शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

यंदा अकरावीच्या प्रवेशासाठी चढाओढ

By admin | Updated: June 11, 2016 02:39 IST

अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई विभागात २ लाख ६९ हजार १७२ जागा उपलब्ध आहे

प्राची सोनवणे,

नवी मुंबई- अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई विभागात २ लाख ६९ हजार १७२ जागा उपलब्ध आहे. यंदा नव्वदीपार विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली असून सीबीएसई बोर्डापेक्षा एसएससी बोर्डाचा निकाल चांगला लागला आहे. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइनबरोबरच आॅफलाइनही प्रवेश घेता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला असून मंगळवारपासून आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यंदाचा निकाल हा गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत १.९० टक्क्यांनी कमी आहे. विशेष प्रावीण्यासह प्रथम क्षेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण ८५ हजार १२३ इतकी आहे तर प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ९४ हजार ७३ इतकी आहे. मुंबई विभागाचा निकाल पाहता २ लाख ९७ हजार ७१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यादृष्टीने जागा कमी असल्याचे दिसून येते. उत्तीर्ण विद्यार्थी आणि जागांची संख्या यांचे गणितच जुळत नसून विद्यार्थी संख्येच्या तुलनेत जागांचे प्रमाण यामध्ये २८ हजार ५५७ इतका फरक आहे. जागा अपुऱ्या पडणार असल्याने विद्यार्थ्यांना आवडीचे कॉलेज निवडता येणार की नाही हा प्रश्न पालकांना सतावत आहे. बँक, व्यवस्थापन, सीए, व्यवसाय आदी क्षेत्रांचा विकास व नोकरीच्या संधी पाहता यावर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी वाणिज्य शाखेकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई विभागातील मान्यताप्राप्त महाविद्यालयांची संख्या ११५६ इतकी आहे. ११,४१६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्याहून अधिक गुण मिळविले आहेत. >अकरावी प्रवेशाचे वेळापत्रकआॅनलाइन प्रवेश अर्ज सादर करणे - ७ जून ते १७ जूनपर्यंतसर्वसाधारण गुणवत्ता यादी घोषित करणे - २० जून सायंकाळी ५वाजता.आॅनलाइन अर्ज तपासून त्रुटी दुरु स्त अद्ययावत करणे - २१, २२ जून दुपारी ३ वाजेपर्यंत प्रथम गुणवत्ता यादी घोषित करणे - २७ जून, सायंकाळी ५ वाजता.प्रथम गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची फी स्वीकारणे (रु . ५०/- फक्त) -२८, २९, ३० जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंतद्वितीय गुणवत्ता यादी घोषित करणे -४ जुलै सायंकाळी ५ वाजता.द्वितीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची फी स्वीकारणे (रु . ५०/- फक्त) - ५ व ७, ८ जुलै (सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत)तृतीय व अंतिम गुणवत्ता यादी घोषित करणे - ११ जुलै , सायंकाळी ५ वाजता.तृतीय व अंतिम गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची फी स्वीकारणे (रु .५०/- फक्त) - १२, १३ जुलै (सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत)शाखांनुसार जागाविज्ञान - ८१,४३१वाणिज्य - १,५३,६७२कला - ३४,०६४इनहाऊस जागाविज्ञान - १०,८५५वाणिज्य - १,५३,६७२कला - २०,१८६अल्पसंख्याक जागाविज्ञान - २०,१३७वाणिज्य - ४२,८८४कला - ७४९७मॅनेजमेंटविज्ञान -४०६८वाणिज्य - ७६७५कला - १७०५आॅनलाइन जागाविज्ञान -४६,३७१वाणिज्य -८२,९२७कला - २०,५१०ंउत्तीर्ण विद्यार्थी व जागांची संख्येत २८ हजार ५५७ इतका फरक आहे.जागा रिक्त राहतील असा शिक्षण विभागाचा दावा : उपलब्ध जागांची संख्या आणि उत्तीर्ण विद्यार्थी संख्या यांच्यातील तफावत पाहता विद्यार्थ्यांची संख्या ही उपलब्ध जागेपेक्षा जास्त आहे. याबाबत शिक्षण विभागाशी चर्चा केली असला शालेय शिक्षण विभागाचे उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी प्रत्येकाला प्रवेश मिळूनही जागा शिल्लक राहतील असे ठामपणे सांगितले आहे.