शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कौतुकास्पद! आपत्ती निवारण दल उभारणारा रायगड देशातील पहिला जिल्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 07:00 IST

३० ट्रेकर्सना खालापूरच्या डोंगरात प्रशिक्षण

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील विविध अपघात व अपघाती मृत्यूंच्या पार्श्वभूमवर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ‘जिल्हा आपत्ती प्रतिसाद व निवारण दलाची’ निर्मिती करण्याचा संकल्प केला होता. त्यास मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून स्वत:चे आपत्ती निवारण दल उभारणारा रायगड जिल्हा हा देशातील पहिला जिल्हा ठरला आहे.आंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळून झालेला दुर्दैवी भीषण अपघात, सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेला अपघात, त्याचबरोबर रायगड किल्ल्यासह विविध किल्ले आणि गिर्यारोहणस्थळी घडलेले अपघात व अपघाती मृत्यू या पार्श्वभूमीवर रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला.रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या रायगड जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलातील विविध गिर्यारोहण संस्थेच्या स्वयंसेवकांना खोल दरीमधील ‘रेस्क्यू ऑपरेशन’ (बचाव कार्य) याचे प्रशिक्षण सध्या खालापूर तालुक्यातील विणेगाव येथील रॉक वॉल (कातळीची भिंत) व दरीमध्ये देण्यात येत आहे. भारतीय संरक्षण दलाच्या अधिपत्याखालील उत्तरकाशी येथील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

 

टॅग्स :Raigadरायगड