शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चुकीच्या उत्तराचा उमेदवारांना फटका; MPSC कडून प्रश्नाच्या उत्तरात बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 06:46 IST

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आयोगाच्या जुन्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचा आणि त्याच्या उत्तरतालिकांचा अभ्यास केला जात असतो.

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात आली. आता ‘एमपीएससी’च्या वेळापत्रकानुसार मुख्य परीक्षा ९ ते ३१ जुलैदरम्यान होणार आहे. मात्र आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या उत्तरतालिकेतील प्रश्नाच्या चुकीच्या उत्तरामुळे राज्याच्या विविध भागातून मुख्य परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी त्यामुळे अपात्र ठरले असून, परीक्षेला मुकणार आहेत. या विद्यार्थ्यांना आता परीक्षा तर देता येणार नाहीच, मात्र किमान आयोगाने यापुढे तरी आपल्या तज्ज्ञ समितीकडून परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कायम ठेवली जावीत आणि कोणत्या आधारावर ती योग्य आहेत, याचा खुलासा करण्याची मागणी संतप्त उमेदवारांमधून होत आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आयोगाच्या जुन्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचा आणि त्याच्या उत्तरतालिकांचा अभ्यास केला जात असतो. अशावेळी २०१३ च्या परीक्षेतील एका प्रश्नाचे उत्तर आणि २०२२ च्या परीक्षेतील त्याच प्रश्नाचे उत्तर दुसरे कसे काय शकते, असा प्रश्न महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा दिलेल्या आणि मुख्य परीक्षा अपात्र ठरलेल्या उमेदवारांनी उपस्थित केला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या उत्तरतालिकेतील प्रश्नाचे, उमेदवारांच्या उत्तराशी विसंगत आल्याने हजारो विद्यार्थी ९ जुलैपासून सुरू होणाऱ्या मुख्य परीक्षेला मुकणार आहेत. या विरोधात जवळपास ५२ ते ५३ उमेदवारांनी औरंगाबाद मॅटमध्ये याचिका दाखल केली, मात्र त्याचा निकाल आयोगाच्या बाजूने लागला तर मुंबईत ३९ उमेदवारांनी याचिका दाखल करूनही त्यांना अद्याप हायकोर्टाच्या सुनावणीची तारीख मिळालेली नाही. यामुळे विद्यार्थी हताश झाले असून, आयोगाच्या चुकीमुळे हजारो विद्यार्थी संधी गमावून बसणार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.  

आयोगाच्याच उत्तरतालिकांमध्ये तफावत आढळणार असेल आणि तरी ते योग्यच असेल तर मग जे तज्ज्ञ प्रश्न काढतात ते खरंच तज्ज्ञ आहेत का, असा प्रश्न उमेदवारांना पडणे साहजिकच आहे. शिवाय उमेदवारांच्या हरकतींवर योग्य न्याय द्यायचा नसेल तर उत्ररतालिका १ किंवा उत्तरतालिका २ हे प्रकार रद्द करून यूपीएससीच्या धर्तीवर निकाल जाहीर करावा. आयोगाने सध्या आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. - महेश बडे, एमपीएससी स्टुडण्ट्स राईट्स

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा