शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘इवल्या इवल्या गोष्टी’त तू आहेस जवळपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 02:39 IST

उत्कर्षाची माझी ओळख ही तिच्या कवितेवरील प्रेमातून झालेली असल्याने ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि जवळची मैत्रीण असे होत गेल्याने, ही मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहील, हा माझा विश्वास नियतीने असा घाईने ठरवायला नको होता, हे सतत वाटतेय.

- डॉ.अस्मिता गुरव उत्कर्षाची माझी ओळख ही तिच्या कवितेवरील प्रेमातून झालेली असल्याने ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि जवळची मैत्रीण असे होत गेल्याने, ही मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहील, हा माझा विश्वास नियतीने असा घाईने ठरवायला नको होता, हे सतत वाटतेय. तिच्या माझ्यात सूर जुळायला अनेक आवडीनिवडी तर सारख्या होेत्याच, पण मुख्य म्हणजे नुसत्या स्वरातून कुणी बोलायचं आणि कुणी ऐकायचं हे न सांगता कळायचं म्हणूनही असेल (कुठल्याही फ्री स्कीम नसताना), आमच्या तासंतास मोबाइलवर बोलणं-ऐकण्याने आम्ही मोबाइल कंपनीचं भलं करत होतो. उत्कर्षा म्हणजे उत्साहाचा खळाळता झरा... अभ्यासू-व्यासंगी, आयुर्वेद चिकित्सक म्हणून ती एमडी होतीच... नाटक, चित्रपट, गाणं, वाचणं, याबरोबरच माणूस शोधण्याची तिची जाणीव अतिशय तल्लख होती. सहजरीत्या भेटलेल्या आणि त्यातून तिला जाणवलेल्या बºया-वाईट अनुभवांबद्दल ती भरभरून बोलत असे. तिचे अनुभव कथन हे कित्येकदा कथाकथनासारखे ऐकत राहावेसे वाटायचे.‘व्हीजन’च्या वर्कशॉपमध्ये आहार-विहार दिनचर्येवर बोलत असताना, काळाच्या ओघात केव्हाच मागे पडलेली ‘फॅमेली डॉक्टर’ ही संकल्पना प्रत्यक्षात अनुभवता येत असे, पण त्याहीपेक्षा ती जेव्हा मेडिटेशनचे सेशन घेत असे, तेव्हा तिची शब्दरचना आणि आवाजातल्या जादूने संमोहित होत, स्वप्निल दुनियेत फिरून अलगद वास्तवात येताना माणूस फ्रेश व्हायचाच.उत्कर्षाला कुठलीही गोष्ट पटकन पटेल किंवा कोणतीही व्यक्ती चटकन आवडेल असे नव्हतेच. तिची आवड-निवड ही साधी-सरळ म्हणता येईल, अशी नव्हती हे जसं खरं तसच तिचं जर कुणाशी जमलच तर मात्र ते सगळ अगदी मनापासून असायचं हेही खरे... त्यात कधीही ओठावर एक आणि पोटात एक हा प्रकार नाही. तिला आवडलेलं पुस्तक असो किंवा खटकलेलं काही असो, त्या प्रत्येक गोष्टीबाबत तिच्याकडे कारणासहित स्पष्टीकरण असायचं.‘चला वाचू या’ हा ‘व्हीजन’तर्फे उपक्रम सुरू करण्याचा उद्देशच साहित्य-सांस्कृतिक वर्तुळात आपल्या परीने काही तरी करत राहण्याचा आहे. उत्कर्षा ‘व्हीजन’ची संचालिका. तिचा उत्साही सहभाग असायचा. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे संदर्भासहित असूनही, हलकाफुलक्या पद्धतीने किती श्रवणीय असू शकते, हे ती नेहमीच दाखवून देत असे. उत्कर्षाने कधीही कागदवर स्क्रिप्ट लिहून सूत्रसंचालन केले नाही. तिच्या हाती माईक आला की, सुरू व्हायचा वाक्गंगेचा ओघ, रसिक त्या प्रवाहात तरंगत जाऊ लागे आणि मैफल रंगून जाई... मला तर नेहमी शारदास्तुतीतल्या ओळीच आठवत..विचार कारंजावर तुषार शब्दांचे नाचवी,सुख-दु:खाचे घेऊन झोके जिव्हेला खेळवी...रवींद्रनाथ टागोर, शरदचंद्र मुक्तिबोध, बहिणाबाई, माडगूळकर, इंदिरा संत, नारायण सुर्वे, आरती प्रभू, अरुणा ढेरे हे आवडते साहित्यिक यांच्या साहित्यावर तिला बोलताना ऐकणं हा आनंदाचा अनुभव... मी हा अनुभव अनेकदा घेतलाय... एकदा सुर्वेच्या कवितेवर ती बोलत असताना, आॅफिसचा डीनर टाइम संपूनही किती तरी वेळ झालेला, पान लावायचं, म्हणून प्यून शोधत आला, तर मी कॅन्टीनच्या बरच दूर झाडाखाली उभी, साहेबांनी बोलावणं पाठवलेलं आणि मग त्यावरून लेखी मेमोसुद्धा पदरी पडला, पण सुर्वेंची कविता आणि उत्कर्षाचं त्यावरच निरुपण यापुढे मेमो ही विचार करण्यासारखी बाब आहे, असं मला मुळीच वाटलं नाही. अर्थात, उत्कर्षाला हे कळल्यानंतर तिने मी घरी असल्यावरच फोन करायचा अशी तंबी दिली.पाऊस हा अजून एक आमच्यातला आवडीचा विषय. मी तिला गमतीनं म्हणायचे माझं गाव जळगाव, पण नावातच ‘जळ’ आहे गावात नाही. आम्ही वर्षानुवर्ष आठवड्यातून दोन किंवा तीन दिवसाआड पाणी भरतो, पण मला समुद्राची प्रचंड ओढ. समुद्रावरला पाऊस, कोकणातला पाऊस यावर ती बोलायला लागली की, मला तिच्या शब्दसरीत थेंबांचा भास व्हायचा आणि मनोमनी आम्ही त्या पावसात चिंब भिजायचो.उत्कर्षाची वर्णनशैली विलक्षण चित्रमय. ऐकताना अणि वाचताना ते ठिकाण-ती माणसं आपल्या डोळ्यासमोर दिसू लागत. तिच्या ‘सदर’ लेखनातल्या काही लेखांच्या पहिल्या खर्ड्याची मी श्रोता-मेल केली तर वाचक असे. तिचे लेखन चांगले गाजले. त्याचं लवकर पुस्तक व्हावं, असा श्रीनिवास आणि आम्हा मित्रमैत्रिणींच्या हट्टाची तिने कधी फारशी दखल घेतलीच नाही. बघू करू या योग येईल, तेव्हा असं म्हणत असे. आज तो योग आलाय, पण ती नाही हा सल आहेच उरात.‘इवल्या इवल्या गोष्टी’ हे ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे आज प्रकाशन... उत्कर्षा इवल्या इवल्या गोष्टीतून तू किती आणि काय काय सांगितलंय... जगण्याच्या प्रवासात पावलोपावली माणूस शोधण्याची तुझी आस त्यातून आलेला हा लेखन प्रपंच... तुझं लेखन आवडेलच ही खात्री आहे... तुझ्या लेखांच्या अभिवाचनाने तुला स्मरणांजली वाहत असलो, तरी अजूनही होतो भास तू आहेसच आसपास...!!

टॅग्स :marathiमराठीMaharashtraमहाराष्ट्र