शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

झी समूह 'जिंदगी'वरील पाकिस्तानी मालिका करणार बॅन

By admin | Updated: September 24, 2016 12:27 IST

झी समूह जिंदगी चॅनेलवरील पाकिस्तानी मालिका बॅन करण्याच्या विचारात असल्याचे झी समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्र गोयल यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २४ - गेल्या आठवड्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील उरी येथे केलेल्या हल्ल्यात १८ जवानांना प्राण गमवावे लागल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना, मनसे सारख्या राजकीय पक्षांनीही पाकिस्तानवर कारवाई करण्याची तसेच पाकिस्तानी कलाकार, खेळाडूंना देशाबाहेर घालवण्याची मागणी केली असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तान कोंडीत सापडताना दिसत आहे. मनसेने तर शुक्रवारी पाकिस्तानी कलाकारांना ४८ तासांत भारत सोडून पाकिस्तानात जाण्याचा इशारा दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माध्यम क्षेत्रातील आघाडीचा समूह असलेल्या ' झी'नेही पाकिस्तानी कलाकार व मालिकांवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे.  'झी' व ' एस्सेल' समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्र गोयल यांनी शनिवारी सकाळी स्वत:च ट्विटरवरून ही माहिती दिली. 
 
(ऐश्वर्या, शाहरुखचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही - मनसे)
(अमेरिकेसारखी हिम्मत दाखवणार नसाल तर, मोदी सरकार तुमचा काय फायदा ? - उद्धव ठाकरे)
(मोदी आता तरी पाकिस्तानला उत्तर द्या - उद्धव ठाकरे)
 
  •  

 
' पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्तराष्ट्रांच्या सभेत भारताविरुद्ध घेतलेली भूमिका दुर्दैवी असल्याचे सांगत झी समूह जिंदगी (चॅनेलवरील) पाकिस्तांनी कार्यक्रमांवर बंदी घालण्याच्या विचारात असल्याचे' गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 'तसेच पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जायला हवे,' असेही त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या या भूमिकेचे सोशल मीडियावरही स्वागत होत आहे. 'काश्मीरमध्ये भारताकडून मानवाधिकांराचं उल्लंघन होत असून, तेथील जनतेवर अत्याचार केले जात आहेत. काश्मीरमधील  नव्या पिढीला स्वातंत्र्य हवं आहे', असे सांगत नवाज  शरीफ यांनी भारतविरोधी राग आळवला आहे. तसेच ' . काश्मीर प्रश्नाची सोडवणूक केल्याशिवाय भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता आणि सामान्य स्थिती प्रस्थापित केली जाऊ शकत नाही', असे सांगतानाचत्यांनी काश्मीर खोऱ्यात सध्या सुरू असलेली आंदोलने आणि अशांततेबद्दल भारतावर आरोप केले.  ८ जुलै रोजी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या बुऱ्हान वनीचा उल्लेख तर शरीफ यांनी युवा नेता असा केला होता. 
झी जिंदगीवर सध्या ‘बिन तेरे’, ‘एक तमन्ना लहसील सी’, ‘फात्मागुल’, ‘मै हरी पिया’ या मालिका प्रसारित होतात. दोन वर्षांपूर्वी ‘जिंदगी गुलजार है’ ही अभिनेता फवाद खानची मुख्य भूमिका असलेली मालिका प्रचंड गाजली होती. 
भारतात राजकीय पक्षांनी यापूर्वीही पाकिस्तानी कलाकार, गायक, खेळाडू यांना विरोध दर्शवला आहे.