शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

यंदा होणार ‘दमदार’ पाऊस

By admin | Updated: March 22, 2015 23:47 IST

रबी पिकाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने दिलेल्या तडाख्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला या वर्षीचा मान्सून दिलासादायक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नवी दिल्ली : मान्सून २०१४ चे विलंबाने झालेले आगमन, त्यातच दुबार पेरणीचा आणि अखेरच्या टप्प्यात रबी पिकाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने दिलेल्या तडाख्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला या वर्षीचा मान्सून दिलासादायक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.मान्सून २०१५ सामान्य म्हणजे १०२ टक्के तसेच देशभरात तो समप्रमाणात राहण्याची शक्यता असली तरी काही भागात पावसाचे प्रमाण किंचित कमी राहू शकते, असे असोचेम उद्योग मंडळ आणि हवामानाचा अंदाज वर्तवणारी संस्था ‘स्कायवेट वेदर’ने संयुक्तरीत्या जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.अलीकडेच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बहुतांश राज्यांना फटका दिला. उभे पीक नष्ट झाले. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही असेच वातावरण राहण्याची आणि पुन्हा एकदा पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात कृषीचा वाटा १५ टक्के असून ५० टक्के लोकांना शेतीतून रोजगार मिळतो. कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त असल्याने ६० टक्के क्षेत्र पावसावर निर्भर असते. ‘मान्सून २०१५ : कृषी व्यवसाय जोखीम की संधी’ अशा आशयाच्या शीर्षकाखाली अभ्यास सादर करण्यात आला.अल-निनोचा प्रभाव नाहीदरवर्षी पावसावर अल-निनो घटकाचा नकारात्मक प्रभाव दिसून येतो. पावसाचे प्रमाण कमी होऊन दुष्काळाचा फटका बसतो. या वर्षी जून ते सप्टेंबर या काळात वातावरणावर अल-निनोचा प्रभाव दिसणार नसल्याने देशभरात सामान्य पाऊस राहण्याची शक्यता आहे, असे रावत यांनी अहवाल जारी करताना म्हटले. २०१४ मध्ये हवामानदृष्ट्या सौम्य दुष्काळाची स्थिती होती. पुन्हा तशीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता अवघी ३ टक्के आहे. भारतीय उपसागरात द्विध्रुवाची (आयओडी) उत्पत्ती होण्याचे संकेत नसल्यानेही पाऊस चांगला होईल, असे स्कायमेटचे सीईओ जतीन सिंग यांनी म्हटले. अहवालानुसार प्रमाण उणे किंवा अधिक चारने चुकू शकते. (लोकमत न्यूज नेटवर्क)देशभरात पावसाचे प्रमाण जवळपास सारखेच राहणार असले तरी महाराष्ट्रातील मराठवाड्यासह तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड तसेच रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, ईशान्येकडील काही भागांतही पावसाचे प्रमाण तुलनेत कमी असेल, असे असोचेमचे सरचिटणीस डी.एस. रावत यांनी नमूद केले. असा बरसेल मान्सून...जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात पावसाचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता ६ टक्के आहे. तसे झाल्यास पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) तुलनेत जास्त म्हणजे ११० टक्क्यांच्या वर राहू शकतो.हंगामी पावसाचे प्रमाण एलपीएच्या १०५ ते ११० टक्के म्हणजे सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता ३६ टक्के आहे. एलपीएच्या ९६ ते १०४ टक्के म्हणजे सर्वसाधारण राहण्याची शक्यता ५२ टक्के आहे. एलपीएच्या ९० ते ९५ टक्के म्हणजे सामान्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता ४ टक्के, तर एलपीएच्या तुलनेत ९० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे दुष्काळाची स्थिती राहण्याची शक्यता अवघे २ टक्के असेल.