शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

विश्व पंजाबी साहित्य संमेलन पुण्यात!

By admin | Updated: June 9, 2016 01:04 IST

पंजाबी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी पुण्यात विश्व पंजाबी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

पुणे : पंजाबी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी पुण्यात विश्व पंजाबी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. गुरू गोविंदसिंग यांच्या ३५०व्या जयंतीचे औैचित्य साधून सरहद संस्थेच्या वतीने १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान हे तीन दिवसीय संमेलन पार पडेल, अशी माहिती सरहदचे संजय नहार यांनी पत्रकार परिषदेत दिली. संमेलनाध्यक्षपदासाठी पंजाबातील ज्येष्ठ साहित्यिक सुरजितसिंग पाथर यांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. घुमान येथे झालेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रात पंजाबी भाषेचे संमेलन घेण्याची सूचना केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी त्याला अनुमोदन दिले होते. याच घोषणेचा भाग म्हणून पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या पाठिंब्याने गुरू गोविंदसिंग यांच्या ३५०व्या जयंतीनिमित्त हे संमेलन पुण्यात आयोजित करण्याचा निर्णय सरहद संस्थेच्या वतीने घेण्यात आला. गुरू अर्जुनदेव यांच्या शहीद दिनानिमित्त संमेलनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. या वेळी भारत देसडला, संयोजन समितीचे संतसिंग मोखा, आर. पी. एस. सेहगल आदी उपस्थित होते. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल तसेच पंजाबी साहित्य अकादमीच्या सहकार्याने कार्यक्रमांची आखणी करण्यात येणार आहे. संमेलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, प्रकाशसिंग बादल, नितीशकुमार, तसेच जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.नहार म्हणाले, ‘‘या संमेलनात पंजाबी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, नाटककार, कवी, लेखक तसेच रसिक सहभागी होणार आहेत. विश्व पंजाबी साहित्य संमेलनामध्ये मराठी साहित्यिकांचाही लक्षणीय सहभाग असेल.‘‘ओडिशा, बिहार, कर्नाटक, नांदेड, दिल्ली तसेच परदेशातूनही ५००-१००० साहित्यप्रेमी संमेलनाला हजेरी लावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.’’(प्रतिनिधी)>पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्र येथे १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता या संमेलनाचे उद्घाटन होईल. पुढील तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, प्रकट मुलाखत, अध्यक्षीय भाषण, अनुवादित पुस्तकांचे प्रदर्शन असे कार्यक्रम पार पडतील. दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत संमेलनाचा समारोप होणार आहे.