शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

यंदा अकरावीच्या प्रवेशासाठी चढाओढ

By admin | Updated: June 11, 2016 02:39 IST

अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई विभागात २ लाख ६९ हजार १७२ जागा उपलब्ध आहे

प्राची सोनवणे,

नवी मुंबई- अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई विभागात २ लाख ६९ हजार १७२ जागा उपलब्ध आहे. यंदा नव्वदीपार विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली असून सीबीएसई बोर्डापेक्षा एसएससी बोर्डाचा निकाल चांगला लागला आहे. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइनबरोबरच आॅफलाइनही प्रवेश घेता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला असून मंगळवारपासून आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यंदाचा निकाल हा गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत १.९० टक्क्यांनी कमी आहे. विशेष प्रावीण्यासह प्रथम क्षेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण ८५ हजार १२३ इतकी आहे तर प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ९४ हजार ७३ इतकी आहे. मुंबई विभागाचा निकाल पाहता २ लाख ९७ हजार ७१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यादृष्टीने जागा कमी असल्याचे दिसून येते. उत्तीर्ण विद्यार्थी आणि जागांची संख्या यांचे गणितच जुळत नसून विद्यार्थी संख्येच्या तुलनेत जागांचे प्रमाण यामध्ये २८ हजार ५५७ इतका फरक आहे. जागा अपुऱ्या पडणार असल्याने विद्यार्थ्यांना आवडीचे कॉलेज निवडता येणार की नाही हा प्रश्न पालकांना सतावत आहे. बँक, व्यवस्थापन, सीए, व्यवसाय आदी क्षेत्रांचा विकास व नोकरीच्या संधी पाहता यावर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी वाणिज्य शाखेकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई विभागातील मान्यताप्राप्त महाविद्यालयांची संख्या ११५६ इतकी आहे. ११,४१६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्याहून अधिक गुण मिळविले आहेत. >अकरावी प्रवेशाचे वेळापत्रकआॅनलाइन प्रवेश अर्ज सादर करणे - ७ जून ते १७ जूनपर्यंतसर्वसाधारण गुणवत्ता यादी घोषित करणे - २० जून सायंकाळी ५वाजता.आॅनलाइन अर्ज तपासून त्रुटी दुरु स्त अद्ययावत करणे - २१, २२ जून दुपारी ३ वाजेपर्यंत प्रथम गुणवत्ता यादी घोषित करणे - २७ जून, सायंकाळी ५ वाजता.प्रथम गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची फी स्वीकारणे (रु . ५०/- फक्त) -२८, २९, ३० जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंतद्वितीय गुणवत्ता यादी घोषित करणे -४ जुलै सायंकाळी ५ वाजता.द्वितीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची फी स्वीकारणे (रु . ५०/- फक्त) - ५ व ७, ८ जुलै (सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत)तृतीय व अंतिम गुणवत्ता यादी घोषित करणे - ११ जुलै , सायंकाळी ५ वाजता.तृतीय व अंतिम गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची फी स्वीकारणे (रु .५०/- फक्त) - १२, १३ जुलै (सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत)शाखांनुसार जागाविज्ञान - ८१,४३१वाणिज्य - १,५३,६७२कला - ३४,०६४इनहाऊस जागाविज्ञान - १०,८५५वाणिज्य - १,५३,६७२कला - २०,१८६अल्पसंख्याक जागाविज्ञान - २०,१३७वाणिज्य - ४२,८८४कला - ७४९७मॅनेजमेंटविज्ञान -४०६८वाणिज्य - ७६७५कला - १७०५आॅनलाइन जागाविज्ञान -४६,३७१वाणिज्य -८२,९२७कला - २०,५१०ंउत्तीर्ण विद्यार्थी व जागांची संख्येत २८ हजार ५५७ इतका फरक आहे.जागा रिक्त राहतील असा शिक्षण विभागाचा दावा : उपलब्ध जागांची संख्या आणि उत्तीर्ण विद्यार्थी संख्या यांच्यातील तफावत पाहता विद्यार्थ्यांची संख्या ही उपलब्ध जागेपेक्षा जास्त आहे. याबाबत शिक्षण विभागाशी चर्चा केली असला शालेय शिक्षण विभागाचे उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी प्रत्येकाला प्रवेश मिळूनही जागा शिल्लक राहतील असे ठामपणे सांगितले आहे.