शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डतर्फे जागतिक स्वच्छता दिन

By admin | Updated: September 18, 2016 01:56 IST

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डतर्फे शनिवारपासून सुरू करण्यात आलेले ‘निर्मल सागर तट’ अभियान २ आॅक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार

मुरुड : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डतर्फे शनिवारपासून सुरू करण्यात आलेले ‘निर्मल सागर तट’ अभियान २ आॅक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व सागरी किनारे स्वच्छ व सुंदर करण्यासाठी जागतिक सागर तट स्वच्छता दिनाचे औचित्याने मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. काशीद समुद्र किनारी दरवर्षी पाच लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देत असून हा किनारा स्वच्छ व सुशोभित करण्याकडे अधिकाधिक लक्ष दिले जाणार आहे. मोहीमेसाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने ज्येष्ठ निरु पणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेऊन नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सहकार्य मिळवत असंख्य श्री सदस्यांचा सहभाग मिळवला. स्वछता मोहिमेत काशीद ग्रामस्थ, प्राथमिक शाळा रायगड जिल्हा परिषद काशीद, माध्यमिक विद्यालय काशीद येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्वच्छता अभियानातून ५० टन कचरा गोळा करण्यात आला. (वार्ताहर)मोहीम अभियानापुरती मर्यादित राहू नये - तेलीअलिबाग : निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची असून ही मोहीम केवळ अभियानपुरती मर्यादित न ठेवता नियमित असावी. यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेची सवय बाळगून परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करावे, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी शनिवारी येथे केले. आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनानिमित्त निर्मल सागर तट स्वच्छता मोहिमेअंतर्गत, कोस्टगार्ड महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, रायगड जिल्हा प्रशासन, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.जे. नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, अलिबाग प्रांताधिकारी सर्जेराव सोनावणे, मेरीटाईम बोर्डाचे कॅप्टन सुरज नाईक, कोस्टगार्ड कंमाडर रणजितकुमार सिंग, तहसिलदार प्रकाश संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.