शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

अस्मानी संकटाला सुलतानी हातभार

By किरण अग्रवाल | Updated: July 25, 2021 11:43 IST

Administrative contribution to the Natural calamity : अस्मानी संकट समजून घेता यावे; पण या संकटाला साहाय्यभूत ठरणाऱ्या सुलतानी व्यवस्थांच्या दुर्लक्षाकडे कुणी लक्ष देणार आहे की नाही?

- किरण अग्रवाल

संकटे सांगून येत नसतात, त्यामुळे ऐनवेळी नुकसानीस सामोरे जावे लागणे अटळ असते; परंतु अशा अकस्मात ओढवणाऱ्या संकटाला मानवी चुकांचाही हातभार लागून गेल्याचे जेव्हा आढळून येते तेव्हा त्याबद्दल संताप व्यक्त होणे स्वाभाविक ठरते. अकोल्यात बरसलेल्या जोर‘धारे’ने जे नुकसान झाले व त्यातही वित्तहानीबरोबरच जीवितहानीही झाली, त्यामागे व्यवस्थांचे दुर्लक्ष वा बेजबाबदारीच समोर येत असल्याचे पाहता यापुढील काळात तरी त्याकडे गांभीर्याने लक्ष पुरवणे गरजेचे ठरावे.

खरिपाच्या पेरण्या आटोपल्यानंतर पावसाने काहीशी ओढ दिल्याने बळीराजाच्या डोळ्यांत तसेही पाणी आलेलेच होते, अशात तो असा काही आला व बरसून गेला की, काही ठिकाणी होत्याचेही नव्हते करून गेला. विदर्भात सर्वाधिक पाऊसअकोला जिल्ह्यात बरसला. अकोल्यासह बार्शीटाकळी, बाळापूर, पातूर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. गेल्या दहा वर्षातील हा उच्चांकी पाऊस होता, ज्यात पठार नदीच्या पुरात एक शेतकरी वाहून गेला तर दोनवाडा जवळच्या कोल्हा नाल्याला पूर आल्याने एका महिला रुग्णाला अकोल्यात हलवता न आल्याने तिचा मृत्यू झाला. जिल्ह्यात तब्बल ३३४ जनावरांच्या मृत्यूची आकडेवारीही समोर आली आहे. नदीकाठच्या शेकडो घरांमध्ये पाणी शिरले, अनेकांचा संसार वाहून गेला. शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागातही पाणी शिरल्याने रुग्णांना जीव मुठीत घेऊन रात्र काढण्याची वेळ आली. ग्रामीण भागातही पिके पाण्याखाली गेली व शेती खरडली गेली, का ओढवले हे संकट? निसर्गाच्या अवकृपेला इलाज नाही, अस्मानी संकट समजून घेता यावे; पण या संकटाला साहाय्यभूत ठरणाऱ्या सुलतानी व्यवस्थांच्या दुर्लक्षाकडे कुणी लक्ष देणार आहे की नाही?

 या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवीत...

अकोल्यातून वाहणाऱ्या मोर्णा नदीचे पात्र दोन्ही बाजूंनी संकुचित झाले आहे. चक्क नदीपात्रात अनेकांनी आपले इमले उभारले असून पूररेषेचा कसलाही विचार न करता त्यांना बांधकाम परवानगी कुणी दिली? पालकमंत्री बच्चू कडू यांनी नुकसानीचे पंचनामे करायचे सांगत मोर्णा नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाचे आदेश दिले, पण या रुंदीकरणाऐवजी आहे ते नदीपात्र आकसायला कारणीभूत ठरलेल्यांचे काय? पावसाच्या पाण्याचा निचरा करणारे व पाणी वाहून नेणारे लहान-लहान नाले बुजवून त्यावर इमारतींचे जंगल उभे करण्याचे पातक कुणाचे? पावसाळीपूर्व कामांमधील प्राधान्याने करावयाची शहरातील नालेसफाई पूर्णांशाने झाली नाही, त्याची जबाबदारी कुणाची होती? पावसाने रौद्ररूप धारण केल्याने अकोल्यात हाहाकार उडाला असताना जिल्हा वाऱ्यावर सोडून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व महानगरपालिकेचे अधिकारी अमरावतीच्या बैठकीत गेले, यासाठी आमदार रणधीर सावरकर व गोवर्धन शर्मा आदींना ठिय्या देण्याची वेळ आली, तेव्हा या बेजबाबदारीचे काय? घरादारात, दुकानात पाणी शिरून नुकसान होत असताना आपत्ती निवारण यंत्रणा कुठे व काय करीत होती?

 

सारांशात, जिल्हा प्रशासन असो की, महापालिका व जिल्हा परिषदेच्या स्थानिक यंत्रणा; त्यांच्या दुर्लक्षामुळेच नदीपात्र आकुंचले. नाले बुजविले गेले व पावसाळी नाल्यांची सफाईही रखडली. त्यामुळेच पावसाचे पाणी तुंबले व हाहाकार उडाला, तेव्हा यापुढे तरी मुंबईची तुंबई होते तसे अकोल्याचे होऊ नये म्हणून सुलतानी कारभारात बदल घडून येणे अपेक्षित.

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊसfloodपूर