शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे

By admin | Updated: April 3, 2017 01:52 IST

सिमेंट काँक्रिटचा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे होत आहे.

बेल्हा : येथील गाडगेमळा परिसरातील ओढ्यावर माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके यांच्या माध्यमातून ३८ लाख रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या सिमेंट काँक्रिटचा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे होत आहे. हे काम थांबविण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले आहेत.येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणीवरून मंजूर करण्यात आला होता. या बंधाऱ्यामुळे जवळजवळ चारशे ते पाचशे एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याने व विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने आजूबाजूच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.बंधाऱ्याचे बांधकाम संगमनेर येथील सुधीर विठ्ठलराव कातोरे या ठेकेदाराने घेतल्याचे समजते. ठेकेदाराने काम चालू करताना खाणीच्या डबराऐवजी विहिरीचे डबर पायाभरणीसाठी वापरले. वाळूऐवजी दगडी कच (कृत्रिम वाळू), की तो वापरण्यास परवानगी नाही, तो वापरला गेली. हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आला असता त्यांनी जुन्नर येथील छोटे पाटबंधारे खात्याच्या शाखा अभियंत्याशी संपर्क साधून निकृष्ट दर्जाच्या बांधकाम साहित्याबाबत तक्रार केली. तक्रारीवरून त्यांनी दि. २६ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष बांधकाम स्थळास भेट दिली.बांधकाम साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आल्याने ठेकेदारास बांधकाम थांबविण्याचे लेखी आदेश दिले. परंतु तरीही ठेकेदाराने शासकीय आदेशाकडे दुर्लक्ष करुन काम चालूच ठेवले. त्यानंतर परत ग्रामस्थांच्या तक्रारीवरुन जुन्नरचे शाखा अभियंता राजकुमार मुके यांनी शनिवारी (दि. १) प्रत्यक्ष बांधकामस्थळाला भेट दिली.त्या वेळी कैलास औटी, प्रकाश डावखर, जानकू डावखर व इतरही बऱ्याच ग्रामस्थांनी ठेकेदाराच्या निकृष्ट कामाबद्दल तक्रारी केल्या. त्या वेळी मुके यांनी, ठेकेदारास पत्राद्वारे व ई-मेल पाठवून काम बंद करण्याची नोटीस अगोदरच दिली आहे, असे असतानाही काम चालू असल्याचे दिसून आले. यावरून शासनाच्या आदेशालाही न जुमानता या ठेकेदाराला आशीर्वाद कोणाचा? प्रश्न परिसरातील ग्रामस्थांना पडला आहे.बेटकरमळा येथील पाण्याचा प्रश्न ऐरणीवरराहू (ता. दौंड) येथील बेटकरमळा परिसरातील माटोबा नळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी येत नसल्यामुळे येथील पिण्याच्या व सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.ऐन उन्हाळ्यात पाणी येत नाही परिणामी येथील ग्रामस्थांमधून ग्रामपंचायत प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे तर पिण्याच्या पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसून पाणी विकत घ्यावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. एकीकडे ग्रामपंचायत प्रशासन माटोबा पाणीपुरवठा सुरळीत चालल्याचे ठणकावून सांगत आहे मात्र बेटकरमळा येथे नळकोंडाळे मात्र प्रत्यक्षात राहू- उंडवडी रस्त्यात अर्धे गाडले गेले आहे. साडेसहा कोटी रुपयांच्या जवळपास रक्कम खर्च करून ही योजना झाली. परंतु पाणीपुरवठा समितीने पाईपलाईन गाडताना योग्य नियोजन न केल्याने व काही ठिकाणी पाईपचे गेज आणि व्यास चुकीचे वापरल्याने पाईपलाईन मध्येच फुटत असल्याचे ग्रामस्थांमधून सांगितले जात आहे.