शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

चुकीच्या उत्तराचा उमेदवारांना फटका; MPSC कडून प्रश्नाच्या उत्तरात बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 06:46 IST

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आयोगाच्या जुन्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचा आणि त्याच्या उत्तरतालिकांचा अभ्यास केला जात असतो.

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात आली. आता ‘एमपीएससी’च्या वेळापत्रकानुसार मुख्य परीक्षा ९ ते ३१ जुलैदरम्यान होणार आहे. मात्र आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या उत्तरतालिकेतील प्रश्नाच्या चुकीच्या उत्तरामुळे राज्याच्या विविध भागातून मुख्य परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी त्यामुळे अपात्र ठरले असून, परीक्षेला मुकणार आहेत. या विद्यार्थ्यांना आता परीक्षा तर देता येणार नाहीच, मात्र किमान आयोगाने यापुढे तरी आपल्या तज्ज्ञ समितीकडून परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कायम ठेवली जावीत आणि कोणत्या आधारावर ती योग्य आहेत, याचा खुलासा करण्याची मागणी संतप्त उमेदवारांमधून होत आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आयोगाच्या जुन्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचा आणि त्याच्या उत्तरतालिकांचा अभ्यास केला जात असतो. अशावेळी २०१३ च्या परीक्षेतील एका प्रश्नाचे उत्तर आणि २०२२ च्या परीक्षेतील त्याच प्रश्नाचे उत्तर दुसरे कसे काय शकते, असा प्रश्न महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा दिलेल्या आणि मुख्य परीक्षा अपात्र ठरलेल्या उमेदवारांनी उपस्थित केला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या उत्तरतालिकेतील प्रश्नाचे, उमेदवारांच्या उत्तराशी विसंगत आल्याने हजारो विद्यार्थी ९ जुलैपासून सुरू होणाऱ्या मुख्य परीक्षेला मुकणार आहेत. या विरोधात जवळपास ५२ ते ५३ उमेदवारांनी औरंगाबाद मॅटमध्ये याचिका दाखल केली, मात्र त्याचा निकाल आयोगाच्या बाजूने लागला तर मुंबईत ३९ उमेदवारांनी याचिका दाखल करूनही त्यांना अद्याप हायकोर्टाच्या सुनावणीची तारीख मिळालेली नाही. यामुळे विद्यार्थी हताश झाले असून, आयोगाच्या चुकीमुळे हजारो विद्यार्थी संधी गमावून बसणार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.  

आयोगाच्याच उत्तरतालिकांमध्ये तफावत आढळणार असेल आणि तरी ते योग्यच असेल तर मग जे तज्ज्ञ प्रश्न काढतात ते खरंच तज्ज्ञ आहेत का, असा प्रश्न उमेदवारांना पडणे साहजिकच आहे. शिवाय उमेदवारांच्या हरकतींवर योग्य न्याय द्यायचा नसेल तर उत्ररतालिका १ किंवा उत्तरतालिका २ हे प्रकार रद्द करून यूपीएससीच्या धर्तीवर निकाल जाहीर करावा. आयोगाने सध्या आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. - महेश बडे, एमपीएससी स्टुडण्ट्स राईट्स

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा