शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

Agneepath: मुद्द्याची गोष्ट : सैन्य भरतीची ‘अग्निपथ’ योजना वादात; लाखो तरुणांच्या आकांक्षांचे काय?

By वसंत भोसले | Updated: June 19, 2022 12:35 IST

Agneepath: जागतिकीकरणाची नीती जगभर स्वीकारली गेली, तेव्हा प्रत्येक क्षेत्रात बदल करण्याची स्पर्धा लागली. वास्तविक बलाढ्य देशांना हवी तशी आंतरराष्ट्रीय समीकरणे तयार केली जातात आणि त्यामागे धावत जाऊन आपण फसतो. भारतीय लष्करातील भरतीची नवी योजना ‘अग्निपथ’देखील त्याच माळेतील एक योजना आहे.

- वसंत भोसले, संपादक, लोकमत, काेल्हापूरजागतिकीकरणाची नीती जगभर स्वीकारली गेली, तेव्हा प्रत्येक क्षेत्रात बदल करण्याची स्पर्धा लागली. वास्तविक बलाढ्य देशांना हवी तशी आंतरराष्ट्रीय समीकरणे तयार केली जातात आणि त्यामागे धावत जाऊन आपण फसतो. भारतीय लष्करातील भरतीची नवी योजना ‘अग्निपथ’देखील त्याच माळेतील एक योजना आहे. भारताचे प्रश्न हे जगाचे नाहीत आणि जग ज्याप्रकारे आपले प्रश्न सोडविते, ते उपाय आपल्या कामाचे नाहीत, याचा विचार कधी आपण करणार आहोत की नाही? असा सवाल उपस्थित होतो.अनेक अभिजन वर्गातील स्वत:ला विद्वान समजणारे असे मांडतात की, इस्त्रायलमध्ये सैनिकी प्रशिक्षण आणि सेवा सक्तीची आहे. इंग्लंडचा राजपुत्रदेखील काही वर्षे लष्करी सेवेत व्यतीत करतो. वास्तविक ही त्यांची गरज आहे. लष्करी सेवेत येण्यास तरुण-तरुणी तयार होत नाहीत. परिणामी त्यांना सक्ती करावी लागते. इस्त्रायल-पॅलेस्टाईनचा संघर्ष हा कोणत्याही बाजूने अभिमानाने सांगावा असा नाही. तो रक्तरंजित आहे. त्यांचे धोरण आपणास आवश्यक नाही. लष्कर भरतीची प्रक्रिया कधी सुरू होणार आहे, याचा थांगपत्ता नसतानाही लाखो तरुण रोजचा शारीरिक सराव करीत असतात. हजारोंच्या संख्येने तरुण लष्करात भरती होण्यासाठी येतात. पोटावर लष्कर चालते, असे म्हणतात. त्यात तथ्य आहे.‘अग्निपथ’ योजना जाहीर होताच तरुणांमध्ये ‘अग्निदोष’ का निर्माण झाला?  तो कोण-कोणत्या प्रदेशात निर्माण झाला आहे? याचे सामाजिक आणि आर्थिक कारणांमध्ये गूढ लपलेले आहे. महाराष्ट्रातील तरुणांचे प्रमाण केवळ सात टक्के आहे. कारण महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध आहे. दर्जेदार नसले तरी चांगले शिक्षण उपलब्ध आहे. महाराष्ट्राने आपल्या प्रदेशाच्या प्रगतीसाठी जी शिस्तबद्ध पावले उचलली आहेत, त्याचा हा परिणाम आहे. दक्षिणेतील राज्यांनी उशिरा सुरुवात केली आणि महाराष्ट्रापेक्षा अधिक वेगाने प्रगती साधली. अग्निपथ योेजनेतील बदलांचे पडसाद या प्रदेशात उमटणार नाहीत. उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा, राजस्थान, झारखंड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आदी राज्यांत याचे पडसाद अधिक उमटणार आहेत. कारण या प्रदेशातील तरुणांना दर्जेदार चांगले शिक्षण मिळत नाही, रोजगाराच्या संधी मिळत नाहीत. लष्करात भरती होऊन आयुष्याचे सार्थक करण्याची मोठी संधी असते. ती अग्निपथ योजनेने हिरावून घेतली जाणार आहे. तरुणांच्या उद्रेकाची ही कारणे आहेत. त्यांना सैनिक होण्याची तसेच अभिमानाची नोकरी मिळणार नाही, याचा राग आहे.तरुणांच्या दृष्टिकोनातून आपण पाहिले तर, सरकारचा निर्णय अयोग्य वाटतो. सरकार हा निर्णय घेण्याचे कारण सैनिकांचा निवृत्ती वेतनाचा (पेन्शन) भार कमी करायचा आहे. आता सुमारे सव्वापाच लाख कोटी रुपये निवृत्त सैनिकांवर खर्ची पडतात. निवृत्ती वेतनच द्यायला लागू नये म्हणून किमान पंधरा वर्षांची लष्करातील सेवा चार वर्षांवर आणून ठेवण्यात आली आहे. देशाच्या संरक्षण व्यवस्थेविषयीची चेष्टा आहे. लष्करी यंत्रणा, त्यातील मनुष्यबळ, आधुनिकीकरण आदी सुसज्ज करण्यासाठी परिपूर्ण असे मनुष्यबळ असावे लागते. सतरा-अठरा वर्षांच्या तरुणाने शिक्षण अर्धवट सोडून लष्कर सेवेत यावे आणि सहा महिन्यांच्या प्रशिक्षणावर साडेतीन वर्षे सेवा बजावावी. चौथ्या वर्षी नोकरीवरून कमी केलेल्या कामगाराप्रमाणे गावी निघून यावे. ही पद्धत अत्यंत घातक आणि चुकीची आहे.

प्रत्येक गोष्टीचे खासगीकरण, कंत्राटीकरण आणि व्यापारीकरण करून चालणार नाही. संरक्षणाबाबत तरी हा व्यवहार परवडणारा नाही. लाखो घरातील माजी सैनिकांना निवृत्ती वेतन देण्याने समाजाचे पर्यायाने सरकारचा तोटा होत नाही. त्या कुटुंबांच्या आर्थिक स्तराला स्थैर्य मिळत राहते. भारतीय कामगार कायद्यामुळे विकासाला खीळ बसते, असा विचार मांडून सर्वच क्षेत्रांत कंत्राटीकरण करण्यात येत आहे. त्याची सुई लष्करापर्यंत इतक्या लवकर पोहोचेल, असे वाटले नव्हते. पण ज्या समाजाच्या ताकदीवर भारतीय लष्कर उभे आहे, त्यावर घाव घालण्याचा हा प्रयत्न आहे. लष्कराला लागणाऱ्या साहित्याच्या निर्मितीत आत्मनिर्भर व्हावे. मात्र, जिथे निष्ठा, प्रेम, आत्मसमर्पण आणि सेवाभाव लागतो, तेथे समाजातील असंतोषाने बळ मिळणार नाही. 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाDefenceसंरक्षण विभाग