शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

चुकीचा इतिहास अस्वस्थ करणारा

By admin | Updated: June 22, 2017 05:16 IST

आजवर शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने शिकवला गेला. ज्ञान देण्याची मक्तेदारी विशिष्ट वर्गाकडे असल्याने त्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आजवर शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने शिकवला गेला. ज्ञान देण्याची मक्तेदारी विशिष्ट वर्गाकडे असल्याने त्यांना अभिप्रेत असलेला इतिहास समाजापर्यंत पोहचविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी होते, अशी प्रतिमा तयार करण्यात आली. आजही विशिष्ट भूमिका समाजासमोर मांडण्याचे आणि तरुणाईच्या मनावर बिंबवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना मिळणारे यश अस्वस्थ करते, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली. महात्मा जोतीराव फुले इतिहास अकादमीतर्फे श्रीमंत कोकाटे यांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या सचित्र ग्रंथाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटीन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, ज्येष्ठ इतिहासतज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, लेखक श्रीमंत कोकाटे, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, शिवरायांनी अफझल खानाच्या रूपात मुसलमानाचा नव्हे, तर शत्रूचा कोथळा बाहेर काढला. अत्याचार, अन्याय, आक्रमणाच्या विरोधात त्यांचा लढा होता. त्यामध्ये त्यांनी जातीधर्माचा विचार केला नाही. मात्र, त्यांचा संघर्ष जाणीवपूर्वक मुस्लिमांपुरता मर्यादित ठेवला गेला. महापुरुषांनी संघर्षाला धार्मिक स्वरूप येऊ दिले नाही. तरीही शाळेत छत्रपतींचा इतिहास वेगळ्या पद्धतीने शिकवला जातो. समाजासमोर इतिहासाची वास्तव मांडणी झाली पाहिजे. जातीवाचक विचार न करता राज्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.आपण इतिहास लिहीत नाही, तोपर्यंत इतरांनी लिहिलेला इतिहास वाचावा लागतो. इतिहासाचे लेखन करताना काही मंडळी अडखळली तर त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहायला हवे, असे सांगून जयसिंगराव पवार म्हणाले, ‘आपल्या मनाला जे पटते ते मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो. इतिहासाची मांडणी, पुनर्मांडणी करताना सत्य संशोधनाला महत्त्व द्यायला हवे. पुरावे असतील तर सत्य कोणालाही खोडून काढता येत नाही. ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ हा शब्दप्रयोग अनैतिहासिक असल्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक त्र्यंबक शेजवलकर यांनी सिद्ध केले. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना ‘कुळवाडी भूषण’ ही उपाधी दिली. शिवछत्रपतींचे राज्य कधीच भोसलेंचे नव्हते, तर ते रयतेचे होते. सज्जनांचे संरक्षण आणि दुष्टांचा नाश हे सूत्र त्यांनी पाळले. अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केले, असे सांगत पवार यांनी शिवरायांच्या कर्तृत्वाचा आलेख मांडला.