शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदा होणार डिजिटल; माहिती अधिकाराचा धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 02:30 IST

सर्व कागदपत्रांची होणार संगणकीकृत साठवणूक

नारायण जाधव ठाणे : माहिती अधिकार कायद्याचा धसका घेऊन ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या कागदपत्रांची संगणकीकृत साठवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील काही खर्च राज्य शासन करणार असून काही खर्च जिल्हा परिषदांना करावा लागणार आहे. ही डाक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीम अर्थात दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत.

झिरो पेडन्सी अंतर्गत आणि पेपरलेस कारभारासाठी जिल्हा परिषदेकडे सर्वसामान्य नागरिक, ग्रामपंचायती, पंचायत समित्यांसह राज्य शासनाकडून दररोज शेकडो कागदपत्रे येत असतात. या सर्वांची संदर्भनिहाय वर्गवारी करून त्यांची साठवणूक करून ते जतन करणे मोठे जिकरीचे होऊन बसले आहे. त्यातच माहिती अधिकारातंर्गतही जिल्हा परिषदांकडे मोठ्याप्रमाणात माहिती मागविली जाते. तेंव्हा ही कागदपत्रे शोधून ती संबधितास पुरवितांना जिल्हा परिषद प्रशासनाची मोठी दमछाक होते.

क्लाऊड सेवा : स्कॅनिंग करून झालेल्या या सर्व कागदपत्रांचा डिजिटल डाटाचे व्यवस्थापन करण्यासाठी डाक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीम अर्थात दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात येणार असून तिच सर्व खर्च शासन करणार आहे. सध्या औरंगाबाद जिल्हा परिषदेत हे काम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने सर्व जिल्हा परिषद अशा पद्धतीने डिजिटल होणार आहेत.फिजिकल स्टोरेज :सद्य स्थितीत सर्व जिल्हा परिषदा आपल्यास्तरावर सर्व रेकॉर्ड फिजिकल स्वरूपात रेकॉर्ड रूममध्ये ठेवत असून ते स्कॅन झाल्यावर सर्व फिजिकल रेकॉर्ड स्वखर्चाने क्लाऊडवर अपलोड झाल्यानंतर सर्व फिजिकल रेकॉर्ड स्वखर्चाने जतन करणार आहेत. राज्य पातळीवर स्टॉक होल्डिंग कमिशन आॅफ इंडियासोबत सध्या बोलणी सुरू आहेत. त्याची दरप्रक्रिया पूर्ण झाल्यावर जिल्हा परिषदांना कळविण्यात येणार आहे.मात्र, तोपर्यंत जिल्हा परिषदांनी स्थानिक पातळीवर निविदा काढून ते जतन करावेत किंवा स्वत: जतन करावेत. तसेच नंतर स्टॉक होल्डिंग कमिशन आॅफ इंडियाकडून ही सुविधा घेतली तरी त्याचा खर्च जिल्हा परिषदांनी स्वनिधीतून करावा, असे बजाविण्यात आले आहे. शिवाय जे रेकॉर्ड अत्यंत महत्त्वाचे आहे त्याची हानी होऊ नये किंवा ते गहाळ होऊ नयेत, यासाठी मेटल बॉक्स, कॉम्पक्टर सारख्या साधनांचा वापर करायचा आहे.स्कॅन व अपलोड :जिल्हा परिषदांनी ड वर्ग तसेच ब व क वर्ग पैकी कालबाह्य झालेले रेकॉर्ड वगळून इतर सर्व रेकॉर्ड स्कॅन करून क्लाऊडवर अपलोड करण्याचे बंधन आहे. हा खर्च शासन करणार आहे. त्यानुसार चालू वर्षांतील कागदपत्रे स्कॅन करून जतन करायचे आहेत. त्यानंतर क्रमाक्रमाने जुन्या कागदपत्रांची याप्रकारे साठवणूक करायची आहे. यासाठी जिल्हा परिषदांना ग्रामविकास विभागाकडून मॉडेल रिक्वेस्ट फॉर प्रपोजल देणार असून त्यात स्थानिक परिस्थितीनुसार बदल करण्याचे अधिकार सीईओंना आहेत. ३१ मार्च २०२१ पर्यंतच जिल्हा परिषदांना साठीचा खर्च ग्रामविकास विभागाकडून देण्यात येणार असून तो पर्यंत सर्व नव्या जुन्या कागदपत्रांची स्कॅनिंग करून त्यांची साठवणूक हाणे अपेक्षित आहे. मात्र, हे काम झाले नाही तर नंतर येणारा खर्च जिल्हा परिषदांना स्वनिधीतून करावा लागणार आहे.