शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तू आलास!

By admin | Updated: June 19, 2016 00:24 IST

भल्या पहाटे पावणेचारच्या सुमारास तुझ्या चाहुलीने जाग आली. तू येणार असा गाजावाजा चालू होता, अंदाज, आडाखे बांधले जात होते. उपग्रहाच्या सोबतीने तुझा रस्ता सारखा धुंडाळत होतो.

- सुधीर महाजन भल्या पहाटे पावणेचारच्या सुमारास तुझ्या चाहुलीने जाग आली. तू येणार असा गाजावाजा चालू होता, अंदाज, आडाखे बांधले जात होते. उपग्रहाच्या सोबतीने तुझा रस्ता सारखा धुंडाळत होतो. तू निघाला; पण गोव्याजवळ पश्चिम घाटाचा चढ तू चढलाच नाहीस. पुन्हा एकदा मनात मळभ दाटलं, वाटलं, असाच चकवा देणार का? आता नक्की येणार असे हाकारे, डांगोरे पिटले गेले आणि आस लागली. काल दिवसभर तुझा कुठे मागमूसही दिसत नव्हता. सूर्यनारायण तळपत होते. रात्री तर चंद्राने खळे केले. पुन्हा शंकेच्या पालीने डोके वर काढले. तू आला नाही तर अशी भीती मनाच्या कोपऱ्यात होतीच. विजांचे ढोल-ताशे नाही की, वाऱ्याचे घुमणे नाही, भल्या पहाटे तू आला न् अलगद ओसरीवर कोणी येऊन बसावे असा सहजपणे. उन्हात तळपून कोळपलेली झाडं-झुडपं अधाशासारखी तुला अंगावर घेत होती. तापलेल्या मातीचं फूल उमललं आणि मृदगंध पसरला. तू साखर झोप चाळवली; पण तुझ्या येण्यामुळे सारखेचा गोडवा अजूनही तोंडात नव्हे तर आसमंतात पसरला त्याचे काय मोल? तू ताल धरला तो अर्धा पाऊण तास. त्यातच तुझ्याशी बोलायला आतुर झालो. कारण गेल्या तीन वर्षांत तू आमच्याशी का अबोला धरला? तू कट्टी घेतो; पण आमचा जीव जातो. तुझे रुसवे-फुगवे आम्हाला आयुष्यातून उठवतात. गेल्या सात-आठ महिन्यांत आमची काय दैना झाली. तुझ्या शोधात आकाश-पाताळ एक करताना विहिरीत पडून किती जणांना जीव गमवावा लागला. न्हात्याधुत्या बोहोल्यावर चढायची स्वप्न रंगविणाऱ्या किती लेकी-बाळींचा खोल विहिरींनी घास घेतला. कर्ती पोर गेल्याने माय-बाप हबकून गेले. पोरांप्रमाणे जपलेल्या जित्राबांना अनेकांनी बाजार दाखविला, तो खुशीने नव्हे. दावणी मोकळ्या होत गेल्या आणि शेतीचा बारदाना उजाड झाला. जनावरानं बाजाराचा रस्ता धरला की, घरावर मरणकळा उतरते हे तुला माहीत नसावं. तुझ रुसणं एवढ्यावरच थांबलं नाही. घरंच्या घरं देशोधडीला लागली. गावातून मुळासकट उपटली गेली आणि शहरात रुजायची लढाई लढू लागली. ती रुजणार नाही तर आयुष्यभर, उपऱ्याचं जिणं नशिबी आलं. या उपरेपणाचं दु:ख भोगणं म्हणजे वनवास. बैल बारदाना गेला, शेतीचा पट उधळला आणि असं वनवाशाचं जिणं अनेकांच्या नशिबी आलं, गाव सुटलं त्या सोबतीने नात्याचे बंध तुटले आणि असे अनेक सैरभैर झाले, ते आयुष्यभरासाठी. नात्याचे हे बळकट बंधच माणसाला संकटात सावरतात, ते तुटल्यानंतर वावटळीत अडकल्याची अवस्था येते. हे रडगाणं सांगू तेवढं कमीच आहे. तू ऐकणार असशील तर सांगण्यात काही अर्थ आहे, म्हणून म्हणतो, तुझा अबोला आम्हाला परवडणारा नाही. तू काय सैराटासारखा इथे नाही तर तिथे फिरतोस. आम्ही मातीशी बांधले गेलो, तू आलास तर या मातीच्या चिखलात घट्ट पाय रोवण्याची आमच्यात धमक आहे. आम्हाला तुझ्या मागे फिरता येत नाही. कोण अलेक्झांडर फे्रटर नावाचा माणूस त्याने तुझा केरळातून चेरापुंजीपर्यंत पाठलाग केला आणि तुझे राजस, तामस, नखरे पाहिले. तुझं हसवणं, रडवणं शब्दबद्ध केलं; पण तुझा लहरी स्वभाव त्यालाही कळला नाही. तो तुझ्या मागेमागेच फिरत राहिला. किती जणांनी नजरांचे गालिचे तुझ्यासाठी अंथरले होते. तू आलास तर जरा आल्यासारखा राहा. बऱ्याच दिवसांनी घरी आला. सुख-दु:खाच्या गोष्टी करता येतील. तुला काय सांगू न् काय नको असं झालंय. तुझ्या शिडकाव्याने ते जिरतील, अंगाची, मनाची आणि मातीची तलखी थांबेल. यापेक्षा आणखी काय मागू?