शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
2
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
3
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
4
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
5
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
6
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
7
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
8
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
9
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
10
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
11
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
12
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
13
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
14
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
15
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
16
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
17
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
18
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
19
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
20
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

युवाशक्तीमुळे भारत जगावर राज्य करेल

By admin | Updated: January 28, 2017 00:04 IST

जगामध्ये केवळ भारत हा देश तरुण असून येथील युवाशक्तीमुळे लवकरच जगावर राज्य करील, हे जगानेही मान्य केले आहे.

राजगुरुनगर : ‘जगामध्ये केवळ भारत हा देश तरुण असून येथील युवाशक्तीमुळे लवकरच जगावर राज्य करील, हे जगानेही मान्य केले आहे. त्यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये नोकरीतील आरक्षणापेक्षा युवकांनी स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करून देण्याची मागणी करावी, असे प्रतिपादन अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील यांनी राजगुरुनगर येथे व्यक्त केले.हुतात्मा राजगुरु महाविद्यालयातील साहेबराव बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेमध्ये ‘देशाला गरज एका अर्थक्रांतीची’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. देवेंद्र बुट्टे-पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर, संचालक शां. ल. घुमटकर, डॉ. अनिल खिंवसरा, बाळासाहेब सांडभोर, सुशील शिंगवी, सुभाष टाकळकर, मुरलीधर खांडगे, अंकुश कोळेकर, अ‍ॅड. राजमाला बुट्टे-पाटील, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, उपप्राचार्य एच. पी. जाधव उपस्थित होते.बोकील म्हणाले, आरक्षणाऐवजी व्यवसायासाठी भांडवलाची मागणी सरकारकडे केली पाहिजे. त्यामधून उद्योग उभे राहतील. नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था बदलायला सुरुवात झाली असून लोकांकडे पडून असलेला पैसा व्यवहारात आला आहे. व्यवहार पारदर्शी होऊ लागले आहेत. देशाच्या तिजोरीत कररूपाने भर पडली आहे. देशाबाहेरून पोसला जाणाऱ्या दहशतवादाला आळा बसला आहे. बनावट नोटा, भ्रष्टाचारामुळे होणारी अर्थव्यवस्थेची हानी टळली आहे. नोटाबंदीचे परिणाम तातडीने दिसणार नसून हळूहळू त्याचा सर्वांनाच फायदा होईल.’ प्रा. व्ही. बी. दौंडकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेंद्र शिरसी यांनी प्रास्ताविक केले. कोमल गायकवाड हिने आभार मानले. (वार्ताहर)