शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मराठवाड्यात यंदा चांगला पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 04:52 IST

जलयुक्त शिवारची झालेली कामे आणि समाधानकारक पावसामुळे मराठवाड्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी रेल्वेने पाणी आणाव्या लागणाऱ्या लातुरात अद्याप एकही टँकर सुरू झालेला नाही.

औरंगाबाद : जलयुक्त शिवारची झालेली कामे आणि समाधानकारक पावसामुळे मराठवाड्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी रेल्वेने पाणी आणाव्या लागणाऱ्या लातुरात अद्याप एकही टँकर सुरू झालेला नाही.औरंगाबादकरांची भिस्त जायकवाडीवरच राहणार आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांत कमी पाऊस झाल्यामुळे टंचाईसदृश स्थिती आहे. १५१ गावांमध्ये १८६ टँकरने पाणीपुरवठा सध्या सुरू असून, १७९ विहिरी जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. जिल्ह्यात पावसाळा सुरू होईपर्यंत किमान ५०० टँकर लागण्याचा अंदाज आहे. जायकवाडीमध्ये ७५ टक्के पाणीसाठा आहे. १४ मध्यम प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. ६९ लघु प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्याने अनेक गावांत पाणी टंचाईची ओरड सुरू झाली आहे. नांदेड जिल्ह्यात टंचाईच्या झळांना प्रारंभ झाला आहे. १०६ प्रकल्पांमध्ये केवळ ३०़८४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जालन्यात १५ गावांना १८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. बीड जिल्ह्यातील सर्व प्रमुख प्रकल्पांमध्ये मार्चच्या दुसºया आठवड्यापर्यंत ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात २१९ प्रकल्पांत ३६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ परभणीसह नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याची तहान भागविणाºया येलदरी प्रकल्पात केवळ ४़४१ टक्के पाणी उपलब्ध आहे़>लातुरात अद्याप एकाही टँकरचा प्रस्ताव नाहीलातूर जिल्ह्यात ८ मध्यम प्रकल्प असून त्यात सध्या ३८ टक्के जलसाठा आहे़ गेल्या वर्षी रेल्वेने पाणी आणाव्या लागणाºया जिल्ह्यात आतापर्यंत टँकरचा एकही प्रस्ताव नाही. आठ मध्यम प्रकल्पांत ३८.८ टक्के जलसाठा आहे.

टॅग्स :Waterपाणीwater transportजलवाहतूक