शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डतर्फे जागतिक स्वच्छता दिन

By admin | Updated: September 18, 2016 01:56 IST

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डतर्फे शनिवारपासून सुरू करण्यात आलेले ‘निर्मल सागर तट’ अभियान २ आॅक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार

मुरुड : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डतर्फे शनिवारपासून सुरू करण्यात आलेले ‘निर्मल सागर तट’ अभियान २ आॅक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व सागरी किनारे स्वच्छ व सुंदर करण्यासाठी जागतिक सागर तट स्वच्छता दिनाचे औचित्याने मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. काशीद समुद्र किनारी दरवर्षी पाच लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देत असून हा किनारा स्वच्छ व सुशोभित करण्याकडे अधिकाधिक लक्ष दिले जाणार आहे. मोहीमेसाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने ज्येष्ठ निरु पणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेऊन नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सहकार्य मिळवत असंख्य श्री सदस्यांचा सहभाग मिळवला. स्वछता मोहिमेत काशीद ग्रामस्थ, प्राथमिक शाळा रायगड जिल्हा परिषद काशीद, माध्यमिक विद्यालय काशीद येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्वच्छता अभियानातून ५० टन कचरा गोळा करण्यात आला. (वार्ताहर)मोहीम अभियानापुरती मर्यादित राहू नये - तेलीअलिबाग : निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची असून ही मोहीम केवळ अभियानपुरती मर्यादित न ठेवता नियमित असावी. यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेची सवय बाळगून परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करावे, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी शनिवारी येथे केले. आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनानिमित्त निर्मल सागर तट स्वच्छता मोहिमेअंतर्गत, कोस्टगार्ड महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, रायगड जिल्हा प्रशासन, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.जे. नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, अलिबाग प्रांताधिकारी सर्जेराव सोनावणे, मेरीटाईम बोर्डाचे कॅप्टन सुरज नाईक, कोस्टगार्ड कंमाडर रणजितकुमार सिंग, तहसिलदार प्रकाश संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.