शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, अचौर्य आणि अनेकांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 06:00 IST

माणसाचे जीवन बदलण्याची शक्ती असलेली तत्वे म्हणजे भगवान महावीरांनी जगाला दिलेली अमोल देणगी आहे!

ठळक मुद्देमहावीर भगवान यांच्या तत्त्वांचा अंगीकार करणारा वर्तनाने सज्जन व भावनेने सहृदयी होतो. या गुणांकडे जाण्याचा मार्ग महावीर आपल्या उपदेशातून करतात.

- सेवादास दलिचंद ओसवाल

(संघपती, जळगाव)

भगवान महावीर यांचा कार्यकाळ २५०० वर्षांपूर्वीचा मानला जातो. कुंललपूरच्या (बिहार) राजघराण्यात जन्मलेल्या महावीर यांनी वयाच्या ३० व्या वर्षी सन्यस्थ व्रत स्वीकारले. आत्मकल्याण करण्यासाठी जैन दीक्षा घेऊन ते एक तपस्वी बनले. त्यानंतर आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीसाठी त्यांनी साडेबारा वर्षं तपश्चर्या केली. सुख-सुविधा त्यागून आत्मा आणि शरीर यातला संबंध ते शोधू लागले.

शरीर आणि आत्मा वेगवेगळे आहेत. आत्मा अजर-अमर-अविनाशी आहे. कर्म करण्यासाठी शरीर महत्त्वाचे आहे. पण शरीर नाशवंत असून ते फक्त माध्यम आहे, असा मुक्तीचा साधा-सोपा उपदेश महावीर यांनी समस्त मानव समाजाला केला.

भगवान महावीर यांना त्रिलोकांचे कैवल्य ज्ञान प्राप्त झाले. चांगला समाज निर्माण करण्यासाठी, समाजकल्याणासाठी महावीर यांनी ज्ञान प्रसारणाचे अविरत कार्य केले. समाजावर आणि माणसांवर प्रेम करा असा संदेश देण्यासाठी महावीर देशभर फिरले. अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, अचौर्य आणि अनेकांत या सहा तत्त्वांचा प्रसार त्यांनी केला. यातील अहिंसा हे तत्त्व संपूर्ण विश्वाने स्वीकारले. स्व-स्वार्थासाठी दुसऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ न देणे म्हणजे अहिंसा होय. आपल्या शरीराला किंवा मनाला जशा वेदना होतात त्या इतरांनाही होत असतील याची जाणीव होणे म्हणजेच अहिंसेचा स्वीकार करणे.

प्रत्येक व्यक्तीने कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये हाच अहिंसा तत्त्वाचा भावार्थ आहे. सध्या होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास, नातेसंबंधामधील कटुता, अति लोभ हे प्रसंग अहिंसा तत्त्वाचा अंगीकार केल्यास नक्की टाळता येऊ शकतात. या तत्त्वाला अनुसरून प्रत्येक व्यक्तीने त्याच्याजवळ जे आहे ते समाजासाठी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गरीब दुर्बल व्यक्तींना दोष न देता त्यांच्या उत्थानासाठी सदैव प्रयत्न केले पाहिजेत. काहीही झाले तरी सत्य हे सत्य असते, ते थोडे कटू असते, मात्र ते गोड होऊ शकते हेच अहिंसा तत्त्वाचे सार मानायला हवे.

सत्याची कधीही अवहेलना करू नये. कोणाचीही, कोणत्याही प्रकारे फसवणूक करणे म्हणजे चोरी करणे. असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला त्याचे फळ इतर कोणत्याही रूपाने मिळत असते. सभोवतालचे वातावरण कसेही असले तरी मनावर नियंत्रण पाहिजे.

अपरिग्रह म्हणजे आपल्या मेहनतीने आणि प्रारब्धाने जे मिळाले त्याचा अहंकार न बाळगता आपल्या सोबत असलेल्यांना मदतीचा हात देऊन त्यांनाही प्रगतीसाठी संधी देणे. अपरिग्रहामध्ये आपल्याला मिळालेल्या संपत्तीमधून कायम समाजासाठी देण्याची भावना अभिप्रेत आहे. थोडक्यात अनीतीने पैसा न कमाविणे म्हणजे अपरिग्रह होय.

प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक बाबतीत आपले मत हे अंतिम सत्य आहे असे न मानता इतर व्यक्तींचेही मत विचारात घेऊन त्यावर उपाय काढणे, विषय सोडविणे यालाच अनेकांत म्हणतात. विचारांमध्ये लवचीकता असली पाहिजे तसेच प्रत्येक व्यक्तीचे मत महत्त्वाचे असल्याने तेही विचारात घेणे अनेकांत या तत्त्वामध्ये अभिप्रेत आहे.

- महावीर भगवान यांच्या तत्त्वांचा अंगीकार करणारा वर्तनाने सज्जन व भावनेने सहृदयी होतो. या गुणांकडे जाण्याचा मार्ग महावीर आपल्या उपदेशातून करतात.