शहरं
Join us  
Trending Stories
1
मी डिप्रेशनमध्ये गेलेलो! सेक्स स्कँडलनंतर पहिल्यांदाच प्रज्वल रेवन्ना समोर आले; हजर होण्याची तारीख दिली...
2
इंडिया आघाडीत मानापमान नाट्य? बैठकीला जाण्यास ममता बॅनर्जींचा ठाम नकार; कारण काय दिले?
3
हृदयद्रावक! मुलीसाठी मुलगा पाहायला जात होतं कुटुंब; काळाने घातला घाला, 5 जणांचा मृत्यू
4
संतापजनक! भाजपा आमदाराने पेनने खोदला नवीन बांधलेला रस्ता; ठेकेदाराला धरलं धारेवर
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; हिंदाल्कोमध्ये तेजी, मारुतीचे शेअर्स घसरले
6
“त्यांची मनापासून इच्छा आहे की मी मरुन जावे”; अरविंद केजरीवाल यांचा रोख कुणाकडे?
7
शाहरुख खानपेक्षा चौपट श्रीमंत आहे सनरायझर्सची मालक, काय करते काम, Kavya Maranची नेटवर्थ किती?
8
मनसेची भाजपासोबत युती तुटली? अभिजित पानसेंनी स्पष्ट शब्दांत विचारले, आमदार म्हणून काय केले?
9
Sovereign Gold Bond Scheme: सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर, तरीही सॉवरेन गोल्ड बॉन्डची मागणी वाढली; कारण काय?
10
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
11
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
13
सावरकरांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त रणदीपने सेल्युलर जेलला दिली भेट, म्हणाला - "त्यांची कहाणी म्हणजे.."
14
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
15
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
16
राखी सावंतवर रुग्णालयात हल्ला? Ex Husband रितेश सिंहचा दावा; सध्या ती कुठेय?
17
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
18
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
19
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
20
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक

यशवंतराव चव्हाण दोनदा मेरिटमध्ये; नाथ पै पहिले तर अजित पवार शेवटचे मेरिट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 2:30 AM

नाथ पै हे मेरिटसह लोकसभेत जाणारे पहिले खासदार तर १९९१ च्या निवडणुकीत बारामतीमध्ये ७५.०४ टक्के मतांसह बाजी मारलेले अजित पवार (काँग्रेस) शेवटचे खासदार ठरले.

- प्रेमदास राठोडआजवरच्या १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात बाजी मारून एकूण ७४६ जण लोकसभेत पोहोचले. यापैकी फक्त १४ उमेदवार ७५ टक्क्क््यांहून जास्त मते घेऊन मेरिटमध्ये पास झाले. १४ मधील १० जणांना १९७१ च्या निवडणुकीत हे यश मिळाले. यशवंतराव चव्हाण हे दोनदा (सातारा १९७१ व १९७७) असे यश मिळवणारे एकमेव नेते ठरले. पीएसपीचे नाथ पै (राजापूर १९५७) वगळता मेरिटमध्ये आलेले बाकी सर्व १३ काँग्रेसचे होते. नाथ पै हे मेरिटसह लोकसभेत जाणारे पहिले खासदार तर १९९१ च्या निवडणुकीत बारामतीमध्ये ७५.०४ टक्के मतांसह बाजी मारलेले अजित पवार (काँग्रेस) शेवटचे खासदार ठरले. १९९१ नंतर महाराष्ट्रात कोणालाही एवढे मोठे यश मिळालेले नाही.साताऱ्याने तब्बल तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मेरिटसह उमेदवाराला पास केले. शेजारच्या कराडने दोनदा उमेदवाराला मेरिटसह लोकसभेत पाठविले. अमरावती, बारामती, भंडारा, खामगाव, खेड, मालेगाव, राजापूर, रामटेक, सांगली आणि वर्धा या १० दहा मतदारसंघांनी एकेकदा मेरिटसह उमेदवारांना लोकसभेत पाठविण्याचा विक्रम केला आहे.१९७१ मध्ये कराडमधून विजयी झालेले दाजीसाहेब चव्हाण यांना ८६.१६ टक्के मते मिळाली होती. त्यावेळी इतर सर्व ६ जणांची अनामत जप्त झाली होती. दाजीसाहेबांचा हा रेकॉर्ड आजही कायम आहे. त्यांच्या पत्नी प्रमिलाबाई यांना येथेच १९८४ मध्ये ८३.०९ टक्के मते मिळाली होती. दाजीसाहेब व प्रमिलाबाई यांचे सुपूत्र पृथ्वीराज चव्हाण यांनी १९९१ ते ९८ तीन सार्वत्रिक निवडणुका जिंकून येथे हॅट्ट्रिक केली. पण त्यांना ६२ टक्क्क््यांपेक्षा जास्त मते मिळू शकली नाहीत.७५ टक्क्क््यांहून जास्त मतांसह लोकसभेत गेलेले इतर नेतेअमृत गणपत सोनार (१९७१ रामटेक, प्राप्त मते ८३.०२ टक्के), प्रतापराव भोसले (१९८९ सातारा, ८१.९४ टक्के), अर्जुनराव कस्तुरे (१९७१ खामगाव, ८०.६५ टक्के), नाथ पै (१९५७ राजापूर, ८०.६५ टक्के), गणपती गोटखिंडे (१९७१ सांगली, ७८.१७ टक्के), कृष्णराव देशमुख (१९७१ अमरावती, ७७.६१ टक्के), विश्वंभरदास दुबे (१९७१ भंडारा, ७६.५८ टक्के), जे.जी. कदम (१९७१ वर्धा, ७५.७३ टक्के), अनंतराव पाटील (१९७१ खेड, ७५.५४ टक्के), झामरू कहांडोळे (१९७१ मालेगाव, ७५.१९ टक्के) आणि अजित पवार (१९९१ बारामती, ७५.०४ टक्के) गेल्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे गोपाळ शेट्टी राज्यातून सर्वाधिक ७०.१५ टक्के मतांसह बाजी मारली. त्यापूर्वी २००९ मध्ये सर्वाधिक ६६.४६ टक्के मते सुप्रिया सुळे यांना मिळाली. शरद पवार यांना २०१४ (७१.०३ टक्के) व १९९८ (६५.८१ टक्के) या दोन निवडणुकांत राज्यातून सर्वाधिक मते मिळाली होती. या तिघांनाही ७५ टक्क्क््यांचा टप्पा मात्र गाठता आला नाही. गोपाळ शेट्टी व सुप्रिया सुळे यंदाही निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक