शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

‘इवल्या इवल्या गोष्टी’त तू आहेस जवळपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 02:39 IST

उत्कर्षाची माझी ओळख ही तिच्या कवितेवरील प्रेमातून झालेली असल्याने ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि जवळची मैत्रीण असे होत गेल्याने, ही मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहील, हा माझा विश्वास नियतीने असा घाईने ठरवायला नको होता, हे सतत वाटतेय.

- डॉ.अस्मिता गुरव उत्कर्षाची माझी ओळख ही तिच्या कवितेवरील प्रेमातून झालेली असल्याने ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि जवळची मैत्रीण असे होत गेल्याने, ही मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहील, हा माझा विश्वास नियतीने असा घाईने ठरवायला नको होता, हे सतत वाटतेय. तिच्या माझ्यात सूर जुळायला अनेक आवडीनिवडी तर सारख्या होेत्याच, पण मुख्य म्हणजे नुसत्या स्वरातून कुणी बोलायचं आणि कुणी ऐकायचं हे न सांगता कळायचं म्हणूनही असेल (कुठल्याही फ्री स्कीम नसताना), आमच्या तासंतास मोबाइलवर बोलणं-ऐकण्याने आम्ही मोबाइल कंपनीचं भलं करत होतो. उत्कर्षा म्हणजे उत्साहाचा खळाळता झरा... अभ्यासू-व्यासंगी, आयुर्वेद चिकित्सक म्हणून ती एमडी होतीच... नाटक, चित्रपट, गाणं, वाचणं, याबरोबरच माणूस शोधण्याची तिची जाणीव अतिशय तल्लख होती. सहजरीत्या भेटलेल्या आणि त्यातून तिला जाणवलेल्या बºया-वाईट अनुभवांबद्दल ती भरभरून बोलत असे. तिचे अनुभव कथन हे कित्येकदा कथाकथनासारखे ऐकत राहावेसे वाटायचे.‘व्हीजन’च्या वर्कशॉपमध्ये आहार-विहार दिनचर्येवर बोलत असताना, काळाच्या ओघात केव्हाच मागे पडलेली ‘फॅमेली डॉक्टर’ ही संकल्पना प्रत्यक्षात अनुभवता येत असे, पण त्याहीपेक्षा ती जेव्हा मेडिटेशनचे सेशन घेत असे, तेव्हा तिची शब्दरचना आणि आवाजातल्या जादूने संमोहित होत, स्वप्निल दुनियेत फिरून अलगद वास्तवात येताना माणूस फ्रेश व्हायचाच.उत्कर्षाला कुठलीही गोष्ट पटकन पटेल किंवा कोणतीही व्यक्ती चटकन आवडेल असे नव्हतेच. तिची आवड-निवड ही साधी-सरळ म्हणता येईल, अशी नव्हती हे जसं खरं तसच तिचं जर कुणाशी जमलच तर मात्र ते सगळ अगदी मनापासून असायचं हेही खरे... त्यात कधीही ओठावर एक आणि पोटात एक हा प्रकार नाही. तिला आवडलेलं पुस्तक असो किंवा खटकलेलं काही असो, त्या प्रत्येक गोष्टीबाबत तिच्याकडे कारणासहित स्पष्टीकरण असायचं.‘चला वाचू या’ हा ‘व्हीजन’तर्फे उपक्रम सुरू करण्याचा उद्देशच साहित्य-सांस्कृतिक वर्तुळात आपल्या परीने काही तरी करत राहण्याचा आहे. उत्कर्षा ‘व्हीजन’ची संचालिका. तिचा उत्साही सहभाग असायचा. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे संदर्भासहित असूनही, हलकाफुलक्या पद्धतीने किती श्रवणीय असू शकते, हे ती नेहमीच दाखवून देत असे. उत्कर्षाने कधीही कागदवर स्क्रिप्ट लिहून सूत्रसंचालन केले नाही. तिच्या हाती माईक आला की, सुरू व्हायचा वाक्गंगेचा ओघ, रसिक त्या प्रवाहात तरंगत जाऊ लागे आणि मैफल रंगून जाई... मला तर नेहमी शारदास्तुतीतल्या ओळीच आठवत..विचार कारंजावर तुषार शब्दांचे नाचवी,सुख-दु:खाचे घेऊन झोके जिव्हेला खेळवी...रवींद्रनाथ टागोर, शरदचंद्र मुक्तिबोध, बहिणाबाई, माडगूळकर, इंदिरा संत, नारायण सुर्वे, आरती प्रभू, अरुणा ढेरे हे आवडते साहित्यिक यांच्या साहित्यावर तिला बोलताना ऐकणं हा आनंदाचा अनुभव... मी हा अनुभव अनेकदा घेतलाय... एकदा सुर्वेच्या कवितेवर ती बोलत असताना, आॅफिसचा डीनर टाइम संपूनही किती तरी वेळ झालेला, पान लावायचं, म्हणून प्यून शोधत आला, तर मी कॅन्टीनच्या बरच दूर झाडाखाली उभी, साहेबांनी बोलावणं पाठवलेलं आणि मग त्यावरून लेखी मेमोसुद्धा पदरी पडला, पण सुर्वेंची कविता आणि उत्कर्षाचं त्यावरच निरुपण यापुढे मेमो ही विचार करण्यासारखी बाब आहे, असं मला मुळीच वाटलं नाही. अर्थात, उत्कर्षाला हे कळल्यानंतर तिने मी घरी असल्यावरच फोन करायचा अशी तंबी दिली.पाऊस हा अजून एक आमच्यातला आवडीचा विषय. मी तिला गमतीनं म्हणायचे माझं गाव जळगाव, पण नावातच ‘जळ’ आहे गावात नाही. आम्ही वर्षानुवर्ष आठवड्यातून दोन किंवा तीन दिवसाआड पाणी भरतो, पण मला समुद्राची प्रचंड ओढ. समुद्रावरला पाऊस, कोकणातला पाऊस यावर ती बोलायला लागली की, मला तिच्या शब्दसरीत थेंबांचा भास व्हायचा आणि मनोमनी आम्ही त्या पावसात चिंब भिजायचो.उत्कर्षाची वर्णनशैली विलक्षण चित्रमय. ऐकताना अणि वाचताना ते ठिकाण-ती माणसं आपल्या डोळ्यासमोर दिसू लागत. तिच्या ‘सदर’ लेखनातल्या काही लेखांच्या पहिल्या खर्ड्याची मी श्रोता-मेल केली तर वाचक असे. तिचे लेखन चांगले गाजले. त्याचं लवकर पुस्तक व्हावं, असा श्रीनिवास आणि आम्हा मित्रमैत्रिणींच्या हट्टाची तिने कधी फारशी दखल घेतलीच नाही. बघू करू या योग येईल, तेव्हा असं म्हणत असे. आज तो योग आलाय, पण ती नाही हा सल आहेच उरात.‘इवल्या इवल्या गोष्टी’ हे ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे आज प्रकाशन... उत्कर्षा इवल्या इवल्या गोष्टीतून तू किती आणि काय काय सांगितलंय... जगण्याच्या प्रवासात पावलोपावली माणूस शोधण्याची तुझी आस त्यातून आलेला हा लेखन प्रपंच... तुझं लेखन आवडेलच ही खात्री आहे... तुझ्या लेखांच्या अभिवाचनाने तुला स्मरणांजली वाहत असलो, तरी अजूनही होतो भास तू आहेसच आसपास...!!

टॅग्स :marathiमराठीMaharashtraमहाराष्ट्र