शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
5
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
6
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
7
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
8
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
9
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
10
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
11
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
12
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
13
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
14
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
15
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
16
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
17
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
18
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
19
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

चिल्लार नदीत तरुण गेला वाहून

By admin | Updated: July 4, 2016 03:27 IST

कर्जत तालुक्यात रविवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस होता.

नेरळ : कर्जत तालुक्यात रविवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस होता. तालुक्यातील रजपे गावातील काही तरुण चिल्लार नदीमध्ये पोहण्यासाठी गेले असता त्यातील एक तरु ण वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने नदीमध्ये वाहून गेला. तालुक्यातील टेंबरे ग्रामपंचायत मधील रजपे गावातील सागर तानाजी पिंगळे हा आपल्या मित्रासह रविवारी गावाबाहेरून वाहणाऱ्या चिल्लार नदीमध्ये पोहण्यासाठी दुपारी अडीच वाजता घरातून बाहेर पडला. रविवारी सकाळ पासून पावसाची संततधार सुरू असल्याने चिल्लार नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. मात्र स्थानिक असल्याने रजपे गावातील ते सहा तरु ण नदीमध्ये पोहत होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास नदीच्या पात्रात पाण्याचा मोठा लोट वाहून आला आणि त्यात सागर पिंगळे हा तरु ण वाहून गेला. त्याच्या सोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरु णांनी सागरला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असल्याने सागरच्या मित्रांचा शोध अपुरा पडला. चारच्या सुमारास त्याच्या मित्रांनी रजपे गावात येऊन सागर तानाजी पिंगळे नदीमध्ये वाहून गेल्याची माहिती गावकऱ्यांना दिली. सर्व ग्रामस्थांनी वाहून गेलेल्या सागर पिंगळे याचा शोध घेण्यास सुरु वात केली. सात वाजलेतरी सागरचा शोध लागला नव्हता.ग्रामस्थांनी रजपे गावाच्या पुढे धोत्रे, शिलार त्याचप्रमाणे पुढे किकवी असा शोध सुरू केला आहे. तेथे जर सागरचा शोध लागला नाही तर पुढे सुगवे, गुडवन, अंथरट, काळेवाडी, पिंपळोली शोध घ्यावा लागणार आहे. उल्हास नदीचे पात्र चिल्लार नदीपेक्षा तीनपट मोठे असल्याने नदीमध्ये पोहत असताना वाहून गेलेल्या सागरचा शोध घेणे कठीण झाले आहे.