शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

‘इवल्या इवल्या गोष्टी’त तू आहेस जवळपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 02:39 IST

उत्कर्षाची माझी ओळख ही तिच्या कवितेवरील प्रेमातून झालेली असल्याने ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि जवळची मैत्रीण असे होत गेल्याने, ही मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहील, हा माझा विश्वास नियतीने असा घाईने ठरवायला नको होता, हे सतत वाटतेय.

- डॉ.अस्मिता गुरव उत्कर्षाची माझी ओळख ही तिच्या कवितेवरील प्रेमातून झालेली असल्याने ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि जवळची मैत्रीण असे होत गेल्याने, ही मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहील, हा माझा विश्वास नियतीने असा घाईने ठरवायला नको होता, हे सतत वाटतेय. तिच्या माझ्यात सूर जुळायला अनेक आवडीनिवडी तर सारख्या होेत्याच, पण मुख्य म्हणजे नुसत्या स्वरातून कुणी बोलायचं आणि कुणी ऐकायचं हे न सांगता कळायचं म्हणूनही असेल (कुठल्याही फ्री स्कीम नसताना), आमच्या तासंतास मोबाइलवर बोलणं-ऐकण्याने आम्ही मोबाइल कंपनीचं भलं करत होतो. उत्कर्षा म्हणजे उत्साहाचा खळाळता झरा... अभ्यासू-व्यासंगी, आयुर्वेद चिकित्सक म्हणून ती एमडी होतीच... नाटक, चित्रपट, गाणं, वाचणं, याबरोबरच माणूस शोधण्याची तिची जाणीव अतिशय तल्लख होती. सहजरीत्या भेटलेल्या आणि त्यातून तिला जाणवलेल्या बºया-वाईट अनुभवांबद्दल ती भरभरून बोलत असे. तिचे अनुभव कथन हे कित्येकदा कथाकथनासारखे ऐकत राहावेसे वाटायचे.‘व्हीजन’च्या वर्कशॉपमध्ये आहार-विहार दिनचर्येवर बोलत असताना, काळाच्या ओघात केव्हाच मागे पडलेली ‘फॅमेली डॉक्टर’ ही संकल्पना प्रत्यक्षात अनुभवता येत असे, पण त्याहीपेक्षा ती जेव्हा मेडिटेशनचे सेशन घेत असे, तेव्हा तिची शब्दरचना आणि आवाजातल्या जादूने संमोहित होत, स्वप्निल दुनियेत फिरून अलगद वास्तवात येताना माणूस फ्रेश व्हायचाच.उत्कर्षाला कुठलीही गोष्ट पटकन पटेल किंवा कोणतीही व्यक्ती चटकन आवडेल असे नव्हतेच. तिची आवड-निवड ही साधी-सरळ म्हणता येईल, अशी नव्हती हे जसं खरं तसच तिचं जर कुणाशी जमलच तर मात्र ते सगळ अगदी मनापासून असायचं हेही खरे... त्यात कधीही ओठावर एक आणि पोटात एक हा प्रकार नाही. तिला आवडलेलं पुस्तक असो किंवा खटकलेलं काही असो, त्या प्रत्येक गोष्टीबाबत तिच्याकडे कारणासहित स्पष्टीकरण असायचं.‘चला वाचू या’ हा ‘व्हीजन’तर्फे उपक्रम सुरू करण्याचा उद्देशच साहित्य-सांस्कृतिक वर्तुळात आपल्या परीने काही तरी करत राहण्याचा आहे. उत्कर्षा ‘व्हीजन’ची संचालिका. तिचा उत्साही सहभाग असायचा. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे संदर्भासहित असूनही, हलकाफुलक्या पद्धतीने किती श्रवणीय असू शकते, हे ती नेहमीच दाखवून देत असे. उत्कर्षाने कधीही कागदवर स्क्रिप्ट लिहून सूत्रसंचालन केले नाही. तिच्या हाती माईक आला की, सुरू व्हायचा वाक्गंगेचा ओघ, रसिक त्या प्रवाहात तरंगत जाऊ लागे आणि मैफल रंगून जाई... मला तर नेहमी शारदास्तुतीतल्या ओळीच आठवत..विचार कारंजावर तुषार शब्दांचे नाचवी,सुख-दु:खाचे घेऊन झोके जिव्हेला खेळवी...रवींद्रनाथ टागोर, शरदचंद्र मुक्तिबोध, बहिणाबाई, माडगूळकर, इंदिरा संत, नारायण सुर्वे, आरती प्रभू, अरुणा ढेरे हे आवडते साहित्यिक यांच्या साहित्यावर तिला बोलताना ऐकणं हा आनंदाचा अनुभव... मी हा अनुभव अनेकदा घेतलाय... एकदा सुर्वेच्या कवितेवर ती बोलत असताना, आॅफिसचा डीनर टाइम संपूनही किती तरी वेळ झालेला, पान लावायचं, म्हणून प्यून शोधत आला, तर मी कॅन्टीनच्या बरच दूर झाडाखाली उभी, साहेबांनी बोलावणं पाठवलेलं आणि मग त्यावरून लेखी मेमोसुद्धा पदरी पडला, पण सुर्वेंची कविता आणि उत्कर्षाचं त्यावरच निरुपण यापुढे मेमो ही विचार करण्यासारखी बाब आहे, असं मला मुळीच वाटलं नाही. अर्थात, उत्कर्षाला हे कळल्यानंतर तिने मी घरी असल्यावरच फोन करायचा अशी तंबी दिली.पाऊस हा अजून एक आमच्यातला आवडीचा विषय. मी तिला गमतीनं म्हणायचे माझं गाव जळगाव, पण नावातच ‘जळ’ आहे गावात नाही. आम्ही वर्षानुवर्ष आठवड्यातून दोन किंवा तीन दिवसाआड पाणी भरतो, पण मला समुद्राची प्रचंड ओढ. समुद्रावरला पाऊस, कोकणातला पाऊस यावर ती बोलायला लागली की, मला तिच्या शब्दसरीत थेंबांचा भास व्हायचा आणि मनोमनी आम्ही त्या पावसात चिंब भिजायचो.उत्कर्षाची वर्णनशैली विलक्षण चित्रमय. ऐकताना अणि वाचताना ते ठिकाण-ती माणसं आपल्या डोळ्यासमोर दिसू लागत. तिच्या ‘सदर’ लेखनातल्या काही लेखांच्या पहिल्या खर्ड्याची मी श्रोता-मेल केली तर वाचक असे. तिचे लेखन चांगले गाजले. त्याचं लवकर पुस्तक व्हावं, असा श्रीनिवास आणि आम्हा मित्रमैत्रिणींच्या हट्टाची तिने कधी फारशी दखल घेतलीच नाही. बघू करू या योग येईल, तेव्हा असं म्हणत असे. आज तो योग आलाय, पण ती नाही हा सल आहेच उरात.‘इवल्या इवल्या गोष्टी’ हे ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे आज प्रकाशन... उत्कर्षा इवल्या इवल्या गोष्टीतून तू किती आणि काय काय सांगितलंय... जगण्याच्या प्रवासात पावलोपावली माणूस शोधण्याची तुझी आस त्यातून आलेला हा लेखन प्रपंच... तुझं लेखन आवडेलच ही खात्री आहे... तुझ्या लेखांच्या अभिवाचनाने तुला स्मरणांजली वाहत असलो, तरी अजूनही होतो भास तू आहेसच आसपास...!!

टॅग्स :marathiमराठीMaharashtraमहाराष्ट्र