शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

यंदा होणार ‘दमदार’ पाऊस

By admin | Updated: March 22, 2015 23:47 IST

रबी पिकाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने दिलेल्या तडाख्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला या वर्षीचा मान्सून दिलासादायक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नवी दिल्ली : मान्सून २०१४ चे विलंबाने झालेले आगमन, त्यातच दुबार पेरणीचा आणि अखेरच्या टप्प्यात रबी पिकाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने दिलेल्या तडाख्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला या वर्षीचा मान्सून दिलासादायक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.मान्सून २०१५ सामान्य म्हणजे १०२ टक्के तसेच देशभरात तो समप्रमाणात राहण्याची शक्यता असली तरी काही भागात पावसाचे प्रमाण किंचित कमी राहू शकते, असे असोचेम उद्योग मंडळ आणि हवामानाचा अंदाज वर्तवणारी संस्था ‘स्कायवेट वेदर’ने संयुक्तरीत्या जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.अलीकडेच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बहुतांश राज्यांना फटका दिला. उभे पीक नष्ट झाले. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही असेच वातावरण राहण्याची आणि पुन्हा एकदा पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात कृषीचा वाटा १५ टक्के असून ५० टक्के लोकांना शेतीतून रोजगार मिळतो. कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त असल्याने ६० टक्के क्षेत्र पावसावर निर्भर असते. ‘मान्सून २०१५ : कृषी व्यवसाय जोखीम की संधी’ अशा आशयाच्या शीर्षकाखाली अभ्यास सादर करण्यात आला.अल-निनोचा प्रभाव नाहीदरवर्षी पावसावर अल-निनो घटकाचा नकारात्मक प्रभाव दिसून येतो. पावसाचे प्रमाण कमी होऊन दुष्काळाचा फटका बसतो. या वर्षी जून ते सप्टेंबर या काळात वातावरणावर अल-निनोचा प्रभाव दिसणार नसल्याने देशभरात सामान्य पाऊस राहण्याची शक्यता आहे, असे रावत यांनी अहवाल जारी करताना म्हटले. २०१४ मध्ये हवामानदृष्ट्या सौम्य दुष्काळाची स्थिती होती. पुन्हा तशीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता अवघी ३ टक्के आहे. भारतीय उपसागरात द्विध्रुवाची (आयओडी) उत्पत्ती होण्याचे संकेत नसल्यानेही पाऊस चांगला होईल, असे स्कायमेटचे सीईओ जतीन सिंग यांनी म्हटले. अहवालानुसार प्रमाण उणे किंवा अधिक चारने चुकू शकते. (लोकमत न्यूज नेटवर्क)देशभरात पावसाचे प्रमाण जवळपास सारखेच राहणार असले तरी महाराष्ट्रातील मराठवाड्यासह तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड तसेच रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, ईशान्येकडील काही भागांतही पावसाचे प्रमाण तुलनेत कमी असेल, असे असोचेमचे सरचिटणीस डी.एस. रावत यांनी नमूद केले. असा बरसेल मान्सून...जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात पावसाचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता ६ टक्के आहे. तसे झाल्यास पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) तुलनेत जास्त म्हणजे ११० टक्क्यांच्या वर राहू शकतो.हंगामी पावसाचे प्रमाण एलपीएच्या १०५ ते ११० टक्के म्हणजे सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता ३६ टक्के आहे. एलपीएच्या ९६ ते १०४ टक्के म्हणजे सर्वसाधारण राहण्याची शक्यता ५२ टक्के आहे. एलपीएच्या ९० ते ९५ टक्के म्हणजे सामान्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता ४ टक्के, तर एलपीएच्या तुलनेत ९० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे दुष्काळाची स्थिती राहण्याची शक्यता अवघे २ टक्के असेल.