शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

'वर्ल्ड आॅरेन्ज फेस्टिव्हल'मध्ये संत्र्याला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देण्याची क्षमता- मदन येरावार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 19:40 IST

अमरावती : संत्र्याला बाजारपेठ, प्रतिष्ठा आणि जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याची क्षमता असलेला वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल संत्रा उत्पादकांसाठी उघडलेले यशाचे दालनच होय. 'लोकमत'च्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे ही कल्पना प्रत्यक्षात साकारू शकली, असे प्रतिपादन पर्यटन व ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी येथे केले.

अमरावती : संत्र्याला बाजारपेठ, प्रतिष्ठा आणि जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याची क्षमता असलेला वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल संत्रा उत्पादकांसाठी उघडलेले यशाचे दालनच होय. 'लोकमत'च्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे ही कल्पना प्रत्यक्षात साकारू शकली, असे प्रतिपादन पर्यटन व ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी येथे केले.१६, १७ आणि १८ डिसेंबर रोजी नागपूर येथे होऊ घातलेल्या या महोत्सवातील अमरावती विभागाच्या सहभागाच्या अनुषंगाने येथील विभागीय आयुक्तालयात मंगळवारी दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ना. येरावार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विभागीय आयुक्त पीयूष सिंह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक जी. एच. मानकर, महाआॅरेंजचे संचालक श्रीधर ठाकरे, विभागीय कृषी अधीक्षक डी.एच. चवाने, आॅरेंज ग्रोव्हर असोसिएशनचे कार्यकारी संचालक पवनकुमार पवित्रकार, लोकमत वृत्तपत्र समूहाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध हजारे उपस्थित होते. लोकमतचे इनिशिएटिव्ह असलेल्या या महोत्सवाचे प्रमुख आयोजक यूपीएल समूह आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहकार्य लाभले आहे.हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असताना मी या बैठकीसाठी अमरावतीत उपस्थित झालो, यावरून संत्र्यासंबंधाने शासन किती गंभीर आहे, याची प्रचिती उपस्थितांना यावी, अशी जाणीव ना. येरावार यांनी बैठकीदरम्यान करून दिली. आंब्यात आम्ही बरेच पुढे गेलो. संत्र्याबाबत तशी उंची गाठावयाची आहे. त्यासाठीचेच हे भरीव प्रयत्न आहेत. संत्र्याचे ग्रेडिंंग, ब्रँन्डिग, मार्केटिंग आणि प्रोसेसिंग अशा व्हॅल्यू अ‍ॅडिशन करणाºया घटकांद्वारे संत्राउत्पादकांचा विकास साधणे हा उद्देश या महोत्सवाच्या आयोजनामागचा आहे. जगाच्या कानाकोपºयात या माध्यमातून नागपुरी संत्री पोहोचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.विभागीय आयुक्त पीयूष सिंह म्हणाले, वायव्य प्रांतातील किन्नो देशभर पोहोचतो. नागपुरी संत्री त्याहून चविष्ट. ती मागे पडू नयेत, यासाठी सुरू करण्यात आलेला हा 'वर्ल्ड आॅरेन्ज फेस्टिव्हल' उत्पादकांसाठी पर्वणीच ठरेल. एरवी केवळ मेट्रो सिटीजमध्ये बघता येणारा असा महोत्सव दरवर्षी नागपुरातच झाला, तर त्याचा दूरगामी लाभ अमरावती विभागातील संत्रा उत्पादकांना होईल. खरे तर संत्र्याच्या विविध प्रजाती आणि संत्र्यावरील सर्वाधिक कार्य अमरावती जिल्ह्यात आहे. त्यामुळे ही 'नागपुरी' नव्हे 'अमरावतीची संत्री' म्हणायला हवी, असा उल्लेख सिंह यांनी केला नि उपस्थितांमधून प्रतिसाद मिळाला.महाआॅरेंजचे संचालक श्रीधर ठाकरे म्हणाले, सर्व फळांच्या विविध जाती आहेत. संत्र्याचीच फक्त 'नागपुरी संत्री' ही एकमेव जात आहे. जादुई चवीच्या या फळातील बियांचे प्रमाण कमी करणे आणि साल अधिक टिकावू करणे, यावर संशोधन होणे अपेक्षित आहे. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. मानकर, संत्रातज्ज्ञ रमेश जिचकार, कृषी समृद्धीचे रविकिरण पाटील, संत्रा उत्पादक संस्था, संत्रा उत्पादक शेतकरी, कृषी महाविद्यालये, उद्यानविद्या महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्र, संस्था यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला 'वर्ल्ड आॅरेन्ज फेस्टिव्हल'बाबत स्लाइड शोच्या माध्यमातून लोकमत वृत्तपत्र समूहाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध हजारे यांनी भूमिका विषद केली.उत्पादकांच्या जीवनात आमूलाग्र बदल हाच उद्देश !संत्र्यावर प्रक्रिया उद्योग ही शासनाची प्राथमिकता आहे. पतंजली समूहाला नागपूरच्या मिहान प्रकल्पात १०० हेक्टर जागा दिली. या ठिकाणी सन २०१८ पर्यंत पाच हजार कोटींपर्यंतचा उद्योग उभा राहणार आहे. संत्र्याचा प्रत्येक घटक कामाचा असल्याने व्हॅल्यू अ‍ॅडिशन झालीच पाहिजे. संत्रा उत्पादकांच्या जीवनात आमूलाग्र बदल दिसावा, हाच या महोत्सवाच्या आयोजनामागचा उद्देश असल्याचे ना. येरावार म्हणाले.

टॅग्स :Amravatiअमरावती