शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

यंदा वह्या, पुस्तके वेळेत

By admin | Updated: April 19, 2016 02:07 IST

मागील वर्षी शैक्षणिक वर्ष संपायला आले असताना विद्यार्थ्यांच्या हाती शैक्षणिक साहित्य पडले होते. दरवर्षी विद्यार्थ्यांना हाच अनुभव येत असल्याने त्याचे खापर पालिकेच्या माथी फोडले जात होते

ठाणे : मागील वर्षी शैक्षणिक वर्ष संपायला आले असताना विद्यार्थ्यांच्या हाती शैक्षणिक साहित्य पडले होते. दरवर्षी विद्यार्थ्यांना हाच अनुभव येत असल्याने त्याचे खापर पालिकेच्या माथी फोडले जात होते. परंतु, यंदा मात्र ते वेळेत विद्यार्थ्यांच्या हाती पडेल, असा विश्वास आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मागील वर्षी व्यक्त केला होता. त्यानुसार, यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होताच विद्यार्थ्यांच्या हाती शैक्षणिक साहित्य पडणार आहे. सलग दोन वर्षांचे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव आता येत्या मंगळवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या शिक्षण समितीने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी लावलेला विलंब आणि महासभेच्या सावळ्या गोंधळामुळे शैक्षणिक साहित्य खरेदीची प्रक्रिया लांबली होती. त्यामुळे वर्षाच्या सुरु वातीला मिळणारे साहित्य वर्ष संपायला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना देण्यास सुरुवात झाली होती. शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी २०१४-१५च्या आर्थिक वर्षात २० कोटी १३ लाखांची आर्थिक तरतूद शिक्षण मंडळाने केली होती. त्यानंतर, हे मंडळ बरखास्त होऊन शिक्षण समितीची निर्मिती झाली. ठाणे पालिकेत सत्तेसाठी चालू असलेल्या सत्ता संघर्षामुळे शिक्षण समिती स्थापन करण्यास सप्टेंबर २०१५ उजाडले. नव्याने निर्माण झालेल्या शिक्षण समितीमुळे पूर्वीची साहित्यवाटपाची आॅर्डर रद्द करावी लागली होती आणि नव्याने ठेकेदार निवडण्याची प्रक्रि या करावी लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हाती उशिराने शैक्षणिक साहित्य पडले होते. हा पूर्वानुभव पाहता यंदा पालिकेने विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच सलग दोन वर्षांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. महापालिकेच्या १२६ प्राथमिक शाळा असून त्यामध्ये सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना आता शैक्षणिक वर्ष सुरू होताच साहित्य मिळणार आहे. यामध्ये गणवेश, दप्तर, स्वेटर, रेनकोट, वॉटरबॅग व लंचबॉक्स, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका छपाई, शाळा व कार्यालयीन साहित्य छपाई, शूज व मोजे आदी साहित्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)