शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

झी समूह 'जिंदगी'वरील पाकिस्तानी मालिका करणार बॅन

By admin | Updated: September 24, 2016 12:27 IST

झी समूह जिंदगी चॅनेलवरील पाकिस्तानी मालिका बॅन करण्याच्या विचारात असल्याचे झी समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्र गोयल यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २४ - गेल्या आठवड्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील उरी येथे केलेल्या हल्ल्यात १८ जवानांना प्राण गमवावे लागल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना, मनसे सारख्या राजकीय पक्षांनीही पाकिस्तानवर कारवाई करण्याची तसेच पाकिस्तानी कलाकार, खेळाडूंना देशाबाहेर घालवण्याची मागणी केली असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तान कोंडीत सापडताना दिसत आहे. मनसेने तर शुक्रवारी पाकिस्तानी कलाकारांना ४८ तासांत भारत सोडून पाकिस्तानात जाण्याचा इशारा दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माध्यम क्षेत्रातील आघाडीचा समूह असलेल्या ' झी'नेही पाकिस्तानी कलाकार व मालिकांवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे.  'झी' व ' एस्सेल' समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्र गोयल यांनी शनिवारी सकाळी स्वत:च ट्विटरवरून ही माहिती दिली. 
 
(ऐश्वर्या, शाहरुखचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही - मनसे)
(अमेरिकेसारखी हिम्मत दाखवणार नसाल तर, मोदी सरकार तुमचा काय फायदा ? - उद्धव ठाकरे)
(मोदी आता तरी पाकिस्तानला उत्तर द्या - उद्धव ठाकरे)
 
  •  

 
' पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्तराष्ट्रांच्या सभेत भारताविरुद्ध घेतलेली भूमिका दुर्दैवी असल्याचे सांगत झी समूह जिंदगी (चॅनेलवरील) पाकिस्तांनी कार्यक्रमांवर बंदी घालण्याच्या विचारात असल्याचे' गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 'तसेच पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जायला हवे,' असेही त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या या भूमिकेचे सोशल मीडियावरही स्वागत होत आहे. 'काश्मीरमध्ये भारताकडून मानवाधिकांराचं उल्लंघन होत असून, तेथील जनतेवर अत्याचार केले जात आहेत. काश्मीरमधील  नव्या पिढीला स्वातंत्र्य हवं आहे', असे सांगत नवाज  शरीफ यांनी भारतविरोधी राग आळवला आहे. तसेच ' . काश्मीर प्रश्नाची सोडवणूक केल्याशिवाय भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता आणि सामान्य स्थिती प्रस्थापित केली जाऊ शकत नाही', असे सांगतानाचत्यांनी काश्मीर खोऱ्यात सध्या सुरू असलेली आंदोलने आणि अशांततेबद्दल भारतावर आरोप केले.  ८ जुलै रोजी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या बुऱ्हान वनीचा उल्लेख तर शरीफ यांनी युवा नेता असा केला होता. 
झी जिंदगीवर सध्या ‘बिन तेरे’, ‘एक तमन्ना लहसील सी’, ‘फात्मागुल’, ‘मै हरी पिया’ या मालिका प्रसारित होतात. दोन वर्षांपूर्वी ‘जिंदगी गुलजार है’ ही अभिनेता फवाद खानची मुख्य भूमिका असलेली मालिका प्रचंड गाजली होती. 
भारतात राजकीय पक्षांनी यापूर्वीही पाकिस्तानी कलाकार, गायक, खेळाडू यांना विरोध दर्शवला आहे.