शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

अभिनय, दिग्दर्शनातून अकोल्याचा तरुण उमटवतोय मराठी चित्रपटसृष्टीत ठसा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 06:05 IST

शेतकरी कुटुंबातील तरुण. तोही कट्यारसारख्या छोट्याशा गावात राहून मराठी चित्रपटसृष्टीत जाण्याचे स्वप्न पाहतो आणि आपल्या मेहनतीच्या, संघर्षाच्या जोरावर हा तरुण अभिनय, दिग्दर्शनातून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवितो आणि मराठी चित्रपटसृष्टीलाही दखल घ्यायला भाग पाडतो.

नितीन गव्हाळेअशा तरुणाचे नाव आहे, मयूर नाजूकराव खराटे. अकोल्यापासून २५ किलोमीटर अंतरावर कट्यार गावातील शेतकरी कुटुंबातील हा मुलगा. वडील नाजूकराव खराटे हे बोरगाव मंजू येथे उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक. मयूरची आई प्रतिभा खराटे गृहिणी आहेत. लहानपणापासूनच मयूरला चित्रपट, नाटक पाहण्यासोबत शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची आवड होती. यातूनच त्याला शिक्षण पूर्ण करून कला क्षेत्रातच करण्याची उत्कट इच्छा झाली.त्याने पुण्यात महाविद्यालयीन शिक्षणासोबत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत, पुण्यात पथनाट्य, नाट्य स्पर्धा, प्रायोगिक नाटकात भूमिका करू लागला. नाटकात काम करीत असताना अधूनमधून चित्रपटाचे शुटिंग पाहण्यासाठी तो जाऊ लागला. चित्रपट निर्मितीचे ज्ञान घेऊ लागला. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने एमबीए केले. यासोबतच तो स्वत:ची कलाही जोपासत होता. दरम्यान, त्याने एस.के.बी. स्टुडिओच्या अनेक लघुपटात काम केले. ‘केश्या’ या लघुपटात सहायक दिग्दर्शनाची जबाबदारी त्याने घेतली आणि चित्रपट निर्मितीचे तंत्र तो शिकू लागला. पुढे ‘आर्त स्वर’ आणि ‘कैदखाना’ या लघुपटात त्याने मध्यवर्ती भूमिकाही साकारली. त्याचा पुणे, मुंबईचा प्रवास सुरू झाला. वेळोवेळी कष्ट घेत त्याने कला क्षेत्रात चांगल्या पद्धतीने कामे केली. शिक्षण आणि कला क्षेत्रात बॅलन्स सांभाळत त्याला ‘बॅलन्स.. होतंय ना?’ हा मराठी चित्रपट मिळाला आणि मराठी चित्रपटसृष्टीत त्याने यशस्वी पाऊल ठेवले. तरुण दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी ‘बॅलन्स..होतंय ना?’ चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे. त्यातही मयूर खराटे याने सहायक दिग्दर्शनासोबत चित्रपटात भूमिकाही साकारली. मयूर आता चित्रपटसृष्टीत स्वत:च्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविण्यासाठी सिद्ध झाला आहे. येत्या काळात ‘दानव’ या मराठी चित्रपटातही तो भूमिका साकारत आहे. जिल्ह्यातील कट्यारसारख्या छोट्याशा गावातून त्याने सुरू केलेला प्रवास प्रेरणादायी आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक