शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
5
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
6
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
7
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
8
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
9
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
10
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
11
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
12
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
13
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
14
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
15
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
16
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
17
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
18
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
19
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
20
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?

महायुतीचा धागा निखळला

By admin | Updated: June 3, 2014 16:07 IST

एकला चलो रेची भूमिका सोडून सत्तास्थापनेसाठी सर्वांना एकत्र घेऊन चालणारे केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने महायुतीचा धागा निखळला आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ३ - महाराष्ट्राच्या राजकारणात एकला चलो रेची भूमिका सोडून समविचारी पक्षांना एकत्र आणून महायुतीची गाठ बांधणारा नेता म्हणून ओळखले जाणारे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने महायुतीतील धागा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. दिलेल्या शद्बाला जागणारे नेते म्हणून मुंडेची ख्याती होती व यामुळेच महायुतीत सामील झालेल्या पक्षांनी मुंडेवर नेहमीच विश्वास दाखवला. 

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेना व भाजपला एकत्र आणून महाराष्ट्रात युतीची सरकार आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती. २००६ मध्ये महाजन यांच्या निधनानंतर युतीच्या भवितव्याविषयी शंका उपस्थित केली जात होते. नितीन गडकरींचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी सख्य असले तरी उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे फारसे जमत नव्हते. त्यावेळी ही युती अभेद्य ठेवण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी समन्वयकाची भूमिका साधली. शिवसेना - भाजपमध्ये तणाव निर्माण झाला की गोपीनाथ मुंडे हे यशस्वीरित्या मध्यस्थी करायचे व युती पुन्हा एकोप्याने नांदायची. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे आव्हान परतवून लावायचे असेल तर केवळ शिवसेना- भाजपला एकत्र येऊन चालणार नाही. यासाठी अन्य पक्षांची साथ मिळणे आवश्यक आहे हे मुंडेंनी ओळखले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी,  महादेव जानकर या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नेत्यांना मुंडेंनी महायुतीत आणले. महायुतीत आणल्यावर ते निवडून यावेत यासाठी मुंडेंनी अथक मेहनत घेतली. 

शिवसेनेने आरपीआय नेते रामदास आठवले यांना महायुतीत सामील करण्यात मोलाची भूमिका बजावली. मात्र आठवलेंच्या राजकीय पूनर्वसनाचा प्रश्न निर्माण होताच शिवसेनेने आठवलेंना राज्यसभेची खासदारकी देण्यात असमर्थता दर्शवली. त्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला. गोपीनाथ मुंडे पुन्हा एकदा युतीचे तारणहार म्हणून समोर आले. मुंडेंनी आठवलेंना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेची खासदारकी मिळवून दिली. विशेष म्हणजे यासाठी मुंडेंनी त्यांचे समर्थक प्रकाश जावडेकर यांना डावलून आठवलेंना राज्यसभेत पाठवले. मुंडेच्या या कृतीमुळे भाजप दिलेला शब्द पाळते असा संदेश महायुतीतील अन्य पक्षांपर्यंत गेला होता. आता मुंडेच्या निधनाने महायुतीचा धागाच निखळला अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.