिक संस्थांनी मैदाने ही आपली खासगी मालमत्ता करून ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे कुलूपबंद केल्याने पुढच्या पिढीतील नीलेश कुलकर्णी, अजिंक्य रहाणे यांना तर येथील मटर्निटी होममध्ये टॅहँऽऽऽ करण्यापूर्वी ‘हे डोंबिवली तर नाही ना?’ याची खातरजमा करायला लागेल. अर्थात, मैदाने, सुविधा कुठल्याही शहरात मिळाली, तरी वर म्हटल्याप्रमाणे चपळता, चिकाटी, आक्रमकता आणि सोशिकता वगैरे हे सारे डोंबिवलीकरांच्याच डीएनएमध्ये आहे हे विसरू नका!

(सच्चे डोंबिवलीकर असलेले लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वरिष्ठ सहायक संपादक आहेत!)

sandip.pradhan@lokmat.com