शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
3
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
4
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
5
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
6
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
7
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
8
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
9
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
10
मोठ्या पडद्यावर फ्लॉप पण बिझनेसमध्ये केली कमाल, चालवतोय १०००० कोटींची कंपनी; कमाईच्या बाबतीत अनेकांना टाकलं मागे
11
ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
12
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
13
सारा तेंडुलकर जेव्हा पापाराझी समोर मराठीत बोलते...; Viral Video पाहून नेटकरीही पडले प्रेमात
14
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
15
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
16
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
17
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
18
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
19
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
20
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर

राष्ट्रवादीसमोर यंदा तगडे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2017 21:39 IST

राष्ट्रवादीतील अनेक कार्यकर्ते भाजपात : सहा बहुमतात, दहा ठिकाणी दुसरे स्थान

वसंत भोसले --- कोल्हापूर  कार्यकर्त्यांची फळी तयार करणाऱ्या आणि ‘मिनी विधानसभा’ अशी ओळख असणाऱ्या जिल्हा परिषदांच्या सभागृहात राष्ट्रवादी कॉँग्रेसचा सर्वत्र दबदबा होता. निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या पंचवीसपैकी सर्वाधिक सहा जिल्हा परिषदेत या पक्षाचे बहुमत तर होतेच, शिवाय दहा ठिकाणी हा पक्ष सर्वांत मोठा म्हणून तगडा दादा होता. दरम्यान, दुसऱ्या फळीतील असंख्य नेते, कार्यकर्ते भाजपच्या गळाला लागल्याने हा दबदबा राखण्याचे आव्हान पेलण्याची ताकद हरवून बसलेला पक्ष, अशी स्थिती आहे.गत निवडणुकीत सत्तारूढ असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने आपल्या नेत्यांना तसेच मंत्र्यांना जिल्हावार जबाबदारी निश्चित केली होती. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या योजनांचा गवगवा आणि तेच स्टार प्रचारकही होते. त्याच्या जोरावर प्रत्येक जिल्ह्यात पक्ष मजबुतीकरणासाठी जिल्हा परिषदांच्या निवडणुका असे स्पष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून व्यूहरचना केल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसने घवघवीत यश मिळविले होते. विशेष करून पश्चिम महाराष्ट्राशिवाय कोकण, मराठवाडा, पश्चिम विदर्भात आपला दबदबा निर्माण केला होता. शिवाय तब्बल सहा जिल्हा परिषदांमध्ये स्पष्ट बहुमत मिळविले होते. सर्वाधिक जिल्हा परिषदांमध्ये बहुमत मिळविणारा आणि दहा जिल्हा परिषदांमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला होता. त्यांची अनेक ठिकाणी मुख्य लढत कॉँग्रेस या मित्रपक्षाशीच होती. भाजप आणि शिवसेना हे विरोधी पक्ष काही अपवादात्मक जिल्ह्यातच स्पर्धेत होते.राष्ट्रवादी कॉँग्रेसने पुणे (४२), सातारा (३९), सांगली (३३), सोलापूर (३३), परभणी (२५) आणि बीड (३०) या सहा ठिकाणी बहुमत मिळविले होते. पंचवीसपैकी केवळ चारच जिल्हा परिषदांमध्ये हा पक्ष तिसऱ्या स्थानावर होता. त्यात औरंगाबाद (१०), वर्धा (८), चंद्रपूर (७) आणि गडचिरोली (९) यांचा समावेश आहे. सर्वांत मोठा पक्ष असणाऱ्या संख्येतही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षच आघाडीवर होता. रायगड (२०), नाशिक (२७), नगर (३२), जालना (१६) आणि अमरावती (२५) या जिल्हा परिषदांचा त्यामध्ये समावेश आहे.राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गत निवडणुकीतील या घवघवीत यशामुळे पंचवीसपैकी चौदा ठिकाणी जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद पटकाविता आले होते. याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्य संख्येच्या जोरावर विधान परिषदेतही सर्वांत मोठा पक्ष होण्यास मदत ठरली होती. आजही या वरिष्ठ सभागृहात हा पक्ष सर्वांत मोठा आहे.राज्यातील सत्ता गेली तसेच अनेक नेते पक्ष सोडून भाजपच्या गळाला लागले आहेत. अनेक जिल्ह्यात अशाच राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्यांच्या ताब्यात भाजप पक्ष गेला आहे. कोकणात या पक्षाच्या नेत्यांच्या गटबाजीमुळे पुरती वाट लागली आहे, अन्यथा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात प्रबळ दावेदार अशी या पक्षाची प्रतिमा होती. ती आता रायगड वगळता इतरत्र संपुष्टात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात या पक्षाचा दबदबा होता, पण अंतर्गत गटबाजीने पक्ष पोखरला आहे. सांगली, कोल्हापूर तसेच सोलापूरसारख्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेतेच भाजपला रसद पुरवित असल्याने चार जिल्हा परिषदांतील स्पष्ट बहुमत राखणे अशक्य आहे. पुणे आणि सातारा वगळता हा पक्ष आता सत्ता बळकाविण्याच्या स्पर्धेतही नाही. खान्देश आणि विदर्भातही पक्षाला वाली राहिलेला नाही. मराठवाड्यातच थोडी स्पर्धा करू शकेल, अशी स्थिती आहे. लातूरमधील भाजपचे तगडे आव्हान समोर येताच कॉँग्रेसशी आघाडी करण्याचा शहाणपणा दाखविला आहे. जालना, नांदेड, परभणी, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत अस्तित्वासाठी लढावे लागणार आहे, तर बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे हीच राष्ट्रवादीविरुद्ध भाजपची लढाई आहे. पक्षाचा एकही चेहरा राज्यभर स्टार प्रचारक म्हणून ‘सोज्वळ’ राहिलेला नसल्याने राष्ट्रवादी या जिल्हा परिषदांतील ‘तगड्या दादां’चे आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता अधिक दिसते.भाजपला चार ठिकाणी भोपळादुसऱ्या स्थानावर असलेल्या जिल्हा परिषदांची संख्या काढली तरी त्यातही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षच आघाडीवर होता. पंचवीसपैकी दहा जिल्हा परिषदांमध्ये हा पक्ष दुसऱ्या स्थानावर आहे. त्यात रत्नागिरी (१९), सिंधुदुर्ग (१०), जळगाव (२०), कोल्हापूर (१६), हिंगोली (१०), नांदेड (१८), उस्मानाबाद (१९), लातूर (९), बुलडाणा (१३) आणि यवतमाळ (२१) या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. या पंचवीसपैकी एकही जिल्हा परिषद अशी नाही की, जेथे राष्ट्रवादीचा सदस्य नाही, याउलट भाजपला चार ठिकाणी खातेही उघडता आले नव्हते. शिवसेनेला तीन ठिकाणी खाते उघडता आले नव्हते. एक आकडी सदस्य संख्या असलेल्या केवळ तीनच जिल्हा परिषदा होत्या.