शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

युवाशक्तीमुळे भारत जगावर राज्य करेल

By admin | Updated: January 28, 2017 00:04 IST

जगामध्ये केवळ भारत हा देश तरुण असून येथील युवाशक्तीमुळे लवकरच जगावर राज्य करील, हे जगानेही मान्य केले आहे.

राजगुरुनगर : ‘जगामध्ये केवळ भारत हा देश तरुण असून येथील युवाशक्तीमुळे लवकरच जगावर राज्य करील, हे जगानेही मान्य केले आहे. त्यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये नोकरीतील आरक्षणापेक्षा युवकांनी स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करून देण्याची मागणी करावी, असे प्रतिपादन अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील यांनी राजगुरुनगर येथे व्यक्त केले.हुतात्मा राजगुरु महाविद्यालयातील साहेबराव बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेमध्ये ‘देशाला गरज एका अर्थक्रांतीची’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. देवेंद्र बुट्टे-पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर, संचालक शां. ल. घुमटकर, डॉ. अनिल खिंवसरा, बाळासाहेब सांडभोर, सुशील शिंगवी, सुभाष टाकळकर, मुरलीधर खांडगे, अंकुश कोळेकर, अ‍ॅड. राजमाला बुट्टे-पाटील, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, उपप्राचार्य एच. पी. जाधव उपस्थित होते.बोकील म्हणाले, आरक्षणाऐवजी व्यवसायासाठी भांडवलाची मागणी सरकारकडे केली पाहिजे. त्यामधून उद्योग उभे राहतील. नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था बदलायला सुरुवात झाली असून लोकांकडे पडून असलेला पैसा व्यवहारात आला आहे. व्यवहार पारदर्शी होऊ लागले आहेत. देशाच्या तिजोरीत कररूपाने भर पडली आहे. देशाबाहेरून पोसला जाणाऱ्या दहशतवादाला आळा बसला आहे. बनावट नोटा, भ्रष्टाचारामुळे होणारी अर्थव्यवस्थेची हानी टळली आहे. नोटाबंदीचे परिणाम तातडीने दिसणार नसून हळूहळू त्याचा सर्वांनाच फायदा होईल.’ प्रा. व्ही. बी. दौंडकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेंद्र शिरसी यांनी प्रास्ताविक केले. कोमल गायकवाड हिने आभार मानले. (वार्ताहर)