शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

येऊरचा विवेकानंद बालआश्रम संकटात

By admin | Updated: August 13, 2014 03:07 IST

महिला व बालविकास विभागाने आश्रमाची मान्यता रद्द केल्यामुळे १९८२ पासून अनाथ मुलांचे आश्रयस्थान बनलेला येऊर येथील विवेकानंद बालआश्रम संकटात सापडला आहे.

नामदेव पाषाणकर, घोडबंदरमहिला व बालविकास विभागाने आश्रमाची मान्यता रद्द केल्यामुळे १९८२ पासून अनाथ मुलांचे आश्रयस्थान बनलेला येऊर येथील विवेकानंद बालआश्रम संकटात सापडला आहे. आश्रमाच्या जागेवर बिल्डरांचा डोळा असल्याने नको ती कारणे दाखूवन तो बंद करण्याचा घाट काही कथीत राजकारण्यांनी प्रशासनास हाताशी धरून रचला असल्याचे बोलले जात आहे. मात्र यामुळे आश्रमात शिक्षण घेणा-या ६५ विद्यार्थ्यांवर बेघर होेण्याची नामुष्की ओढवली आहे.निसर्गरम्य येऊर परिसरात ३२ वर्षापासून सदर आश्रम आर्थिक दुर्बल घटक विभक्त कुटुंब, आईवडिल नसलेले किंवा दोन्हीपैकी एक मयत असलेल्या कुटुंबातील अनाथ झालेल्या मुलांसाठी वरदान ठरला आहे़ या आश्रमाच्या आवारात मंदिर, गोशाळा असल्यामुळे धार्मिक वातावरणात ही मुले आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत. आश्रम संस्था अनुदानित असली तरी आतापर्यंत शासनाकडून मात्र याला अद्याप अनुदान मिळालेले नसल्याचे विश्वस्तांचे म्हणने आहे. दानशूर लोकांनी दिलेल्या मदतीवर हा आश्रम सुरू आहे.आश्रमाची जागा केंद्र सरकारकडून ४० वर्षांच्या भाडेकरारावर घेण्यात आली आहे. ६ ते १८ वयोगटातील ६५ मुले गतवर्षापर्यंत येथे आश्रयाला होती़ मात्र, एप्रिलमध्ये आश्रमाची मान्यता रद्द केल्याचे पत्र संस्थेला मिळताच खळबळ उडाली होती. सरकारच्या या निर्णयामुळे सर्व मुलांना नाईलाजास्तव आश्रम सोडून जावे लागले होते. मुलांना मळकट कपडे, निकृष्ट दर्जाचे अन्न आणि खेळाचे मैदान नसल्याचा ठपका ठेवून आश्रमाची मान्यता रद्द करण्यात आली. आश्रमाची मान्यता रद्द केली असताना तेथे जर मुले असतील ते कृत्य बेकायदा आहे. तसेच आश्रम संदर्भात मंत्री महोदयांनी विभागीय उपायुक्त कोकण विभाग, उपायुक्त बालविकास आयुक्तालयच, पुणे व उपमुख्य अधिकारी यांना १५ दिवसांत अहवाल देण्यास सांगितले असल्याचे ठाण्याचे महिला व बालविकास अधिकारी शशिकांत चव्हाण यांनी सांगितले.