शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ की एसटी स्टँड?

By मनोज गडनीस | Updated: January 28, 2024 12:28 IST

Airport: नुकत्याच सरलेल्या २०२३ वर्षामध्ये भारतीय हवाई क्षेत्राने १५ कोटी २० लाख प्रवाशांना इप्सित स्थळी सोडत एक नवा उच्चांक गाठला; पण या विक्रमाला अनेक घटनांचे गालबोट लागले. विमान कंपन्या आणि प्रवासी या दोघांच्या पारड्यात चुकांचे हे माप पडल्याचे दिसून येते.

- मनोज गडनीस नुकत्याच सरलेल्या २०२३ वर्षामध्ये भारतीय हवाई क्षेत्राने १५ कोटी २० लाख प्रवाशांना इप्सित स्थळी सोडत एक नवा उच्चांक गाठला; पण या विक्रमाला अनेक घटनांचे गालबोट लागले. विमान कंपन्या आणि प्रवासी या दोघांच्या पारड्यात चुकांचे हे माप पडल्याचे दिसून येते. हे असे का घडले व देशातील विमान प्रवाशांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आगामी काळात काय घडू शकते, याचा वेध घेणारा हा सारांश.

देशात गेल्या दहा वर्षांत ७५ नवी विमानतळे उभारली गेली आहेत. तर अनेक आंतरराष्ट्रीय मार्गांवर देखील भारतीय कंपन्यांचा विस्तार झाला आहे. विमान कंपन्यांनी देखील नव्या विमानांची मोठी खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचसोबत दुसरीकडे हवाई मार्गे जोडणी वाढल्यामुळे वेळेच्या बचतीसाठी अनेक लोक विमान प्रवासाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे विमान प्रवासाचे दर देखील स्पर्धात्मक आहेत. परिणामी लोकांना विमान प्रवास काहीसा परवडत आहे.

 विमान कंपन्या सध्या विस्तार करण्याच्या मागे आहेत. आगामी दहा वर्षांत विमान कंपन्यांच्या ताफ्यात एक हजारापेक्षा जास्त विमाने दाखल होतील. त्याअनुषंगाने विमान कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर भरती केली आहे. अनेक विमान कंपन्यांचे कर्मचारी हे नवीन अथवा कमी अनुभवी आहेत.  त्यामुळे जेव्हा एखाद्या विमानाला अनेक तासांचा विलंब होतो किंवा ते रद्द होते, तेव्हा ती परिस्थिती हाताळण्यासाठी वर्गात दिलेले प्रशिक्षण कामी येते असे नाही. 

विमान कंपन्यांचे काय चुकले?तर तिथे मानवी भावना लक्षात घेत आणि आपण सेवा क्षेत्रात काम करीत असल्याचे नीट उमजून परिस्थिती हाताळावी लागते; मात्र अलीकडे झालेल्या घटनांमध्ये याच दोन गोष्टींचा विसर विमान कर्मचाऱ्यांना पडल्यामुळे तणावाचे आणि क्वचित मारहाणीचे प्रसंग घडल्याचे विश्लेषण हवाई क्षेत्रातील तज्ज्ञ राहुल मेहता यांनी केले. 

विमानांद्वारे गेल्या वर्षभरात कोट्यवधी प्रवाशांची वाहतूक झाली आहे. दिवसागणिक प्रवाशांची वाढणारी संख्या आणि विमानांची अपुरी संख्या हे गणित व्यस्त प्रमाणात आहे. परिणामी, विमानांना विलंब आणि प्रवाशांचा उद्रेक होताना दिसत आहे.  

अलीकडच्या काळात पहिल्यांदा आणि नव्याने विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. वाहतुकीच्या इतर माध्यमांच्या तुलनेत विमानाच्या प्रवासाचे तिकीट नेहमीच महाग असते. त्यात विमानतळावर गेल्यावर तेथील पंचतारांकित सुविधा पाहून देखील नवखे प्रवासी भारावून जातात. आपल्या पैशांनुसार वागणूक ही त्यांची किमान अपेक्षा असते. ग्राहक म्हणून त्यात काही चूक नाही. मात्र, अलीकडच्या काळात विमान वाहतुकीच्या वाढत्या फेऱ्यांमुळे विमानतळावर विमानाच्या पार्किंगची व्यवस्था कमी पडत आहे. त्यामुळे विमानांना जागा होईपर्यंत हवेत घिरट्या घालाव्या लागत आहेत. परिणामी, विमानांना विलंब होत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यातच अलीकडच्या काळात हिवाळ्यामुळे दिल्लीसह उत्तर भारतातील काही विमानांना दाट धुक्यामुळे धावपट्टीवर उतरता आले नाही. 

टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळ