शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

झी समूह 'जिंदगी'वरील पाकिस्तानी मालिका करणार बॅन

By admin | Updated: September 24, 2016 12:27 IST

झी समूह जिंदगी चॅनेलवरील पाकिस्तानी मालिका बॅन करण्याच्या विचारात असल्याचे झी समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्र गोयल यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २४ - गेल्या आठवड्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील उरी येथे केलेल्या हल्ल्यात १८ जवानांना प्राण गमवावे लागल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना, मनसे सारख्या राजकीय पक्षांनीही पाकिस्तानवर कारवाई करण्याची तसेच पाकिस्तानी कलाकार, खेळाडूंना देशाबाहेर घालवण्याची मागणी केली असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तान कोंडीत सापडताना दिसत आहे. मनसेने तर शुक्रवारी पाकिस्तानी कलाकारांना ४८ तासांत भारत सोडून पाकिस्तानात जाण्याचा इशारा दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माध्यम क्षेत्रातील आघाडीचा समूह असलेल्या ' झी'नेही पाकिस्तानी कलाकार व मालिकांवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे.  'झी' व ' एस्सेल' समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्र गोयल यांनी शनिवारी सकाळी स्वत:च ट्विटरवरून ही माहिती दिली. 
 
(ऐश्वर्या, शाहरुखचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही - मनसे)
(अमेरिकेसारखी हिम्मत दाखवणार नसाल तर, मोदी सरकार तुमचा काय फायदा ? - उद्धव ठाकरे)
(मोदी आता तरी पाकिस्तानला उत्तर द्या - उद्धव ठाकरे)
 
  •  

 
' पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्तराष्ट्रांच्या सभेत भारताविरुद्ध घेतलेली भूमिका दुर्दैवी असल्याचे सांगत झी समूह जिंदगी (चॅनेलवरील) पाकिस्तांनी कार्यक्रमांवर बंदी घालण्याच्या विचारात असल्याचे' गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 'तसेच पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जायला हवे,' असेही त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या या भूमिकेचे सोशल मीडियावरही स्वागत होत आहे. 'काश्मीरमध्ये भारताकडून मानवाधिकांराचं उल्लंघन होत असून, तेथील जनतेवर अत्याचार केले जात आहेत. काश्मीरमधील  नव्या पिढीला स्वातंत्र्य हवं आहे', असे सांगत नवाज  शरीफ यांनी भारतविरोधी राग आळवला आहे. तसेच ' . काश्मीर प्रश्नाची सोडवणूक केल्याशिवाय भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता आणि सामान्य स्थिती प्रस्थापित केली जाऊ शकत नाही', असे सांगतानाचत्यांनी काश्मीर खोऱ्यात सध्या सुरू असलेली आंदोलने आणि अशांततेबद्दल भारतावर आरोप केले.  ८ जुलै रोजी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या बुऱ्हान वनीचा उल्लेख तर शरीफ यांनी युवा नेता असा केला होता. 
झी जिंदगीवर सध्या ‘बिन तेरे’, ‘एक तमन्ना लहसील सी’, ‘फात्मागुल’, ‘मै हरी पिया’ या मालिका प्रसारित होतात. दोन वर्षांपूर्वी ‘जिंदगी गुलजार है’ ही अभिनेता फवाद खानची मुख्य भूमिका असलेली मालिका प्रचंड गाजली होती. 
भारतात राजकीय पक्षांनी यापूर्वीही पाकिस्तानी कलाकार, गायक, खेळाडू यांना विरोध दर्शवला आहे.