शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ की एसटी स्टँड?

By मनोज गडनीस | Updated: January 28, 2024 12:28 IST

Airport: नुकत्याच सरलेल्या २०२३ वर्षामध्ये भारतीय हवाई क्षेत्राने १५ कोटी २० लाख प्रवाशांना इप्सित स्थळी सोडत एक नवा उच्चांक गाठला; पण या विक्रमाला अनेक घटनांचे गालबोट लागले. विमान कंपन्या आणि प्रवासी या दोघांच्या पारड्यात चुकांचे हे माप पडल्याचे दिसून येते.

- मनोज गडनीस नुकत्याच सरलेल्या २०२३ वर्षामध्ये भारतीय हवाई क्षेत्राने १५ कोटी २० लाख प्रवाशांना इप्सित स्थळी सोडत एक नवा उच्चांक गाठला; पण या विक्रमाला अनेक घटनांचे गालबोट लागले. विमान कंपन्या आणि प्रवासी या दोघांच्या पारड्यात चुकांचे हे माप पडल्याचे दिसून येते. हे असे का घडले व देशातील विमान प्रवाशांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आगामी काळात काय घडू शकते, याचा वेध घेणारा हा सारांश.

देशात गेल्या दहा वर्षांत ७५ नवी विमानतळे उभारली गेली आहेत. तर अनेक आंतरराष्ट्रीय मार्गांवर देखील भारतीय कंपन्यांचा विस्तार झाला आहे. विमान कंपन्यांनी देखील नव्या विमानांची मोठी खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचसोबत दुसरीकडे हवाई मार्गे जोडणी वाढल्यामुळे वेळेच्या बचतीसाठी अनेक लोक विमान प्रवासाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे विमान प्रवासाचे दर देखील स्पर्धात्मक आहेत. परिणामी लोकांना विमान प्रवास काहीसा परवडत आहे.

 विमान कंपन्या सध्या विस्तार करण्याच्या मागे आहेत. आगामी दहा वर्षांत विमान कंपन्यांच्या ताफ्यात एक हजारापेक्षा जास्त विमाने दाखल होतील. त्याअनुषंगाने विमान कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर भरती केली आहे. अनेक विमान कंपन्यांचे कर्मचारी हे नवीन अथवा कमी अनुभवी आहेत.  त्यामुळे जेव्हा एखाद्या विमानाला अनेक तासांचा विलंब होतो किंवा ते रद्द होते, तेव्हा ती परिस्थिती हाताळण्यासाठी वर्गात दिलेले प्रशिक्षण कामी येते असे नाही. 

विमान कंपन्यांचे काय चुकले?तर तिथे मानवी भावना लक्षात घेत आणि आपण सेवा क्षेत्रात काम करीत असल्याचे नीट उमजून परिस्थिती हाताळावी लागते; मात्र अलीकडे झालेल्या घटनांमध्ये याच दोन गोष्टींचा विसर विमान कर्मचाऱ्यांना पडल्यामुळे तणावाचे आणि क्वचित मारहाणीचे प्रसंग घडल्याचे विश्लेषण हवाई क्षेत्रातील तज्ज्ञ राहुल मेहता यांनी केले. 

विमानांद्वारे गेल्या वर्षभरात कोट्यवधी प्रवाशांची वाहतूक झाली आहे. दिवसागणिक प्रवाशांची वाढणारी संख्या आणि विमानांची अपुरी संख्या हे गणित व्यस्त प्रमाणात आहे. परिणामी, विमानांना विलंब आणि प्रवाशांचा उद्रेक होताना दिसत आहे.  

अलीकडच्या काळात पहिल्यांदा आणि नव्याने विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. वाहतुकीच्या इतर माध्यमांच्या तुलनेत विमानाच्या प्रवासाचे तिकीट नेहमीच महाग असते. त्यात विमानतळावर गेल्यावर तेथील पंचतारांकित सुविधा पाहून देखील नवखे प्रवासी भारावून जातात. आपल्या पैशांनुसार वागणूक ही त्यांची किमान अपेक्षा असते. ग्राहक म्हणून त्यात काही चूक नाही. मात्र, अलीकडच्या काळात विमान वाहतुकीच्या वाढत्या फेऱ्यांमुळे विमानतळावर विमानाच्या पार्किंगची व्यवस्था कमी पडत आहे. त्यामुळे विमानांना जागा होईपर्यंत हवेत घिरट्या घालाव्या लागत आहेत. परिणामी, विमानांना विलंब होत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यातच अलीकडच्या काळात हिवाळ्यामुळे दिल्लीसह उत्तर भारतातील काही विमानांना दाट धुक्यामुळे धावपट्टीवर उतरता आले नाही. 

टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळ