शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

चुकीच्या उत्तराचा उमेदवारांना फटका; MPSC कडून प्रश्नाच्या उत्तरात बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 06:46 IST

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आयोगाच्या जुन्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचा आणि त्याच्या उत्तरतालिकांचा अभ्यास केला जात असतो.

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात आली. आता ‘एमपीएससी’च्या वेळापत्रकानुसार मुख्य परीक्षा ९ ते ३१ जुलैदरम्यान होणार आहे. मात्र आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या उत्तरतालिकेतील प्रश्नाच्या चुकीच्या उत्तरामुळे राज्याच्या विविध भागातून मुख्य परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी त्यामुळे अपात्र ठरले असून, परीक्षेला मुकणार आहेत. या विद्यार्थ्यांना आता परीक्षा तर देता येणार नाहीच, मात्र किमान आयोगाने यापुढे तरी आपल्या तज्ज्ञ समितीकडून परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कायम ठेवली जावीत आणि कोणत्या आधारावर ती योग्य आहेत, याचा खुलासा करण्याची मागणी संतप्त उमेदवारांमधून होत आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आयोगाच्या जुन्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचा आणि त्याच्या उत्तरतालिकांचा अभ्यास केला जात असतो. अशावेळी २०१३ च्या परीक्षेतील एका प्रश्नाचे उत्तर आणि २०२२ च्या परीक्षेतील त्याच प्रश्नाचे उत्तर दुसरे कसे काय शकते, असा प्रश्न महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा दिलेल्या आणि मुख्य परीक्षा अपात्र ठरलेल्या उमेदवारांनी उपस्थित केला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या उत्तरतालिकेतील प्रश्नाचे, उमेदवारांच्या उत्तराशी विसंगत आल्याने हजारो विद्यार्थी ९ जुलैपासून सुरू होणाऱ्या मुख्य परीक्षेला मुकणार आहेत. या विरोधात जवळपास ५२ ते ५३ उमेदवारांनी औरंगाबाद मॅटमध्ये याचिका दाखल केली, मात्र त्याचा निकाल आयोगाच्या बाजूने लागला तर मुंबईत ३९ उमेदवारांनी याचिका दाखल करूनही त्यांना अद्याप हायकोर्टाच्या सुनावणीची तारीख मिळालेली नाही. यामुळे विद्यार्थी हताश झाले असून, आयोगाच्या चुकीमुळे हजारो विद्यार्थी संधी गमावून बसणार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.  

आयोगाच्याच उत्तरतालिकांमध्ये तफावत आढळणार असेल आणि तरी ते योग्यच असेल तर मग जे तज्ज्ञ प्रश्न काढतात ते खरंच तज्ज्ञ आहेत का, असा प्रश्न उमेदवारांना पडणे साहजिकच आहे. शिवाय उमेदवारांच्या हरकतींवर योग्य न्याय द्यायचा नसेल तर उत्ररतालिका १ किंवा उत्तरतालिका २ हे प्रकार रद्द करून यूपीएससीच्या धर्तीवर निकाल जाहीर करावा. आयोगाने सध्या आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. - महेश बडे, एमपीएससी स्टुडण्ट्स राईट्स

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा