शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वत:ची कंपनी समजून काम करा; यश तुमचेच’

By admin | Updated: January 24, 2017 03:45 IST

दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ज्याठिकाणी तुम्ही काम करता ते काम स्वत:चे समजून केले तर

औरंगाबाद : दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ज्याठिकाणी तुम्ही काम करता ते काम स्वत:चे समजून केले तर तुमच्या प्रगतीत कोणीही अडथळा आणू शकणार नाही. यश तुमचेच असल्याचा गुरुमंत्र प्रसिद्ध उद्योगपती व भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) संचालक हनुमंत गायकवाड यांनी दिला.औरंगाबादमधील देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात आयोजित ‘क्वसार्स-२०१७’ या विद्यार्थी स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनासाठी उद्योगपती हनुमंत गायकवाड आले होते. यावेळी त्यांनी उद्योजकतेचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. कोर्टात क्लर्क असलेल्या कुटुंबात जन्म झाला. गरिबीत कुटुंब गुजराण करीत होते. पुढे वडिलांची पुण्यातील फुगेवाडी येथे बदली झाल्यामुळे गाव सोडावे लागले. तेव्हा ९ बाय १८ च्या खोलीत आमचे सर्व कुटुंब राहत होते. याच वेळी वडील सतत आजारी पडत असल्याने आई त्यांना ससून रुग्णालयात दाखल करीत असे. एक वेळ पैसे नसल्यामुळे आईने मंगळसूत्र, कानातील दागिने ७०० रुपयांत गहाण ठेवले होते. या गरिबीतून धडा घेत मोठे बनण्याचे स्वप्न पाहिले; यासाठी मेहनत घेत गेलो; यश मिळत गेले. आज ‘बीव्हीजी’मध्ये तब्बल ६५ हजार कर्मचारी काम करतात. सर्वांच्या सहकार्याने गरिबीची जाण ठेवून सेवा देत असल्याचे हनुमंत गायकवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)१९ व्या वर्षी ‘बीव्हीजी’ची स्थापनाभविष्याचा विचार करीत वयाच्या १९ व्या वर्षी भारत विकास ग्रुपची स्थापना केली. टाटा मोटार्समध्ये हाऊस किंपिगच्या कामांचा अनुभव होता. २००१ साली टाटा मोटार्स सोडताना हातात काहीच नव्हते. त्याचवेळी बंगलोर येथे काम मिळाले. तेथून चेन्नई, हैदराबाद, दिल्लीत कामे मिळाली. पुढे संसदेत काम करण्याची संधी चालून आली. प्रत्येक ठिकाणी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न मिळाल्यामुळे आज संसद, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान निवास, उपराष्ट्रपती कार्यालय, सर्वोच्च न्यायालयातील हाऊसकिपिंगचे काम बीव्हीजी करत आहे. देशातील प्रथम क्रमांकाची हाऊस किपिंग कंपनी बनण्यास विश्वासू साथीदाराचा सर्वात मोठा वाटा असल्याचेही हनुमंत गायकवाड यांनी सांगितले.विवेकानंदांना आदर्श मानले : विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, नेपोलियन बोनापार्ट यांची चरित्रे वाचण्यात आली. यातून आदर्श घेतल्याचे ते म्हणाले.१०८ क्रमांक जाळे :महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस म्हणजेच १०८ क्रमांकाची सेवा बीव्हीजी देत आहे. राज्यात साडेनऊशे अ‍ॅम्ब्युलन्स चालविण्यात येतात. दररोज शेकडो लोकांना आरोग्याची सेवा देण्यात येते हेच जनकल्याणचे काम असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या २२ राज्यांतील ७०० शहरांमध्ये कंपनीची कामे सुरूअसून, ६५ हजार कर्मचारी काम करीत आहेत. हे सर्व यश १५ वर्षांत मिळवले असल्याचे हनुमंत गायकवाड यांनी स्पष्ट केले. याशिवाय कृषी, दुग्ध क्षेत्रातही कार्य सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.ढोलांच्या गजरात स्वागत क्वसार्स महोत्सवाच्या उद्घाटनासाठी महाविद्यालयात पोहोचताच विद्यार्थ्यांनी उद्योगपती हनुमंत गायकवाड, अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गिते यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमने स्वागत केले. या आनंदी वातावरणात हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी भारावून गेले होते.