शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

चुकीचा इतिहास अस्वस्थ करणारा

By admin | Updated: June 22, 2017 05:16 IST

आजवर शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने शिकवला गेला. ज्ञान देण्याची मक्तेदारी विशिष्ट वर्गाकडे असल्याने त्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आजवर शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने शिकवला गेला. ज्ञान देण्याची मक्तेदारी विशिष्ट वर्गाकडे असल्याने त्यांना अभिप्रेत असलेला इतिहास समाजापर्यंत पोहचविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी होते, अशी प्रतिमा तयार करण्यात आली. आजही विशिष्ट भूमिका समाजासमोर मांडण्याचे आणि तरुणाईच्या मनावर बिंबवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना मिळणारे यश अस्वस्थ करते, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली. महात्मा जोतीराव फुले इतिहास अकादमीतर्फे श्रीमंत कोकाटे यांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या सचित्र ग्रंथाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटीन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, ज्येष्ठ इतिहासतज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, लेखक श्रीमंत कोकाटे, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, शिवरायांनी अफझल खानाच्या रूपात मुसलमानाचा नव्हे, तर शत्रूचा कोथळा बाहेर काढला. अत्याचार, अन्याय, आक्रमणाच्या विरोधात त्यांचा लढा होता. त्यामध्ये त्यांनी जातीधर्माचा विचार केला नाही. मात्र, त्यांचा संघर्ष जाणीवपूर्वक मुस्लिमांपुरता मर्यादित ठेवला गेला. महापुरुषांनी संघर्षाला धार्मिक स्वरूप येऊ दिले नाही. तरीही शाळेत छत्रपतींचा इतिहास वेगळ्या पद्धतीने शिकवला जातो. समाजासमोर इतिहासाची वास्तव मांडणी झाली पाहिजे. जातीवाचक विचार न करता राज्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.आपण इतिहास लिहीत नाही, तोपर्यंत इतरांनी लिहिलेला इतिहास वाचावा लागतो. इतिहासाचे लेखन करताना काही मंडळी अडखळली तर त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहायला हवे, असे सांगून जयसिंगराव पवार म्हणाले, ‘आपल्या मनाला जे पटते ते मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो. इतिहासाची मांडणी, पुनर्मांडणी करताना सत्य संशोधनाला महत्त्व द्यायला हवे. पुरावे असतील तर सत्य कोणालाही खोडून काढता येत नाही. ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ हा शब्दप्रयोग अनैतिहासिक असल्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक त्र्यंबक शेजवलकर यांनी सिद्ध केले. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना ‘कुळवाडी भूषण’ ही उपाधी दिली. शिवछत्रपतींचे राज्य कधीच भोसलेंचे नव्हते, तर ते रयतेचे होते. सज्जनांचे संरक्षण आणि दुष्टांचा नाश हे सूत्र त्यांनी पाळले. अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केले, असे सांगत पवार यांनी शिवरायांच्या कर्तृत्वाचा आलेख मांडला.