शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

'वर्ल्ड आॅरेन्ज फेस्टिव्हल'मध्ये संत्र्याला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देण्याची क्षमता- मदन येरावार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 19:40 IST

अमरावती : संत्र्याला बाजारपेठ, प्रतिष्ठा आणि जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याची क्षमता असलेला वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल संत्रा उत्पादकांसाठी उघडलेले यशाचे दालनच होय. 'लोकमत'च्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे ही कल्पना प्रत्यक्षात साकारू शकली, असे प्रतिपादन पर्यटन व ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी येथे केले.

अमरावती : संत्र्याला बाजारपेठ, प्रतिष्ठा आणि जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याची क्षमता असलेला वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल संत्रा उत्पादकांसाठी उघडलेले यशाचे दालनच होय. 'लोकमत'च्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे ही कल्पना प्रत्यक्षात साकारू शकली, असे प्रतिपादन पर्यटन व ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी येथे केले.१६, १७ आणि १८ डिसेंबर रोजी नागपूर येथे होऊ घातलेल्या या महोत्सवातील अमरावती विभागाच्या सहभागाच्या अनुषंगाने येथील विभागीय आयुक्तालयात मंगळवारी दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ना. येरावार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विभागीय आयुक्त पीयूष सिंह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक जी. एच. मानकर, महाआॅरेंजचे संचालक श्रीधर ठाकरे, विभागीय कृषी अधीक्षक डी.एच. चवाने, आॅरेंज ग्रोव्हर असोसिएशनचे कार्यकारी संचालक पवनकुमार पवित्रकार, लोकमत वृत्तपत्र समूहाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध हजारे उपस्थित होते. लोकमतचे इनिशिएटिव्ह असलेल्या या महोत्सवाचे प्रमुख आयोजक यूपीएल समूह आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहकार्य लाभले आहे.हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असताना मी या बैठकीसाठी अमरावतीत उपस्थित झालो, यावरून संत्र्यासंबंधाने शासन किती गंभीर आहे, याची प्रचिती उपस्थितांना यावी, अशी जाणीव ना. येरावार यांनी बैठकीदरम्यान करून दिली. आंब्यात आम्ही बरेच पुढे गेलो. संत्र्याबाबत तशी उंची गाठावयाची आहे. त्यासाठीचेच हे भरीव प्रयत्न आहेत. संत्र्याचे ग्रेडिंंग, ब्रँन्डिग, मार्केटिंग आणि प्रोसेसिंग अशा व्हॅल्यू अ‍ॅडिशन करणाºया घटकांद्वारे संत्राउत्पादकांचा विकास साधणे हा उद्देश या महोत्सवाच्या आयोजनामागचा आहे. जगाच्या कानाकोपºयात या माध्यमातून नागपुरी संत्री पोहोचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.विभागीय आयुक्त पीयूष सिंह म्हणाले, वायव्य प्रांतातील किन्नो देशभर पोहोचतो. नागपुरी संत्री त्याहून चविष्ट. ती मागे पडू नयेत, यासाठी सुरू करण्यात आलेला हा 'वर्ल्ड आॅरेन्ज फेस्टिव्हल' उत्पादकांसाठी पर्वणीच ठरेल. एरवी केवळ मेट्रो सिटीजमध्ये बघता येणारा असा महोत्सव दरवर्षी नागपुरातच झाला, तर त्याचा दूरगामी लाभ अमरावती विभागातील संत्रा उत्पादकांना होईल. खरे तर संत्र्याच्या विविध प्रजाती आणि संत्र्यावरील सर्वाधिक कार्य अमरावती जिल्ह्यात आहे. त्यामुळे ही 'नागपुरी' नव्हे 'अमरावतीची संत्री' म्हणायला हवी, असा उल्लेख सिंह यांनी केला नि उपस्थितांमधून प्रतिसाद मिळाला.महाआॅरेंजचे संचालक श्रीधर ठाकरे म्हणाले, सर्व फळांच्या विविध जाती आहेत. संत्र्याचीच फक्त 'नागपुरी संत्री' ही एकमेव जात आहे. जादुई चवीच्या या फळातील बियांचे प्रमाण कमी करणे आणि साल अधिक टिकावू करणे, यावर संशोधन होणे अपेक्षित आहे. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. मानकर, संत्रातज्ज्ञ रमेश जिचकार, कृषी समृद्धीचे रविकिरण पाटील, संत्रा उत्पादक संस्था, संत्रा उत्पादक शेतकरी, कृषी महाविद्यालये, उद्यानविद्या महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्र, संस्था यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला 'वर्ल्ड आॅरेन्ज फेस्टिव्हल'बाबत स्लाइड शोच्या माध्यमातून लोकमत वृत्तपत्र समूहाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध हजारे यांनी भूमिका विषद केली.उत्पादकांच्या जीवनात आमूलाग्र बदल हाच उद्देश !संत्र्यावर प्रक्रिया उद्योग ही शासनाची प्राथमिकता आहे. पतंजली समूहाला नागपूरच्या मिहान प्रकल्पात १०० हेक्टर जागा दिली. या ठिकाणी सन २०१८ पर्यंत पाच हजार कोटींपर्यंतचा उद्योग उभा राहणार आहे. संत्र्याचा प्रत्येक घटक कामाचा असल्याने व्हॅल्यू अ‍ॅडिशन झालीच पाहिजे. संत्रा उत्पादकांच्या जीवनात आमूलाग्र बदल दिसावा, हाच या महोत्सवाच्या आयोजनामागचा उद्देश असल्याचे ना. येरावार म्हणाले.

टॅग्स :Amravatiअमरावती