शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

यवतमाळात पंजाब नॅशनल बॅकेच्या एटीएमची तोडफोड

By admin | Updated: November 15, 2016 21:36 IST

पाचशे व हजाराच्या नोटा बदलविण्यासाठी, पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या बँका व एटीएमसमोरील रांगा कायम आहेत. त्यातूनच एका संतप्त ग्राहकाने मंगळवारी येथील पंजाब नॅशनल

ऑनलाइन लोकमत/रूपेश उत्तरवार
यवतमाळ, दि.15 - पाचशे व हजाराच्या नोटा बदलविण्यासाठी, पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या बँका व एटीएमसमोरील रांगा कायम आहेत. त्यातूनच एका संतप्त ग्राहकाने मंगळवारी येथील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये तोडफोड केली. या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. 
यवतमाळातील दारव्हा मार्गावर एका हॉटेलनजीक पंजाब नॅशनल बँकेची नवी शाखा सुरू झाली. त्याच्या बाजूलाच एटीएम उभारण्यात आले आहे. या एटीएमसमोर ८ नोव्हेंबरच्या रात्रीपासून दररोज ४०० ते ५०० ग्राहकांची गर्दी असते. मंगळवारी दुपारीसुद्धा मोठी रांग होती. या रांगेतीलच एका युवकाने आपला नंबर केव्हा लागणार असे म्हणत एटीएमच्या दाराला जोरदार लाथ मारुन काचांची तोडफोड केली. त्याच क्षणी तेथील सायरन वाजल्याने हा ग्राहक पळून गेला. पंजाब नॅशनल बँकेचे शाखा व्यवस्थापक राम खांब यांनी समोरच असलेल्या यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याला या तोडफोडीची सूचना दिली. मात्र एटीएमची तोडफोड झालेले घटनास्थळ आपल्या हद्दीत येत नसल्याचे सांगून त्यांनी कारवाईस असमर्थता दर्शविली. सायंकाळी ६.३० पर्यंतसुद्धा पोलीस तेथे पोहोचले नव्हते. शिवाय तोडफोडीमुळे संपूर्ण एटीएममध्ये काचा विखुरलेल्या होत्या. 
व्यवस्थापक राम खांब यांनी ‘लोकमत’ला सांगितले की,  या तोडफोडीमुळे २० हजारांचे नुकसान झाले आहे. एटीएममधील तोडफोडीनंतर आपण लोकांना पैसे काढणे थांबविण्याची विनंती केली. मात्र लोक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. घटनेवरून चार तास लोटूनही पोलीस न आल्याने एटीएममधील रोकड असुरक्षित झाल्याचे त्यांनी सांगितले. किमान गर्दी ओसरेपर्यंत दोन पोलिसांची सुरक्षा पुरवावी, अशी आपली मागणी आहे. ही सुरक्षा न पुरविली गेल्यास एटीएम चालविणे कठीण जाईल, त्यात रक्कम कशी टाकावी हा प्रश्न निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
पाचशे व हजाराच्या नोटा बंदीमुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहार करणेही कठीण झाले आहे. तासन्तास बँका व एटीएमसमोर रांगा लावूनही पैसे मिळत नसल्याने नागरिक वैतागले आहे. त्यातूनच पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएमची तोडफोड झाली. या घटनेची पुनरावृत्ती जिल्ह्यातील अन्य एटीएम व बँकांमध्ये होण्याची भीती बँकींग क्षेत्रातील यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे.  मंगळवारी अनेक बँकांची लिंक फेल असल्याने नागरिकांना सकाळी ११ पासून सायंकाळी ५ पर्यंत रांगेत राहूनही हाती पैसे मिळाले नाही. त्यामुळे नागरिकांत प्रचंड रोष पहायला मिळत होता.